शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

Good Thoughts

आपले आयुष्य इतके छान, सुंदर, आणि आनंदी बनवा की, निराश झालेल्या व्यक्तींना तुमच्याकडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळायला पाहिजे.

When life gives you hundred reasons to cry,  show to life that you have thousand reasons to smile.

नाते कधीच संपत नाही, बोलण्यात संपले तरी डोळ्यांत राहते, आणि डोळ्यांत संपले तरी मनात मात्र कायम राहते.

स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तेथेच माणुसकीचे सुंदर नाते तयार होते.

सहजता से निभे, वे ही रिश्ते सुखद होते है, जिन्हे निभाना पडता है, वो केवल दुनियादारी होती है ।

जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, तर काही आधार देतात, मात्र फायदा घेणारे डोक्यात, रहातात आणि आधार देणारे हृदयात राहतात.

आपके पास कितने सारे मित्र है उससे कोई फरक नही पडता, जरूरत पडने पर कितने काम आएंगे, वो महत्वपूर्ण है ।

लोकांचा जास्त विचार करणे सोडून द्यायला शिका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला लोक हसतात, आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे त्याच्यावर जळतात.

भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टींना विसरून, आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन क्षणांचे हसत स्वागत करणे म्हणजेच खरी सकाळ असते.

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

भारतरत्न लता मंगेशकर

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
                
      ➿➿➿➿➿➿➿➿➿           📜🎙️🎥🎧👩‍🦰🎤🎧🎬📜                                                              भारतरत्न लता मंगेशकर
           (एक महान गायिका)

टोपणनावे : लतादीदी
जन्म : २८ सप्टेंबर १९२९
(इंदूर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत)
मृत्यू : ६ फेब्रुवारी, २०२२ (वय ९२)
(मुंबई, महाराष्ट्र)
धर्म : हिंदू
नागरिकत्व : भारतीय
मूळ गाव : मंगेशी, गोवा
भाषा : मराठी, हिंदी भाषा
आई : शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर)
वडील : मास्टर दीनानाथ मंगेशकर
नातेवाईक : आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
मीना खडीकर
संगीत साधना
गुरू : दीनानाथ मंगेशकर
गायन प्रकार : कंठसंगीत गायन
संगीत कारकीर्द
कार्य : पार्श्वगायन, सुगम संगीत
पेशा : पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ : इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी : गानकोकिळा
पुरस्कार : भारतरत्न(२००१)        लता मंगेशकर  या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
    लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.

लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
💁🏻‍♀️ बालपण
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.दीनानाथांचे वडील कर्हाडे ब्राह्मण व आई देवदासी (गोमंतक मराठा) होती.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूर ला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.
 🎥 चित्रपटसृष्टीत कारकीर्द
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.

इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
🔮 १९५० च्या दशकात उत्कर्ष
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.

इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.
🔮 इ. स. १९६० चे दशक
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.

२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.

इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतातले उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

1970 चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.

तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट.                      1970 च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970 च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीती ना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले.

1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती.

लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे.

1970 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग".

1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले.

चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते.

1970 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता.
त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली.

1980 चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले.

1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली.

नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले.   1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.

1980 च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी की ना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने".
या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुम ना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहीं ना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मन ना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादा ना तोड", नंतर 2004 च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.

बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत).

मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80 च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां".
80 च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली.                      (1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी.

जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले.
1990 चे दशक 1990 च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले.

लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली.

लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत.

1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता.

चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004).

1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999).

एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली.

पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली.

1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वत:च्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत.

मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछ ना कहो" गायले: एक प्रेम कथा.

1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला.           त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे.

2000 चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.

2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला.

तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती.

लता मंगेशकर यांचे "वादा ना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला.
2010 चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत.

14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से".
पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ... ना जाने क्यूं.

28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले.
2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते.

30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले.

1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, ​​महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्‍ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले.

1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले.                1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले.
1990 च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरूवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते.

2000 च्या दशकात, लतादिदीनी  युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी: नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे.
गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960 च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले.

1960 - राम राम पावना 1963 - मराठा तितुका मेळवावा 1963 - मोहित्यांची मंजुळा 1965 - साधी मानसे १९६९ - तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील "ऐरनिच्या देवा तुला" या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. १९५३ - वादळ (मराठी) १९५३ - झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती १९५५ - कांचन गंगा (हिंदी) १९९० - लेकीन... (हिंदी)

भारत सरकारचे पुरस्कार संपादन १९६९ - पद्मभूषण १९८९ - दादासाहेब फाळके पुरस्कार १९९९ - पद्मविभूषण 2001 - भारतरत्न 2008 - भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त "वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट" सन्मान .

🎞️ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार                  
1966 - साधी मानसासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1966 - 'आनंदघन' नावाने साधी मानस (मराठी) साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक 1977 - जैत रे जैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1997 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2001 - महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता).

⚜️ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार                        पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. तिला या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे.

1972 - परिचय चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1974 - कोरा कागज चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 
1990 - लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार...                  पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली.

1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सोडण्याचा असामान्य हावभाव केला.

१९५९ - मधुमती मधील "आजा रे परदेसी". 1963 - बीस साल बाद मधील "कही दीप जले कही दिल" 1966 - "तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा" खंडन मधील 1970 - जीने की राह मधील "आप मुझे अच्छे लगने लगे" 1993 - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1994 - हम आपके है कौन मधील "दीदी तेरा देवर दिवाना" साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..! 2004 - फिल्मफेअर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
📜 सन्मान
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.
✍️ लेखन
लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
📚 लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके
लता (इसाक मुजावर)
लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)
ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)
In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

🌸🙏 विनम्र अभिवादन🙏🌸

   ♾♾♾♾ ♾♾♾♾                    स्त्रोत~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖     
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

नरवीर तानाजी मालुसरे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे  
                                                                 
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩

                 नरवीर
    तानाजी काळोजीराव मालुसरे
         ( शिवरायांचे सरदार )


       जन्म : इ.स. १६२६
(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)

    वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०
   (सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)

टोपणनाव : तान्हाजी
अपत्ये : रायबा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.

🙎‍♂️ बालपण
                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.

🤺 कामगिरी
         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

🤺 नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई
                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.

संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :

दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.
                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.
                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.
संदर्भ - शिवभारत
            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.

🤺 कोंढाण्याची लढाई
                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.
                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 
 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.

🗽 तानाजीची स्मारके
                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

📚 पुस्तक

दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे
गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे
नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक
तानाजी (अमर चित्र कथा -६८२)
मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स
राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - प्र. के. घाणेकर
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे

🎖️ पुरस्कार

तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

🎞️ चित्रपट

▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.
▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.

 🚩 हर हर महादेव....! 🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

  🙏 विनम्र अभिवादन 🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾️
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

Good Thoughts

आजचे सुविचार 


Always try to represent yourself happy, because initially it becomes your look, gradually it becomes your habit, and finally it becomes your personality.

माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.

शब्द बोलताना शब्दांना धार नको, तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.

कोई भी रिश्ता आपके मर्जी से  नही जुडता, क्योकि आपको कब, कहा, किससे मिलना और बिछडना है, ये सिर्फ उपरवाला तय करता है ।

तुलना की खेल में मत उलझो, क्योकि इस खेल का कही कोई अंत नही, जहा तुलना की शुरुआत होती है, वहा से आनंद और अपनापन खत्म होता है ।

लोग कहते है, इंसान खाली हाथ आता है, और खाली हाथ जाता है, लेकिन ऐसा नही होता, इंसान भाग्य लेकर आता है, और अपना खुद का कर्म लेकर जाता है ।

स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात, ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जब कोई आपके सामने गुस्से से बात करे, तो उसे खामोशी के साथ गौर से सुनिये, क्योंकी गुस्से में इंसान अक्सर सच बोलता है ।

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा संध्याकाळ सारखा सुंदर असायला हवा, आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी.

💐Have a good day💐

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

कल्पना चावला

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
 संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
  ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                                                                         
   🔥🚀🛰🇮🇳🙎‍♀🇮🇳🛰🚀🔥

         कल्पना चावला


     जन्म : 17 मार्च 1962
          (कर्नाल, हरियाणा)
अंतराळात मृत्यू : 1 फेब्रुवारी   
                              2003
       (टेक्सासवर अंतराळात)

कल्‍पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

💁‍♀ बालपण
                  कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.

शिक्षण कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.

👫🏻 विवाह
            शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली.

🚀 कार्य
                   डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

🔭 कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र

कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. लाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.

कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.

या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.

‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्‍नशील असतात.

✈ *केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रम*

वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.

कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.

🔭 विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत
कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.

थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.

पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्‍न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.

🔮 कल्पना चावला यांचे मराठी सुविचार

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.

         🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾
          स्त्रोत - WikipediA       
➖➖➖➖➖➖➖➖➖     *🖥️महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक🖥️*
====================
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

लाला लजपतराय

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन :  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी, ता. जि. धुळे                                             
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥📝⛓️🇮🇳👦🏻🇮🇳⛓️📝💥                   
              पंजाब केसरी
           लाला लजपत राय

   जन्म : २८ जानेवारी १८३६
   (धुडीके, पंजाब, ब्रिटिश भारत)
    मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२९
    (लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अखिल भारतीय काँग्रेस, 
           हिंदू महासभा,आर्य समाज
धर्म : जैन
वडील : मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल
आई : गुलाबदेवी अग्रवाल
पत्नी : राधादेवी अग्रवाल
लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.
                  लाला लजपत राय  हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.

💁‍♂ सुरुवातीचे जीवन
          लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.
                  १८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राज आणि पंडित गुरु दत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.
                   हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी  केल्या.१८८४ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहटक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिस्सारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
          लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर या विद्यालयाचे रुपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्ये झाले.
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९१७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली. 

राष्ट्रवाद
          भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७ मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपत रायांची मंडाले, ब्रह्मदेशात  रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.

सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने
               १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.

🪔 मृत्यू
        निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपठीत करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.
                  पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या. या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  

📚✍️ लाला लजपत रायांनी लिहिलेली पुस्तके
यंग इंडिया 
द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय.
लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस, मॅझिनी, गॅरीबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे,
श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण
     
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬               संकलन :  श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
                                                 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
               📙📘📗
    भारतीय प्रजासत्ताक दिन

               📙📘📗

 प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... !!
                     🇮🇳🇮🇳🇮🇳

         भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.

🏇 इतिहास
                       भारताला  ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.
                     २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

🇮🇳 उत्सव
                  दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

सन २०१९ मध्ये, गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.

राष्ट्रीय सुट्टी
           २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

🚚 चित्ररथ
                   या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी प्रयत्न करते.

🏃‍♂ शालेय संचलन प्रजासत्ताक दिन
                  भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.

🏃‍♂ विशेष संचलन
                 स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.

🌹 संदेश व शुभेच्छापत्रे

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.

🤴 प्रमुख अतिथी

सन १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.

वर्ष       प्रमुख     अतिथी देश

१९५० - राष्ट्रपती सुकर्णो -  इंडोनेशिया

१९५१ – ----
१९५२ – ----
१९५३ – ----

१९५४ - राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक - भूतान

१९५५ - गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद - पाकिस्तान

१९५६ – ----
१९५७ – ----
१९५८ – ----
१९५९ – ----

१९६० - राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह - सोव्हियेत संघ

१९६१ - राणी एलिझाबेथ दुसरी - युनायटेड किंग्डम

१९६२ –  -----

१९६३ - राजा नोरोडोम सिहांनौक - कंबोडिया

१९६४ – -----

१९६५ - खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद - पाकिस्तान

१९६६ – -------
१९६७ – -------

१९६८ - पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन - सोव्हियेत संघ
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया

१९६९ - पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह -  बल्गेरिया

१९७० – ------

१९७१ - राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे -  टांझानिया

१९७२ - पंतप्रधान शिवसागर रामगुलाम - मॉरिशस

१९७३ - राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको -  झैर

१९७४ - राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो -  युगोस्लाव्हिया
पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके -  श्रीलंका

१९७५ - राष्ट्रपती केनेथ काँडा - झांबिया

१९७६ - पंतप्रधान जाक शिराक - फ्रान्स

१९७७ - प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक - पोलंड

१९७८ - राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि - आयर्लंड

१९७९ - पंतप्रधान माल्कम फ्रेझर -  ऑस्ट्रेलिया

१९८० - राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें - फ्रान्स

१९८१ - राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो - मेक्सिको

१९८२- राजा हुआन कार्लोस पहिला -  स्पेन

१९८३ - राष्ट्रपती शेहु शगारी -नायजेरिया

१९८४ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान

१९८५ - राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन - आर्जेन्टिना

१९८६ - पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु - ग्रीस

१९८७ - राष्ट्रपती ॲलन गार्शिया - पेरू

१९८८ - राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने - श्रीलंका

१९८९ - जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह - व्हियेतनाम

१९९० - पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ - मॉरिशस

१९९१ - राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम - मालदीव

१९९२ - राष्ट्रपती मारिओ सोआरेस - पोर्तुगाल

१९९३ - पंतप्रधान जॉन मेजर - युनायटेड किंग्डम

१९९४ - पंतप्रधान कोह चोक थोंग - सिंगापूर

१९९५ - राष्ट्रपती नेल्सन मंडेला -दक्षिण आफ्रिका

१९९६ - राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो - ब्राझील

१९९७ - पंतप्रधान बसदेव पांडे -  त्रिनिदाद आणि टोबॅगो

१९९८ - राष्ट्रपती जॅक शिराक - फ्रान्स

१९९९ - राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव - नेपाळ

२००० - राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो - नायजेरिया

२००१ - राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका - अल्जीरिया

२००२ - राष्ट्रपती कस्साम उतीम - मॉरिशस

२००३ - राष्ट्रपती मोहम्मद खातामी - इराण

२००४ - राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा - ब्राझील

२००५ - राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक - भूतान

२००६ - अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद - सौदी अरेबिया

२००७ - राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन - रशिया

२००८ - राष्ट्रपती निकोला सार्कोझी - फ्रान्स

२००९ - राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव - कझाकस्तान

२०१० - राष्ट्रपती ली म्युंग बाक -  दक्षिण कोरिया

२०११ - राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो -  इंडोनेशिया

२०१२ - पंतप्रधान यिंगलक शिनावत -  थायलंड
२०१५ - राष्ट्रपती बराक ओबामा - अमेरिका

२०१६ - राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद - फ्रान्स

२०१७ - राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान - संयुक्त अरब अमिराती
     
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

         🇮🇳 जयहिंद  🇮🇳

       ♾♾♾  ♾♾♾
         संदर्भ - WikipediA                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...