🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे
➿➿➿➿➿➿➿➿➿
🤺🚩🏇🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🚩🤺
छत्रपती शिवाजी राजे भोसले
जन्म : १९ फेब्रुवारी १६३०
मृत्यू : ३ एप्रिल १६८०
राजधानी - रायगड
🚩🏇🚩🤺🚩🏇🚩🤺
*"प्रौढ प्रताप पुरंदर"*
*"महापराक्रमी रणधुरंदर"*
*"क्षत्रिय कुलावतंस्"*
*"सिंहासनाधीश्वर"*
*"महाराजाधिराज"*
*"महाराज"*
*"श्रीमंत"*
*"श्री"*
*"श्री"*
*"श्री"*
*"छत्रपती"*
*"शिवाजी"*
*"महाराज"*
*"की"*
*"जय"*
*!! जय भवानी ~ जय शिवाजी !!*
🚩🚩 🏇🤺🏇🚩🚩
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक , सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रुविरुध्द लढण्याकरीता महाराष्ट्रातील डोंगरद-यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
छत्रपतींच्या व्यक्तीमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास... शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन , कडक व नियोजनबध्द प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्चकोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात.
*छत्रपती शिवाजी महाराजांनी.....*
* बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले.
* पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला.
* साध्या-भोळ्या मावळयांचा संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला.
* स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले.
* महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले व नविन निर्माण केले.
* योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरुन अनेक शत्रुंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.
आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.
सामान्य रयतेची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था ... अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.
राजभाषा विकसित करण्याचा गांभिर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला.
तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
सतीप्रथेला विरोध केला.
स्त्रियांना मान- सन्मान-प्रतिष्ठा देऊन त्यांचा आदर केला.
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात !!
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.
🚩 राज्य व्हावे हीच श्रींची इच्छ 🚩
🙏🚩🕉🚩🙏
शिवजयंतीच्या आपण सर्वांना हटवार परिवार ब्रम्हपुरी तर्फे हार्दिक शुभेच्छा !!
🚩 हर हर... महादेव 🚩
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌸 विनम्र अभिवादन 🌸🙏
♾♾♾ ♾♾♾
स्त्रोत ~ WikipediA ➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸 🇲 🇹 🇸 🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा