रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

सरोजिनी नायडू

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                           ⚜️✍📚🇮🇳👨🏻🇮🇳📚✍⚜️

           भारतिय कोकिळा
             सरोजिनी नायडू


     जन्म : 13 फेब्रुवारी 1879        
          (हैद्राबाद, आंध्रप्रदेश)
     मृत्यु : 2 मार्च 1949
         (अलाहाबाद, उत्तरप्रदेश)

पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू
मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि
विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज
नागरिकत्व  : भारतीय
पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद
रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग

भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.

सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतिय महिला होत्या.

भारतिय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.

सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.

💁🏻‍♀ महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण
                            भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.

स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.

बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.

बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.

पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
               त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.

👫🏻 सरोजिनी नायडुंचा विवाह
                        भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.
                    1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.
                      हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.
                      सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.

सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका
                    सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.

कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.

1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.
                   त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
             गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.
              1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.
                      सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.
                अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.
                   1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
                       1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी  रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.
                     या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.

राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू
                       सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
          त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.
                           एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.

🕯 सरोजिनी नायडूंचा मृत्यु
             देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.
                   अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.
                13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.

सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान
             सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.
              ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.

प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.

द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.

🔮 सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती
              वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.
               1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.
1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.
1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.
              🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾️♾️♾️ ♾️♾️♾️ 
स्त्रोत ~ mazimarathi.com                                                                                                                                                                                                                                                      ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

महादजी शिंदे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➿➿➿➿➿➿➿➿➿
🤺🏇⛓🚩👳‍♀️🚩⛓🤺🏇
              द ग्रेट मराठा                            
                                                           
             महादजी शिंदे

           जन्म : इ.स. १७३०

      मृत्यू : १२ फेब्रुवारी १७९४

पिता/माता : सरदार रानोजी राव शिंदे, चीमा बाई
राज्याभिषेक : 18 जनवरी 1768 ई.
युद्ध : द्वितीय मराठा युद्ध- 1803 ई.-1806 ई.
शासन काल : 18 जनवरी 1768 ई.-12 फरवरी 1794 ई.
धर्म : हिन्दू

                       महादजी शिंदे हे पेशवाईतील एक मुत्सद्दी. होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

🤺 सैनिकी कारकीर्द

महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.

उत्तर भारत

१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.

मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.

🔮 ग्वाल्हेरचे शासक

जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.

🎠 पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द

पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.

🤺 पहिले इंग्रज-मराठा युद्ध

१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.

🏇 वडगावची लढाई

१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.

१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली

सिप्री येथील हार

ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, कर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं  बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.

सालबाईचा तह १७ मे १७८२

मुख्य पान: सालबाईचा तह
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.

इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾️♾️♾️  ♾️♾️♾️ 
         स्त्रोत ~ WikipediA                                            
➖➖➖➖➖➖➖➖➖    
🇲 🇹 🇸   🇲 🇹 🇸  🇲 🇹 🇸
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

Good Thoughts

आपले आयुष्य इतके छान, सुंदर, आणि आनंदी बनवा की, निराश झालेल्या व्यक्तींना तुमच्याकडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळायला पाहिजे.

When life gives you hundred reasons to cry,  show to life that you have thousand reasons to smile.

नाते कधीच संपत नाही, बोलण्यात संपले तरी डोळ्यांत राहते, आणि डोळ्यांत संपले तरी मनात मात्र कायम राहते.

स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तेथेच माणुसकीचे सुंदर नाते तयार होते.

सहजता से निभे, वे ही रिश्ते सुखद होते है, जिन्हे निभाना पडता है, वो केवल दुनियादारी होती है ।

जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, तर काही आधार देतात, मात्र फायदा घेणारे डोक्यात, रहातात आणि आधार देणारे हृदयात राहतात.

आपके पास कितने सारे मित्र है उससे कोई फरक नही पडता, जरूरत पडने पर कितने काम आएंगे, वो महत्वपूर्ण है ।

लोकांचा जास्त विचार करणे सोडून द्यायला शिका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला लोक हसतात, आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे त्याच्यावर जळतात.

भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टींना विसरून, आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन क्षणांचे हसत स्वागत करणे म्हणजेच खरी सकाळ असते.

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

भारतरत्न लता मंगेशकर

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
                
      ➿➿➿➿➿➿➿➿➿           📜🎙️🎥🎧👩‍🦰🎤🎧🎬📜                                                              भारतरत्न लता मंगेशकर
           (एक महान गायिका)

टोपणनावे : लतादीदी
जन्म : २८ सप्टेंबर १९२९
(इंदूर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत)
मृत्यू : ६ फेब्रुवारी, २०२२ (वय ९२)
(मुंबई, महाराष्ट्र)
धर्म : हिंदू
नागरिकत्व : भारतीय
मूळ गाव : मंगेशी, गोवा
भाषा : मराठी, हिंदी भाषा
आई : शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर)
वडील : मास्टर दीनानाथ मंगेशकर
नातेवाईक : आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
मीना खडीकर
संगीत साधना
गुरू : दीनानाथ मंगेशकर
गायन प्रकार : कंठसंगीत गायन
संगीत कारकीर्द
कार्य : पार्श्वगायन, सुगम संगीत
पेशा : पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ : इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी : गानकोकिळा
पुरस्कार : भारतरत्न(२००१)        लता मंगेशकर  या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
    लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.

त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.

लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
💁🏻‍♀️ बालपण
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.दीनानाथांचे वडील कर्हाडे ब्राह्मण व आई देवदासी (गोमंतक मराठा) होती.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूर ला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.
 🎥 चित्रपटसृष्टीत कारकीर्द
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.

इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
🔮 १९५० च्या दशकात उत्कर्ष
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.

इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.
🔮 इ. स. १९६० चे दशक
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.

२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.

इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतातले उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

1970 चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.

तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट.                      1970 च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970 च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीती ना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले.

1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती.

लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे.

1970 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग".

1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले.

चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते.

1970 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या दशकाच्या सुरूवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता.
त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली.

1980 चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले.

1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली.

नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले.   1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.

1980 च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी की ना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने".
या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुम ना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहीं ना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मन ना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादा ना तोड", नंतर 2004 च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.

बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत).

मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80 च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां".
80 च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली.                      (1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी.

जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले.
1990 चे दशक 1990 च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले.

लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली.

लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत.

1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता.

चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004).

1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999).

एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली.

पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली.

1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वत:च्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत.

मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछ ना कहो" गायले: एक प्रेम कथा.

1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला.           त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे.

2000 चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.

2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला.

तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती.

लता मंगेशकर यांचे "वादा ना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला.
2010 चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत.

14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से".
पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ... ना जाने क्यूं.

28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले.
2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते.

30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले.

1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, ​​महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्‍ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले.

1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले.                1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला.त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले.
1990 च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरूवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते.

2000 च्या दशकात, लतादिदीनी  युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी: नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे.
गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960 च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले.

1960 - राम राम पावना 1963 - मराठा तितुका मेळवावा 1963 - मोहित्यांची मंजुळा 1965 - साधी मानसे १९६९ - तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील "ऐरनिच्या देवा तुला" या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. १९५३ - वादळ (मराठी) १९५३ - झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती १९५५ - कांचन गंगा (हिंदी) १९९० - लेकीन... (हिंदी)

भारत सरकारचे पुरस्कार संपादन १९६९ - पद्मभूषण १९८९ - दादासाहेब फाळके पुरस्कार १९९९ - पद्मविभूषण 2001 - भारतरत्न 2008 - भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त "वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट" सन्मान .

🎞️ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार                  
1966 - साधी मानसासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1966 - 'आनंदघन' नावाने साधी मानस (मराठी) साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक 1977 - जैत रे जैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 1997 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2001 - महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता).

⚜️ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार                        पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. तिला या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे.

1972 - परिचय चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1974 - कोरा कागज चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 
1990 - लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार...                  पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली.

1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सोडण्याचा असामान्य हावभाव केला.

१९५९ - मधुमती मधील "आजा रे परदेसी". 1963 - बीस साल बाद मधील "कही दीप जले कही दिल" 1966 - "तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा" खंडन मधील 1970 - जीने की राह मधील "आप मुझे अच्छे लगने लगे" 1993 - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1994 - हम आपके है कौन मधील "दीदी तेरा देवर दिवाना" साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..! 2004 - फिल्मफेअर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
📜 सन्मान
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.
✍️ लेखन
लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
📚 लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके
लता (इसाक मुजावर)
लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)
ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)
In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

🌸🙏 विनम्र अभिवादन🙏🌸

   ♾♾♾♾ ♾♾♾♾                    स्त्रोत~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖     
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

नरवीर तानाजी मालुसरे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे  
                                                                 
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🤺🚩🇮🇳👳‍♀️🇮🇳🚩🤺🚩

                 नरवीर
    तानाजी काळोजीराव मालुसरे
         ( शिवरायांचे सरदार )


       जन्म : इ.स. १६२६
(जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)

    वीरमरण : ४ फेब्रुवारी १६७०
   (सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत)

टोपणनाव : तान्हाजी
अपत्ये : रायबा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सरदार होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.

🙎‍♂️ बालपण
                   सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडवली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.

🤺 कामगिरी
         अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

🤺 नरवीर तानाजी मालुसरेची एक अपरिचित लढाई
                  तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते. सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे. परंतु त्याने केलेल्या इतर पराक्रमांविषयी सर्व सामान्यांना अजिबातच माहिती नाही. तानाजी मालुसरेचे संगमेश्वरचे युद्ध हे असेच अपरिचित युद्ध आहे. या युद्धाला हवे आहे तेवढे महत्त्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही. हा तानाजींवर झालेला अन्यायच आहे.

संगमेश्वरी असतांना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्यादरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते. त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन पुढीलप्रमाणे :

दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर काबीज झाले, राजापूर लुटले गेले. ह्या बातम्या धडाधड आदिलशाहाच्या कानावर आदळत होत्या. तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला. त्याने लगेच शृंगारपूरच्या सूर्याजीस आदेश केला. तो त्याला म्हणाला_ "तो (शिवाजी महाराज)आमचा उघड शत्रू, राजापुरावर चालून जात असताना त्यास तू का अडविले नाहीस? असो ते जाऊ दे, तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे. तेव्हा त्यास तेथे अडव व त्याच्याशी युद्ध कर,'. आदिलशाहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघडउघड शत्रुत्व धारण केले.
                        तेव्हा सूर्याजीं सुर्वे शृंगारपूरला होता. त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला. संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते. या अल्पशा सैन्याला सूर्याजीच्या सैन्याने चोहो बाजूंनी घेरले. शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावाकडे दिले होते. आपले सैन्य शत्रूने चारही बाजूंनी घेरले आहे, असे जेव्हा पिलाजीला समजले तेव्हां पिलाजीं फ़ार भयभीत झाला. शत्रूला सामोरे जाऊन त्याच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांनी योग्य ठरवले. ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले. तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिलाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जातांना तानाजी मालुसरेने पाहिले. तानाजींसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते. तानाजीने भ्याड पिलाजीला पळताना पाहताच त्याचा पायीच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला. तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाला_ "या युद्धात मी तुझा साह्यकर्ता आहे. तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस, ही खरच खेदाची गोष्ट आहे. आजपर्यंत तू तुझ्या परराक्रमांच्या एवढ्या बढाया मारत होतास त्या सगळ्या बढाया कुठे गेल्या? ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठेपण व सन्मानाची देऊन सांभाळले, तू त्यांचा सरदार असतांनाही सैन्य टाकून स्व:तच पळून जातोयस? आणि याची तुला खंतही वाटत नाही...." असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले. पिलाजीं घाबरलेला पाहुन तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिंमत खचेल. त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा कैदेतच ठेवणे योग्य असा विचार करून तानाजीने पिलाजीला जवळच असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले. पिलाजीला दगडाला बांधुू ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्व:तच सैन्याचे नेतृत्व केले.
                     तानाजीने व त्याच्या सोबती मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसाव केला. आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिळकांड्या उडणार तोच मराठ्यांच्या मागच्या तुकडीने तानाजीच्या रक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रुची तुकडी घायाळ झाली आणि याचा फ़ायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणांचा वर्षाव करी व बाणांनी जखमी झालेल्या शत्रुच्या सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत. मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या व धडापासून मुंडके वेगळे पडलेल्या शवांचे ढीगच्या ढीग मावळ्यांनी रणांगणात रचले. शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले. त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युध्दातुन पळ काढला. शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोबती मावळ्यांचा या युध्दात विजय झाला.
संदर्भ - शिवभारत
            स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन तो राहिला होता. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.

🤺 कोंढाण्याची लढाई
                स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा तो स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होता. त्याने ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. तो कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाला. *"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."*  हे त्याचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.
                      कोंढाणा गडावरचा किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
           तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजीला त्याच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले  "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' 
 (पोलादपूरजवळ)  या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले.

🗽 तानाजीची स्मारके
                    तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.
रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.

📚 पुस्तक

दुर्ग सिंहगड - आनंद पाळंदे
गड आला पण सिंह गेला - ह.ना. आपटे
नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) - पंडित कृष्णकांत नाईक
तानाजी (अमर चित्र कथा -६८२)
मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स
राजाशिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - पुरंदरे प्रकाशन
सिंहगड - प्र. के. घाणेकर
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे - दत्ताजी नलावडे

🎖️ पुरस्कार

तानाजीच्या नावे शिवाजी ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

🎞️ चित्रपट

▪️"तान्हाजी : द अनसंग वाॅरिअर" (हिंदी चित्रपट, सन २०२०, तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण); दिग्दर्शक - ओम राऊत.
▪️यापूर्वी १९५२ साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला 'नरवीर तानाजी' हा मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.

 🚩 हर हर महादेव....! 🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

  🙏 विनम्र अभिवादन 🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾️
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

Good Thoughts

आजचे सुविचार 


Always try to represent yourself happy, because initially it becomes your look, gradually it becomes your habit, and finally it becomes your personality.

माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते.

शब्द बोलताना शब्दांना धार नको, तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.

कोई भी रिश्ता आपके मर्जी से  नही जुडता, क्योकि आपको कब, कहा, किससे मिलना और बिछडना है, ये सिर्फ उपरवाला तय करता है ।

तुलना की खेल में मत उलझो, क्योकि इस खेल का कही कोई अंत नही, जहा तुलना की शुरुआत होती है, वहा से आनंद और अपनापन खत्म होता है ।

लोग कहते है, इंसान खाली हाथ आता है, और खाली हाथ जाता है, लेकिन ऐसा नही होता, इंसान भाग्य लेकर आता है, और अपना खुद का कर्म लेकर जाता है ।

स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात, ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.

जब कोई आपके सामने गुस्से से बात करे, तो उसे खामोशी के साथ गौर से सुनिये, क्योंकी गुस्से में इंसान अक्सर सच बोलता है ।

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा संध्याकाळ सारखा सुंदर असायला हवा, आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी.

💐Have a good day💐

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

कल्पना चावला

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
 संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
  ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                                                                         
   🔥🚀🛰🇮🇳🙎‍♀🇮🇳🛰🚀🔥

         कल्पना चावला


     जन्म : 17 मार्च 1962
          (कर्नाल, हरियाणा)
अंतराळात मृत्यू : 1 फेब्रुवारी   
                              2003
       (टेक्सासवर अंतराळात)

कल्‍पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

💁‍♀ बालपण
                  कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.

शिक्षण कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.

👫🏻 विवाह
            शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली.

🚀 कार्य
                   डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

🔭 कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र

कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. लाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.

कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.

या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.

‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्‍नशील असतात.

✈ *केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रम*

वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.

कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.

🔭 विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत
कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.

थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.

पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्‍न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.

🔮 कल्पना चावला यांचे मराठी सुविचार

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.

         🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾
          स्त्रोत - WikipediA       
➖➖➖➖➖➖➖➖➖     *🖥️महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक🖥️*
====================
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...