शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

संविधान दिवस कार्यक्रम

बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विवीध स्पर्धा घेऊन संविधान दिवस साजरा...

धुळे, येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २६ नोव्हेंबर संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना संविधान दिनाची माहीती सांगण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व स्टाप व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, एस. बी. भदाणे, स्टाप व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

संविधान दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील व इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी 'ऑनलाईन प्रश्नमंजूषेचे' आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा,  रांगोळी स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

संविधान दिनाच्या निमित्ताने या स्पर्धांच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय देसले, अपर्णा पाटील, महेंद्र बाविस्कर, योगेंद्र पाटील, महेश पाटील, जयश्री मासूळे, तुषार कुलकर्णी, महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली.

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

भारतीय संविधान दिन

२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस ....


आज २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस त्यानिमित्त आपल्या राज्यघटनेविषयी…

# भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून राज्यघटना अंमलात आली.

# १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

# ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

# नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.

# भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत ४४८कलमे (३९A, ५१A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

# भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे. मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

# काही महत्वपूर्ण वैशिट्ये –
-मूलभूत आधिकार
-सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
-संघराज्य प्रणाली
-प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.

विभाग –
१] प्रशासकीय (Executive)
२] विधीमंडळे(Legislative)
३] न्यायालयीन (Judicial)

1. प्रशासकीय (Executive) – भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो.

राष्ट्रपती : भारतातील संविधानाच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलीआहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो.

प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ : राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते व प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते.

२) विधीमंडळे (Legislative) – भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात.
संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.

लोकसभा : भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले भागृह असेही म्हणतात. 
लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ असते. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे.
राज्यसभा : भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्‌वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभेत घटकराज्यांचे
प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. 

३) न्यायालयीन (Judicial) – : भारत हे संघराज्य आहे. केंद्रशासन आणि घटकराज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्र व घटकराज्ये अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ, भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. 

सर्वोच्च न्यायालय : भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश ‘सरन्यायाधीश’ या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे.

उच्च न्यायालय : भारताच्या संविधानातील प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. सध्या आपल्या देशात २४ उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात.

जिल्हा व दुय्यम न्यायालये : ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो.

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे

यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬        संकलन : श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाड़ी ता. जि. धुळे                                               
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🏤🏭🇮🇳👨🏻🇮🇳🏭🏤⚜️

        यशवंतराव चव्हाण


      (महाराष्ट्राचे १ले मुख्यमंत्री)

      जन्म: १२ मार्च १९१३
            (देवराष्ट्रे जि. सातारा 
              महाराष्ट्र, भारत)
     मृत्यू : २५ नोव्हेंबर  १९८४
                    (दिल्ली)

               कार्यकाळ
मे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२

                *राज्यपाल*
श्रीप्रकाश (१९५६–१९६२)
पी. सुब्बरायण (१९६२)
पुढील : मारोतराव कन्नमवार
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : अखिल भारतीय 
                       काँग्रेस
अपत्ये : नाही
निवास : कराड
शिक्षण : टिळक हायस्कूूल,कराड.
व्यवसाय : राजनीतिज्ञ
धर्म : हिंदू
                 यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

💁‍♂ जीवन

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

💵 यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात

योजना

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

- नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तसेच त्यांच्या आदरापोटी डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी (१४ एप्रिल) देण्याची प्रथा यशवंतरावांनी महाराष्ट्रात सुरू केली. 
    ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.

📚 यशवंतराव चव्हाणांचे चरित्र किंवा व्यक्तिचित्रण वर्णन करणारी पुस्तके

आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार (लेखक के.जी. कदम)
आमचे नेते यशवंतराव (रमणलाल शहा)
कृष्णाकाठचा माणूस (अरुण शेवते)
घडविले त्यांना माऊलीने (ग.शं. खोले)
Chavan and the Trouble Decade (T.V. Kunnikrishnan)
Chavan,The Man of Crisis (B.B.Kale)
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार (दत्तात्रय बारसकर)
भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण (डॉ.पंजाबराव जाधव)
Man of Crisis (Baburao Kale)
मुलांचे यशवंतराव चव्हाण (जे.के. पवार)
यशवंतराव : इतिहासाचे एक पान (रामभाऊ जोशी)
यशवंतराव : एक इतिहास (रामभाऊ जोशी)
यशवंतराव चव्हाण (प्रा. डॉ. कायंदे पाटील)
Yashawantrao Chavan (Chandulal Shah)
यशवंतराव चव्हाण गाजते कीर्ती (दुहिता)
यशवंतराव चव्हाण - चरित्र (अनंतराव पाटील)
यशवंतराव चव्हाण : चरित्र (बाबूराव बाळाजी काळे)
यशवंतराव चव्हाण जीवन दर्शन (पंजाबराव जाधव)
यशवंतराव चव्हाण, व्यक्तित्व व कर्तृत्व (लेखक : गोविंद तळवलकर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती व कार्य (कृ.भा. बाबर)
यशवंतराव चव्हाण : व्यक्ती और कार्य (हिंदी, परमार रंजन)
यशवंतराव बळबंतराव चव्हाण (नामदेव व्हटकर)
यशवंत स्मृतिसुगंध (रामभाऊ जोशी)
यशस्वी यशवंतराव (रा.द. गुरव)
वादळ माथा (राम प्रधान)
YB Chavan: A PoliTical Biography (D.B. Karnik)
सह्याद्रीचा सुपुत्र (डॉ. न.म. जोशी) (मराठी, इंग्रजी, हिंदी, सिंधी, गुजराती भाषेत.)
सोनेरी पाने (भा.वि. गोगटे)
ही ज्योत अनंताची (रामभाऊ जोशी)

📝 यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
ॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)
कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४) हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
भूमिका (१९७९)
महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
विदेश दर्शन
सह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह
युगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा

📕 यशवंतराव चव्हाणांचे भाषण संग्रह/पुस्तिका

असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
India's foreign Policy - १९७८
उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
कोकण विकासाची दिशा (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
The Making of India's Foreign Policy - १९८०
युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
Winds of Change - १९७३
विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०)
विदेश-दर्शन (परदेशांतून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, संपादक - रामभाऊ जोशी, २०१७)
शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
हवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)

📽 चित्रपट

यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)

🏢 यशवंतराव चव्हाण नावाच्या संस्था

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड, पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, लातूर (महापालिका प्रवेशद्वार), संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)
   
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

1.5 His First Flight

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳

ऑनलाईन टेस्ट सोडवा व प्रमाणपत्र मिळवा👍

इ. १० वी इंग्रजी

1.5 His First Flight

👇👇👇👇👇


Online Test सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.....
👇👇👇👇👇


निर्मिती - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

1.4 Be SMART

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳

ऑनलाईन टेस्ट सोडवा व प्रमाणपत्र मिळवा👍

इ. १० वी इंग्रजी

1.4 Be SMART!

👇👇👇👇👇


Online Test सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.....
👇👇👇👇👇


निर्मिती - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

1.3 Basketful of Moonlight

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳

ऑनलाईन टेस्ट सोडवा व प्रमाणपत्र मिळवा👍

इ. १० वी इंग्रजी

1.3 Basketful of Moonlight

👇👇👇👇👇


Online Test सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.....
👇👇👇👇👇


निर्मिती - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...