सोमवार, २० डिसेंबर, २०२१

राष्ट्रसंत गाडगेबाबा

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन -  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥

           स्वच्छतेचे पुजारी
          संत गाडगे महाराज


  डेबूजी झिंगराजी जानोरकर
             (समाज सुधारक)

     जन्म : 23 फेब्रुवारी 1876
 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)

    निधन : 20 डिसेंबर 1956
                (वय 80)
  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )

मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    
                      नीतिशास्त्र
प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा
                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.
 
👬 गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट
                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
📚 गाडगे महाराजांची चरित्रे
  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
🎥 गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट
                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

📖 साहित्य संमेलन
               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

मृत्यू
                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 

🏵 सन्मान
                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.
🏵 सन्मान
            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.

 🙏🌹 गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला...🌹🙏
        

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
           स्त्रोत ~ WikipediA                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

प्रभू दत्तात्रय

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                             
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🚩🚩🛕👤🛕🚩🚩🚩

             प्रभू दत्तात्रेय


हा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे. 
दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.

दत्तात्रेय : मराठी
दत्तात्रेय : संस्कृत
दत्तात्रेयः
निवासस्थान : श्री क्षेत्र गाणगापूर
शस्त्र : त्रिशूळ, चक्र
वडील : अत्री ऋषि
आई : अनुसया
पत्नी : अनघालक्ष्मी
🔆 अन्य नावे/ नामांतरे
दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर
या देवतेचे अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
या अवताराची मुख्य देवता
ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
मंत्र
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त
नामोल्लेख
गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
तीर्थक्षेत्रे
औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..

⚜️ स्वरूप
दत्तात्रेय ही तीन तोंडे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

👤 जन्म कथा/आख्यायिका
एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.

📙 इतिहास
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.

💎 संप्रदाय
एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११००च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.

समावेशकता
गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हा वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

🏟️ आखाडे
दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.

🛕 महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थ क्षेत्रे                                                                      श्री क्षेत्र प्रयाग दत्त मंदिर कोल्हापूर
श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री क्षेत्र अंतापूर
श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव
श्री क्षेत्र नगांव बु ( धुळे , महाराष्ट्र )
श्री क्षेत्र अंबेजोगाई
श्री क्षेत्र अमरकंटक
श्री क्षेत्र अमरापूर
श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
श्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)
श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र कडगंची
श्री क्षेत्र करंजी
श्री क्षेत्र कर्दळीवन
श्री क्षेत्र कारंजा
श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)
श्री क्षेत्र कुमशी
श्री क्षेत्र कुरवपूर
श्री क्षेत्र कोळंबी
श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजराथ)
श्री क्षेत्र गाणगापूर
श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजराथ)
श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)
श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)
श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)
श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
श्री क्षेत्र चौल दत्तमंदिर
श्री जंगली महाराज मंदिर (पुणे)
श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)
श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र डभोई (बडोदा)
श्री दत्तमंदिर (डिग्रज)
श्री तारकेश्र्वर स्थान
श्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)
श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
श्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)
श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)
श्री क्षेत्र देवगड नेवासे
श्री क्षेत्र नरसी
श्री क्षेत्र नारायणपूर
श्री क्षेत्र नारेश्र्वर
नासिक रोड दत्तमंदिर
श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)
श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
श्री क्षेत्र पिठापूर
श्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)
श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)
श्री क्षेत्र पैजारवाडी
श्री क्षेत्र पैठण
श्री क्षेत्र बसवकल्याण
श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)
श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)
श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र भालोद (गुजराथ)
श्री क्षेत्र मंथनगड
श्री क्षेत्र माणगांव
श्री क्षेत्र माचणूर
श्री क्षेत्र माणिकनगर
माधवनगर - फडके दत्तमंदिर
श्री क्षेत्र माहूर
श्री क्षेत्र मुरगोड
श्री क्षेत्र राक्षसभुवन
श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
श्री दत्तमंदिर (वाकोला)
श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
श्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)
श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
श्री क्षेत्र शिर्डी
श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
श्री क्षेत्र शेगाव
श्री क्षेत्र सटाणे
श्री साई मंदिर (कुडाळ गोवा)
श्री क्षेत्र साकुरी
श्री क्षेत्र सुलीभंजन
श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
श्री स्वामी समर्थ मठ दादर
श्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)
श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)
श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)
श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
श्री दत्त मंदिर बु. अल्लुर (निपाणी गडहिंग्लज रोड)
📿 उपासनेची वैशिष्ट्ये                 दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.

🛕 दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे

औदुंबर :
कोल्हापूर - श्री क्षेत्र प्रयाग करवीर काशी कोल्हापूर हे एक अत्यंत महत्वाचे व पवित्र असे ठिकाण कोल्हापूर पासून अवघ्या 7किलोमीटर च्या अंतरावर वसलेले आहे ,येथे पवित्र पाच नद्यांचा संगम आहे याचे महत्व श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पंधरा व सोळाव्या ओवीमध्ये व श्री करवीर माहात्म्य या ग्रंथामध्ये याची नोंद आहे.येथे श्री दत्तात्रेय रोज नित्यनियमाने स्नानास येतात व चंदन उटी लावतात अशी आख्यायिका आहे.तसेच येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे त्यामध्ये श्रींच्या स्वयंभू पाषाणी पावदका आहेत. माघ महिन्यामध्ये माघ स्नान यात्रा भरते.या यात्रे साठी व स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.येथील श्रींची पूजा वंशपरंपरेनुसार श्री अभिनव अशोक गिरीगोसावी यांचेकडे आहे.
कडगंची : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
कर्दळीवन : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.
कारंजा : लाड कारंजे, श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.
कुरवपूर : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.
गरुडेश्वर : योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
गाणगापूर : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
गिरनार हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू नेमिनाथांचे मंदिर आहे. तसेच गोरखनाथ मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
नरसोबाची वाडी : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. या स्थानाल नृसिंहवाडी म्हणतात. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे आदिलशहाने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
नारेश्वर : हे रंगावधूत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र गुजरात राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी 'दत्त बावनी' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील वडोदरापासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे होतात.
नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते.
पीठापूर
बसवकल्याण
बाळेकुंद्री
माणगाव
माहूर : चांगदेव राऊळ हे माहूरच्या यात्रेनिमित्त फलटणहून निघाले होते. तसेच ते द्वारका येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
अक्कलकोट : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. सोलापूरजवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
श्रीक्षेत्र रुईभर श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद
🛕 इतर मंदिरे व स्थाने                                             
अंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या अंबेजोगाई येथे आहे
अष्टे :
कोल्हापूर : भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये रेवदंड्यापासून ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
माणिकनगर : बीदर येथील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. श्रीमाणिकप्रभू यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे गुलबर्गा रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
विजापूर : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
सांखळी (गोवा) : डिचोली तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्त जयंती असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
श्रीक्षेत्र रुईभर श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.
🔮 शिष्य व कार्य
श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.

📚 संप्रदायाचे ग्रंथ
अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
गुरुगीता
गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.
श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली.
सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.

📚 संबंधित ग्रंथ
श्रीगुरुचरित्र लेखक सरस्वती गंगाधर
दत्तप्रबोध
दत्तमाहात्म्य
गुरुलीलामृत
नवनाथभक्तिसार
नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
दक्षिणामूर्ती संहिता
दत्तसंहिता
आधुनिक पुस्तके संपादन करा
आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशन
दत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)
दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. रा.चिं. ढेरे पद्मगंधा प्रकाशन
श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. प्र.न. जोशी
'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
दत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)
🎤  गीते
आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.

🎼🎤 पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते
अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
आज मी दत्तगुरू पाहिले
कृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
गुरुदत्त पाहिले कृष्णातिरीं
गेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)
जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
दत्तगुरूंना स्मरा
दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)
दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
दत्ता दिगंबरा या हो
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)
पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),
वगैरे. .

        🙏🌹 🛕 🌹🙏
      ♾♾♾ ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                        ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

महाराणी ताराबाई भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :   श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                            
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🚩🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🏇🤺🚩
   
         महाराणी ताराबाई
        राजारामराजे भोसले


    जन्म : 14 एप्रिल 1675
         (जन्मस्थान : तळबिड)

    मृत्यू : 9 डिसेंबर 1761
         (मृत्यूस्थान : सिंहगड)

उपाधी = महाराणी.
राज्यकाळ : १७०० - १७०७
राज्याभिषेक : इ.स. १७००
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी : पन्हाळा
पूर्वाधिकारी : छत्रपती 
                  राजारामराजे भोसले
उत्तराधिकारी : शाहू भोसले
वडील : हंबीरराव मोहिते
राजवंश : भोसले
राजचलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१)  ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
                 राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
                      करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे.

💠 कारकीर्द
                  घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.

ताराबाई
                  वास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली..

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.

राजकीय परिस्थिती
                       सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

🌀 कारकीर्द

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.

सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.मराठी राज्याच्या अडचणीच्या काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबसारखा बलाढ्य शत्रू आपल्याच राज्यात आलेला असताना एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. राज्याला,गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले. सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६ व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारुन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम महाराणी ताराबाई यांनी केले. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामां नतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली. 

👑 राजाराम
                  वास्तविक सन १७०३ साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.
                     सन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.
                   ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.
त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

             कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

📙 पुस्तके

महाराणी ताराऊसाहेब (अशोकराव शिंदे सरकार)

   हर हर महादेव......!!!     

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

संत जगनाडे महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील        
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿         📜✍️🚩🚩👳‍♀🚩🚩📜✍️
              संत शिरोमणी
  श्री संताजी जगनाडे महाराज


     जन्म : ८ डिसेंबर १६२४
 ( सदुंबरे, मावळ, पुणे, महाराष्ट्र )
    निधन : ११जानेवारी १६८८

वडील : विठोबा जगनाडे
आई : माथाबाई
         हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.

💁‍♂ बालपण
              संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यां पैकी एक झाले.

🔱 विवाह
         संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

🤝 गुरुभेट
         त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

गाथांचे पुनर्लेखन
                  संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.

🪔 इहलोकाचा त्याग
                    शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु संत तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

संताजी जगनाडे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-

📝 संताजी महाराजांचे अभंग

★☆ संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग ☆★

》》》भाग-1《《《 
             {क्र. 1 }
 माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। 1 ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। 2 ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। 3 ।।

          {अभंग क्र. 2}
एकादशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ।। 1 ।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ।।2।।
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
अलिँगन देता झाला त्याशी ।।3।।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।4।।
     
           {अभंग क्र.-3}
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। 1 ।।
काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ।।2।।
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा का गेला ।।3।।
तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।। 4

           {अभंग क्र.-4}
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।
आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। 1 ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी ।
पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। 2।।
संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।
आपुले ते मन सुधारले ।। 3 ।।

           {अभंग क्र.- 5}
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। 1 ।।
भक्ति या भावाची करुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। 2 ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। 3 ।।

》》》भाग-2《《《
              {क्र.6}
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।1।।
मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।2।।
किर्तीविणा कांही मागे ते राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ।।3।।

                  {क्र.7}
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।1।।
त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही ।
प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।2।। संतु म्हणे असा अंभग गाइला ।
पुढे चालु केला देहावरी ।।3।।

                {क्र.8}
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही ।
निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।1।।
तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही ।
जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।2।।
असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाही आला कदा काळी ।।3।।
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ।।4।।

                {क्र.9}
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।
तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।1।।
नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।2।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।3।।
                {क्र.10}
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा ।।1।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।2।।
सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।3।।
फेरे फिरो दिले जन्मवरी ।
तेल काढियले चैतन्य ते ।।4।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।5।।

》》》》भाग - 3《《《《
                 {क्र.11}
देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा ।
गुदस्थान जाणा उखळ ते ।।1।।
स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।
विदुं दंत चक्र आनु हात ।।2।।
एकविस मनी खांब जो रोविला ।
सुतार तो भला विश्वकर्मा ।।3।।
मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले ।
तेल हाता आले सुटे मन ।।4।।
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।
चालवि आपोआप पांडुरगं ।।5।।

                {क्र.12}
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।1।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।2।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही । शोधुनिया पाही संतु म्हणे ।।3।।

                 {क्र.13}
निदंक हा घाणा म्हणावा तो जरी ।
शुभ कार्या आधिं भरतात ।।1।।
श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।
म्हणवेना कोणा निंदक तो ।।2।।
संतु म्हणे म्या तो घाणा भरियला । सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।3।।

              {क्र.14}
आणिक तो घाणा कोणता सादर ।
सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।1।।
ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे ।
दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।2।।
संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।
सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।3।।

               {क्र. 15}
घाण्याचा कर करा पुसलासी मज ।
तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।1।।
दशनाद होती सर्वाँचे ब्रम्हांडी ।
तुझे काय पिँडी वाजताती ।।2।।
संतु म्हणे घाण्याचा करकरा ।
दशनादाचा तो खरा जगा माजी ।।3।।

     》》》भाग - 4《《《
                 {क्र.16}
आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून ।
दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।1।।
त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून ।
सरकायासी जागा नाही मुळापासून ।।2।।
संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी ।
जग भुलव्या नारी खय्राच ह्या ।।3।।

               {क्र.17}
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।
आणिक नारदाशी त्याच रीती ।।1।।
ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।2।।
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशी देहातुनी ।।3।।

                {क्र.18}
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।
हाकलुनि दिल्या घरातुनी ।। 1 ।।
अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।
गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।
सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।3।।
 
                {क्र. 19}
पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा ।
भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। 1 ।।
विश्वामिञासी रंभेने कुञा बनविला।
मागे मागे नेला घराप्रती ।।2।।
संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ।।3।।

                  {क्र.20}
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। 1 ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।2।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।3।।

      》》》भाग - 5《《《
                  {क्र. 21}
मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।1।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।2।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची .... फाट ।।3।।

                  {क्र.22}
लाट उचलली जगामधी कोणी ।
मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।1।।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।2।।
लाट उचलली भक्तीची । संतु तेल्याचे मुक्तिची ।।3।।

                 {क्र.23}
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।
उचलितो कोण देउनिया नेट ।।1।।
नेट तो दिधला लंकेचे रावणे ।
उचलेना तेने कदापिहि ।।2।।
संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ।।3।।

                 {क्र.24}
सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।
रावणाशी होती पुष्कळच ती ।।1।।
रावणा उचलेना सुदामा उचली ।
मती गुंग झाली रावणाची ।।2।।
संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।
लाट ही उचलेना कदाकाळी ।।3।।

                  {क्र.25}
लाठ माझी माता लाठ माझा पिता ।
लाठी विना कांता विद्रुपची ।।1।।
लाठी हीने मजला दिधली ती लाट ।
चुकवीली वाट जन्ममरणाची ।।2।।
संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।
व्यर्थची खटपट करु नका ।।3।।

》》》》भाग-6《《《《《
               {क्र. 26}
मन मोहाची करुनि खुटी ।
लाठीस ठोकली बळकटी ।।1।।
फिरे गरगरा लाठी भोवताली ।
ध्यान जाईना लाठीवरी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी ।
पहा उठाउठी अगोदर ।।3।।

                 {क्र.27}
खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।
दशरथ राजाला आणि नारदाला ।।1।।
दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।
नारद तो झाला नारदीच ।।2।।
संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।
विश्वाच्या तोलाची एकटीच ।।3।।

                {क्र.28}
खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे ।
मनी नाही आले अगोदर ।।1।।
आता तरी सावध व्हारे लवकरी ।
खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।2।।
संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या ।
खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।3।।

                 {क्र.29}
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला ।
वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।1।।
भरतानी त्याग केला पादुकास मान दिला ।
दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी ।
केली तुटा तुटी मायलेका ।।3।।

              {क्र.30}
अशिया खुंटिला धरु नये हाती ।
करिल ती माती सर्वञांची ।।1।।
असेच खुंटिने गोपिचंदन फसविले ।
धातुचे पुतळे जळोनिया गेले ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी ।
सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ।।3।।

》》》》भाग - 7《《《《
                 {क्र.31}
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।1।।
काळ मोडुन टाकिल मुंडी ।
कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।2।।
सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ।।3।।

                  {क्र.32}
शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।1।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले । कधी नाही भ्याले राञंदिन ।।2।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ।।3।।

                  {क्र.33}
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची ।
नारद मुनिची असेच कीं ।।1।।
जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना ।
तेव्हां ती कडाडे आपोआप ।।2।।
संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे ।
शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।3।।

                {क्र.34}
आणिक शेँडीने फसविलेँ कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।। कुंभकर्णाशीँ होती झोँप फार । तेणेँ तो आहार फार करी ।। संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ।।

                   {क्र.35}
झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।। भार सुवर्ण होईना तेँ पुरे। पुरे सर्व देऊन घेतलेँ स्वतःस विकून।। संतु तेली म्हणे हो म्हणेही झोँप। हिचा सर्वाहीँ करा करा कोप।।

》》》》भाग - 08《《《《
                 {क्र.३६ }
मनोसुविचारी करुनि कातर। शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।। 
लाटिचा आधार तिला फार हो लाठि। फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।। 
मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ । संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।

                {क्र.३७}
कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।। 
कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।। 
संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ। आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।
                 {क्र. ३८}
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।। 
आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।। 
संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
 
                   {क्र.३९}
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।। 
आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।। 
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।

               {क्र.४०}
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।। 
तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।। 
संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।

》》》》भाग - 09《《《《
                 {क्र. ४१}
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।। 
तिच जन्म मरणाचे मुळ। असेँ माझेँ सांगणे समुळ।। 
संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे । तेथेँ यम पाश उभा राहे ।।

                   {क्र.४२}
असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।। 
आणिक कोणाशीँ लागला तो पाश । मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।। 
संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ । नरकाचे डोही जाऊं नका।।

                  {क्र.४३}
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।। 
सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतेँ तिळगुळ यमा हाती।।

                {क्र.४४}
क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।। 
जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।। 
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।

                  {क्र.४५}
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।। 
आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।। 
संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।

》》》》भाग - 10《《《《
                 {क्र. ४६}
सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।। 
मन पावन ओढी जोरानेँ। मग तो घाणा चाले मौजेने ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी।।

               {क्र. ४७}
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।। 
मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ । हाता काय आलेँ काळकुट ।। 
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची।।

                  {क्र.४८}
आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।। 
घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी।।

                   {क्र.४९}
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।। 
कर्णानेँही दिली सारथी शल्यास । आणिक ती दिली धर्मानीँ कौरवांस ।। 
संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।

              {क्र.५०}
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।। 
मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।। 
संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।।

》》》》भाग - 11《《《《
                  {क्र. ५१}
संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।। 
तुकाचे नावेँ फोडी खडे। विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।। 
संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट सर्वाँलागीँ ।।

                   {क्र. ५२}
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।। 
म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड । संसारात जोड करि कांही ।। 
संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड । करा कांही जोड देवाजाची ।।

              {क्र. ५३}
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।। 
देवाची करिना कधी जोड । हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।। 
संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।

                 {क्र. ५४}
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।। 
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।। 
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।

                 {क्र. ५५}
जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।। 
फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।। 
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।

》》》》भाग - 12《《《《
                  {क्र.५६}
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।। 
तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।। 
संतु म्हणे हा मोठा बोका। मस्तकी बाहुली ठोक ।।

               {क्र.५७}
मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।। 
भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ।। 
संतु म्हणे हा मत्सर । जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।

                {क्र.५८}
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।। 
भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ।। 
संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।

                 {क्र.५९ }
आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।। 
हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।। 
संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।।

               {क्र.६०}
आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।। 
गौरोबानेँ हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।। 
संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।

》》》भाग - 13《《《
             {क्र.६१}
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।। 
प्रपंच जोखड शिरीँ घेऊन । चाले मन पवन आनंदाचे ।। 
संतु म्हणे हेँ बाहुले । जन्मवरी करी हुल हुल ।।

                {क्र.६२}
अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।। 
केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच । आखेर बैमानी झालेच ते ।। 
संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।

              {क्र.६३}
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ।पुष्कळच ते धन मिळविलेँ ।। 
आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ।रांडा आणि पोरां आवघ्याशीँ।।
संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ । मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।

              {क्र.६४}
तुझिया सांगातीँ येते कांही कांही। कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
सोयरा न येतोँ बंधू ही येईना।। येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।। 
संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ। आठवा वनमाळी रात्रंदिन।।

               {क्र.६५}
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।। 
सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।। 
संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।

  》》》भाग - 14《《《
              {क्र.६६}
सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ।
आवघ्या जनानोँ सावध व्हारे।। काळाचिये उडी पडेल बा जेव्हां।
सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला। देहासहित गेला तुकावाणी।।

                {क्र.६७}
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ।। जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी।। संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।

               {क्र.६८}
मन हेँ ओढाळ गुरु फार आहे।
परधन पर कामिनीकडे धांवेँ।। असेच हे मन राहिना हो स्थिर।
नेहमीँ हुरहुर लागली असे।।
संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर।
राऊळा आंगणीँ जाऊनियां।।

              {क्र.६९}
मनाला तो बोध रामदासांनेँ केला।
उपदेश दिला जगामाजीँ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा।
यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी।
विठ्ठल विटेवरी उभा असे।।

                {क्र.७०}
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता।। संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ।।

     》》》भाग -15《《《
                    {क्र.७१}
पवन तो नंदी असे शंकराचा।आणीक बळीचा शेतकिचा ।।
नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार।कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां।दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।

                 {क्र.७२}
घेऊनिया घाणा तेल काढियले।गि-हाइक संत मंडळीचे आले।। कसे देतां तेल सांगावे संताजी।तुम्ही काय घेता घेणार तो तुका।। संतु म्हणे तेल जो कोणी घेईल।कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज।।

                {क्र.७३}
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो।तुका वाणी येतो घ्यावयास।। घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत। गळ्यांत जो आहे त्यांतही घाला।। संतु म्हणे तेल घालुनि उरले।मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे।।

             {क्र.७४}
आणीक हे तेल घेतलेँ कोणी।निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी।। मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी।तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी।। संतु म्हणे तेल कोणी जो घेईल।दुकाना येईल विठलाच्या।।

                   {क्र.७५}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी।गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ।। तसेच घेतले नरहारी सोनारानीँ।कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल। त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग।।

    》》》भाग - 16《《《
                 {क्र.७६}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
तसेच हे तेल घेते जनाबाई । मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।
संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ । पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।

               {क्र.७७}
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा।आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही । मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।। 
संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही।पांडुरंग पायीँ धरियलेँ।।

               {क्र.७८}
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।
कानाडी कानड्याचा,मुसलमान तो दिल्लीचा।।
मराठी महाराष्ट्राचा । कोँकणी कोकणचा ।।
संतु तुका या देशीचा ।
वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका ।
विठल चरनीँ वाहु बुका।।

                {क्र.७९}
देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार।
दोहीँचा विचार एकपणेँ।। भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे।
देव त्यांच्या संगे सुख भोगी।। देवेँ भक्तारूप दिलासे आकार।
भक्ती त्याचा परिवार वाणिला।। एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण ।
देव भक्तपण स्वामी सेवा।। संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव।
भक्त तोचि देव देव भक्त।।

              {क्र.८०}
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे।
एक उभा राऊळा आंगणीँ।। एक घाना बैसे जाऊनि।
एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।
एका आंगा लाविले गंध।
एका अंगा येई सुगंध।। एक वाजवितो विणा ।
एक दाखवितो खुणा।।
एक म्हणतो अभंग ।
एक म्हणे पांडुरंग।। संतु म्हणे एक जीँव।
दोहोँ कुडी दिला ठाव।।

      》》》भाग -17《《《
                   {क्र.८१}
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।
एका कुडी घातलेँ शिट। एक कुडी दिसे तेलकट ।। 
एके कुडी घातली माळा।एकीचा रंग दिसे सावळा ।। 
संतु म्हणे कुडी टोपन। हिचे करूं नका जोपन।।

                 {क्र.८२}
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।। 
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही। शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी।।

                  {क्र.८३}
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी।
आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ।। तुका विकी सौदा आणिक मिरची।
संतु विकी तेल लागुनि चुरशी।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।
तुकयाशी खुण पटली असे।।

              {क्र.८४}
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण।
तुजलागी ज्ञान फार आहे।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।
मजलागी देख कळो आलेँ।। ज्ञानाचा सागर होशील तूं योगी।
नेणती हेँ जगीँ मूढ जन।। तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान।
ऐकतां वचन गोड लागे।।

                 {क्र.८५}
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता।काय तुज आता सांगू वर्म।। किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय।। यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।

         🚩 गुरुमाऊली 🚩

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत - Wikipedia                                                         ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक युगपुरूष - प्रा. डाॅ. विजय शिरसाठ

Preparing_For_Life

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे येथे आज #महापरिनिर्वाण_दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव, जि. जळगांव येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. विजय शिरसाठ (M.A., B.Ed., M. Phil., SET, NET, Ph. D.) यांनी डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_एक_युगपुरूष या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या व ओघवत्या भाषेत त्यांनी जवळजवळ एक तास मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार पटवून देण्यात त्यांना यश मिळाले. 
कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन श्री अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

डाॅ. राजेंद्र प्रसाद

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन :  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                             
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   ⚜️🎓⛓️🇮🇳👨‍🦰🇮🇳⛓️🎓⚜️
  
         डॉ. राजेंद्र प्रसाद सहाय

    (स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती)
               
                कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२
पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती - सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील - पदनिर्मिती
पुढील - सर्वपल्ली राधाकृष्णन
       जन्म : ३ डिसेंबर १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
      मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३
                    (पाटणा)
राजकीय पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी - राजवंशी देवी
व्यवसाय - वकिली
धर्म - हिंदू     
            डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.                                                                🔮 जन्म
           डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.

📙 शैक्षणिक काळ
          प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, १८९६ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.
             डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.

🔰 कारकीर्द - शिक्षक
             राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.

🎓 वकील
        १९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.

🇮🇳 स्वातंत्र्य चळवळीतील कार्य
             भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.
      गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.
             १९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.
           ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.
                 २ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

📚 राजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके
डॉ. राजेंद्र प्रसाद (संध्या शिरवाडकर)
राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचें ओझरते दर्शन (रा.प्र. कानिटकर)
    
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾  ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

विज्ञानाचा गुरूवार ऑनलाईन वेबीनार

विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा घेतला लाभ...


धुळे येथील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा लाभ घेतला. यावेळी शिकण्याकरिताचे विज्ञान - तर्क करण्याची क्षमता (Science of learning-the reasoning ability) या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले होते.  you tube च्या मदतीने हे लाईव्ह वेबीनार घेण्यात आले. यामध्ये पाणिनी तेलंग यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. विज्ञान शिक्षक श्री एस. आर. पाटील यांनी वेबीनार सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाविषयी प्राथमिक माहिती दिली. कार्यक्रमासाठी श्री अविनाश पाटील यांचे तंत्रसहाय्य लाभले. 
कार्यक्रमाच्या आयोजना बाबतीत संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी कौतूक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...