शुक्रवार, २८ जुलै, २०२३

वर्ग प्रतिनिधी निवडणूक २०२३\२४

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी घेतली ई - निवडणूक : 

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्गप्रतिनिधी निवडीसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम :

शालेय विकासासाठी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी संपन्न :
धुळे दि. २८|७|२३



विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रात्यक्षिकांसह शिकविणे ही काळाची गरजच बनलेली आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवलेले चिरकाल स्मरणात राहते यासाठी आपली लोकशाही व त्यातील निवडणूक प्रक्रिया याची माहीती व्हावी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींसाठी लोकशाही पद्धतीने ई - निवडणूक, अनोखी व नाविन्यपूर्ण मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या मतदानाचे विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. 'वोटींग मशीन' या मोबाईल ॲपच्या सहाय्याने उमेदवार व त्यांचे चिन्ह यासमोरील बटन दाबून विद्यार्थ्यांनी मतदान केले. 
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य श्री प्रवीण पाटील सर यांच्याकडे सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवार म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सभा आयोजित करून त्यांना या मतदानासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्ग हा मतदार संघ असून त्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक साहित्याचे चिन्ह वाटप करण्यात आले. आणि प्रचारासाठी सुद्धा त्यांना दोन दिवस देण्यात आले. त्यानंतर  इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहीती उपक्रम संयोजक श्री अविनाश पाटील यांनी दिली.

मतदानानंतर कु. किर्ती गवळी (इ. ५ वी), कु. खुशी कोळी (इ. ६ वी), कु. उमेश्वरी पारधी (इ. ७ वी). कु. श्रद्धा चव्हाण (इ. ८ वी), सुमित हिवरकर (इ. ९ वी), भाविका मोहीते (इ. १०), चेतन पाटील (इ. ११ वी) व प्रसाद पाटील (इ. १२ वी) यांनी बहुमत मिळवले. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नाचून जल्लोष साजरा केला. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, सहल मंत्री, अर्थ मंत्री, स्वच्छता मंत्री अशी विविध मंत्री पदे देऊन लगेच शपथविधीचा कार्यक्रम ही संपन्न झाला. यातून शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असून प्रशासकीय कामाची माहीती देखील मिळणार असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होईल असा आत्मविश्वास प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते  मनोगतात म्हणाले की, "अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना आपल्या लोकशाही प्रणालीतील बऱ्याचशा गोष्टीं स्पष्ट होतील. शालेय जीवनात समजून घेतलेल्या गोष्टींचा चिरकाल परिणाम होत असतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी संधी देत असतो. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक देण्याची गरज आहे. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे."

उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री जयेश गाळणकर, श्री कुणाल साळूंके, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी अभिनंदन व कौतूक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...