गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

महाराणी ताराबाई भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :   श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                            
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🚩🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🏇🤺🚩
   
         महाराणी ताराबाई
        राजारामराजे भोसले


    जन्म : 14 एप्रिल 1675
         (जन्मस्थान : तळबिड)

    मृत्यू : 9 डिसेंबर 1761
         (मृत्यूस्थान : सिंहगड)

उपाधी = महाराणी.
राज्यकाळ : १७०० - १७०७
राज्याभिषेक : इ.स. १७००
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी : पन्हाळा
पूर्वाधिकारी : छत्रपती 
                  राजारामराजे भोसले
उत्तराधिकारी : शाहू भोसले
वडील : हंबीरराव मोहिते
राजवंश : भोसले
राजचलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१)  ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
                 राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
                      करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे.

💠 कारकीर्द
                  घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.

ताराबाई
                  वास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली..

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.

राजकीय परिस्थिती
                       सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

🌀 कारकीर्द

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.

सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.मराठी राज्याच्या अडचणीच्या काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबसारखा बलाढ्य शत्रू आपल्याच राज्यात आलेला असताना एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. राज्याला,गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले. सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६ व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारुन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम महाराणी ताराबाई यांनी केले. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामां नतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली. 

👑 राजाराम
                  वास्तविक सन १७०३ साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.
                     सन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.
                   ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.
त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

             कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

📙 पुस्तके

महाराणी ताराऊसाहेब (अशोकराव शिंदे सरकार)

   हर हर महादेव......!!!     

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

संत जगनाडे महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील        
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿         📜✍️🚩🚩👳‍♀🚩🚩📜✍️
              संत शिरोमणी
  श्री संताजी जगनाडे महाराज


     जन्म : ८ डिसेंबर १६२४
 ( सदुंबरे, मावळ, पुणे, महाराष्ट्र )
    निधन : ११जानेवारी १६८८

वडील : विठोबा जगनाडे
आई : माथाबाई
         हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.

💁‍♂ बालपण
              संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यां पैकी एक झाले.

🔱 विवाह
         संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

🤝 गुरुभेट
         त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

गाथांचे पुनर्लेखन
                  संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.

🪔 इहलोकाचा त्याग
                    शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु संत तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

संताजी जगनाडे ऊर्फ संतू तेली यांनीही तुकारामाप्रमाणेच काही अभंग लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :-

📝 संताजी महाराजांचे अभंग

★☆ संत श्री संताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग ☆★

》》》भाग-1《《《 
             {क्र. 1 }
 माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिची धनी पुरवावया ।। 1 ।। माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।। 2 ।। संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येर गबाळाचे काम नाही ।। 3 ।।

          {अभंग क्र. 2}
एकादशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ।। 1 ।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ।।2।।
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
अलिँगन देता झाला त्याशी ।।3।।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।4।।
     
           {अभंग क्र.-3}
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। 1 ।।
काय तुझ्या मागेँ कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ।।2।।
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
जन्म पाठिमागा का गेला ।।3।।
तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।। 4

           {अभंग क्र.-4}
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।
आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। 1 ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी ।
पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। 2।।
संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।
आपुले ते मन सुधारले ।। 3 ।।

           {अभंग क्र.- 5}
भक्ति ते माऊली माझे नच पोटी ।
जाणे उठा उठी देवराया ।। 1 ।।
भक्ति या भावाची करुनिया लाट ।
आलिंगितो तीस राञंदिन ।। 2 ।।
संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद ।
द्यावा वारंवार मजलागी ।। 3 ।।

》》》भाग-2《《《
              {क्र.6}
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।1।।
मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।2।।
किर्तीविणा कांही मागे ते राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ।।3।।

                  {क्र.7}
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।1।।
त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही ।
प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।2।। संतु म्हणे असा अंभग गाइला ।
पुढे चालु केला देहावरी ।।3।।

                {क्र.8}
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही ।
निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।1।।
तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही ।
जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।2।।
असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाही आला कदा काळी ।।3।।
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ।।4।।

                {क्र.9}
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो ।
तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।1।।
नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।2।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे ।
स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।3।।
                {क्र.10}
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।
नंदी जोडियला मन पवनाचा ।।1।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली ।
शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।2।।
सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।
प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।3।।
फेरे फिरो दिले जन्मवरी ।
तेल काढियले चैतन्य ते ।।4।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले ।
म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।5।।

》》》》भाग - 3《《《《
                 {क्र.11}
देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा ।
गुदस्थान जाणा उखळ ते ।।1।।
स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।
विदुं दंत चक्र आनु हात ।।2।।
एकविस मनी खांब जो रोविला ।
सुतार तो भला विश्वकर्मा ।।3।।
मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले ।
तेल हाता आले सुटे मन ।।4।।
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।
चालवि आपोआप पांडुरगं ।।5।।

                {क्र.12}
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।1।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।2।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही । शोधुनिया पाही संतु म्हणे ।।3।।

                 {क्र.13}
निदंक हा घाणा म्हणावा तो जरी ।
शुभ कार्या आधिं भरतात ।।1।।
श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।
म्हणवेना कोणा निंदक तो ।।2।।
संतु म्हणे म्या तो घाणा भरियला । सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।3।।

              {क्र.14}
आणिक तो घाणा कोणता सादर ।
सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।1।।
ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे ।
दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।2।।
संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।
सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।3।।

               {क्र. 15}
घाण्याचा कर करा पुसलासी मज ।
तरी तुकयाचा गुज सांगू आता ।।1।।
दशनाद होती सर्वाँचे ब्रम्हांडी ।
तुझे काय पिँडी वाजताती ।।2।।
संतु म्हणे घाण्याचा करकरा ।
दशनादाचा तो खरा जगा माजी ।।3।।

     》》》भाग - 4《《《
                 {क्र.16}
आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून ।
दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।1।।
त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून ।
सरकायासी जागा नाही मुळापासून ।।2।।
संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी ।
जग भुलव्या नारी खय्राच ह्या ।।3।।

               {क्र.17}
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी ।
आणिक नारदाशी त्याच रीती ।।1।।
ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी ।
तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।2।।
संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशी देहातुनी ।।3।।

                {क्र.18}
हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।
हाकलुनि दिल्या घरातुनी ।। 1 ।।
अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।
गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।
सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।3।।
 
                {क्र. 19}
पाचरीनी प्रताप दाखविला शंकरा ।
भुलवोनी गेला भिल्लीनीशी ।। 1 ।।
विश्वामिञासी रंभेने कुञा बनविला।
मागे मागे नेला घराप्रती ।।2।।
संतु म्हणे अशा घाण्याच्या पाचरी । दाखविल्या चारी सद्गुरुजिनी ।।3।।

                  {क्र.20}
सद्गुरुवाचोनी दाखविना कोणी ।
संसार मोहनी पडली असे ।। 1 ।।
संसार करुनि पाचरी ओळखिल्या ।
उध्दरुनि नेल्या तुकोबाने ।।2।।
संतु म्हणे माझ्या सद्गुरुच्या कृपेने ।
पाचरी बसविल्या घाण्यामाजी ।।3।।

      》》》भाग - 5《《《
                  {क्र. 21}
मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।1।।
आगांवरि घेऊनि नेट । दाखवि ।
दाखवि वैकुंठीची वाट ।।2।।
अशी ही संतु तेल्याची लाट ।
कळिकाळाची .... फाट ।।3।।

                  {क्र.22}
लाट उचलली जगामधी कोणी ।
मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।1।।
वाल्मीकानी आणि शवरिनी ।
अर्जुनानी आणिक सुदामानी ।।2।।
लाट उचलली भक्तीची । संतु तेल्याचे मुक्तिची ।।3।।

                 {क्र.23}
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।
उचलितो कोण देउनिया नेट ।।1।।
नेट तो दिधला लंकेचे रावणे ।
उचलेना तेने कदापिहि ।।2।।
संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ।।3।।

                 {क्र.24}
सुदामाशी शक्ति काहीच नव्हती ।
रावणाशी होती पुष्कळच ती ।।1।।
रावणा उचलेना सुदामा उचली ।
मती गुंग झाली रावणाची ।।2।।
संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी ।
लाट ही उचलेना कदाकाळी ।।3।।

                  {क्र.25}
लाठ माझी माता लाठ माझा पिता ।
लाठी विना कांता विद्रुपची ।।1।।
लाठी हीने मजला दिधली ती लाट ।
चुकवीली वाट जन्ममरणाची ।।2।।
संतु म्हणे उचला घाण्याची ती लाट ।
व्यर्थची खटपट करु नका ।।3।।

》》》》भाग-6《《《《《
               {क्र. 26}
मन मोहाची करुनि खुटी ।
लाठीस ठोकली बळकटी ।।1।।
फिरे गरगरा लाठी भोवताली ।
ध्यान जाईना लाठीवरी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी ।
पहा उठाउठी अगोदर ।।3।।

                 {क्र.27}
खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।
दशरथ राजाला आणि नारदाला ।।1।।
दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।
नारद तो झाला नारदीच ।।2।।
संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।
विश्वाच्या तोलाची एकटीच ।।3।।

                {क्र.28}
खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे ।
मनी नाही आले अगोदर ।।1।।
आता तरी सावध व्हारे लवकरी ।
खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।2।।
संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या ।
खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।3।।

                 {क्र.29}
खुंटिने प्रताप कैकईस दाखविला ।
वनवासा राम गेला गादी दिली भरताला ।।1।।
भरतानी त्याग केला पादुकास मान दिला ।
दुःखते होतसे कैकईच्या जिवाला ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुंटी ।
केली तुटा तुटी मायलेका ।।3।।

              {क्र.30}
अशिया खुंटिला धरु नये हाती ।
करिल ती माती सर्वञांची ।।1।।
असेच खुंटिने गोपिचंदन फसविले ।
धातुचे पुतळे जळोनिया गेले ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी ।
सद्गुरुवांचोनी सोडविना मिठी ।।3।।

》》》》भाग - 7《《《《
                 {क्र.31}
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।1।।
काळ मोडुन टाकिल मुंडी ।
कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।2।।
सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ।।3।।

                  {क्र.32}
शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।1।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले । कधी नाही भ्याले राञंदिन ।।2।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी । जोड ती करावी विठ्ठलाची ।।3।।

                  {क्र.33}
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची ।
नारद मुनिची असेच कीं ।।1।।
जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना ।
तेव्हां ती कडाडे आपोआप ।।2।।
संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे ।
शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।3।।

                {क्र.34}
आणिक शेँडीने फसविलेँ कोणा । रावणाच्या भावा कुंभकर्णा ।। कुंभकर्णाशीँ होती झोँप फार । तेणेँ तो आहार फार करी ।। संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी । कुळक्षय लाशी आपोआप ।।

                   {क्र.35}
झोँपेँत असतांना दिले दान । राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।। भार सुवर्ण होईना तेँ पुरे। पुरे सर्व देऊन घेतलेँ स्वतःस विकून।। संतु तेली म्हणे हो म्हणेही झोँप। हिचा सर्वाहीँ करा करा कोप।।

》》》》भाग - 08《《《《
                 {क्र.३६ }
मनोसुविचारी करुनि कातर। शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।। 
लाटिचा आधार तिला फार हो लाठि। फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।। 
मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ । संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।

                {क्र.३७}
कातरिनेँ कातरला दुष्टांचा तो गळा । सावत्याचा मळा सांभाळला।। 
कातरीने कातरला रावणाचा मळा । लंकेचा डोँबाळा तिनेँ केला ।। 
संतु म्हणे कातर आणिल जो ध्यानीँ। आवडेल तो प्राणी सर्व जगा ।।
                 {क्र. ३८}
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।। 
आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।। 
संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
 
                   {क्र.३९}
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ । सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।। 
आणिक शत्रुध्न भरत धरियला । सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।। 
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली । मोडोनिया गेली आपोआप ।।

               {क्र.४०}
कातर मोडली कोणाचिये हाते । तारामती आणि हरिचंद्र मते ।। 
तशीच कातर कोणी ते मोडली । आनुसया आणि सती सावित्रीनी ।। 
संतु म्हणे माझे घाण्याची कातर । फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।

》》》》भाग - 09《《《《
                 {क्र. ४१}
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।। 
तिच जन्म मरणाचे मुळ। असेँ माझेँ सांगणे समुळ।। 
संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे । तेथेँ यम पाश उभा राहे ।।

                   {क्र.४२}
असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।। 
आणिक कोणाशीँ लागला तो पाश । मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।। 
संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ । नरकाचे डोही जाऊं नका।।

                  {क्र.४३}
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।। 
सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतेँ तिळगुळ यमा हाती।।

                {क्र.४४}
क्षमा शांती जया नराचिये देहीँ । दुष्ट तया कांही करीत नाही ।। 
जरि ही कोणाशीँ राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।। 
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजाची ।।

                  {क्र.४५}
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।। 
आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।। 
संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।

》》》》भाग - 10《《《《
                 {क्र. ४६}
सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।। 
मन पावन ओढी जोरानेँ। मग तो घाणा चाले मौजेने ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी।।

               {क्र. ४७}
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।। 
मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ । हाता काय आलेँ काळकुट ।। 
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची।।

                  {क्र.४८}
आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।। 
घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।। 
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी।।

                   {क्र.४९}
मारुतीस वढ दिली रामचंद्राने । तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।। 
कर्णानेँही दिली सारथी शल्यास । आणिक ती दिली धर्मानीँ कौरवांस ।। 
संतु म्हणे ही वढ जो जाणील । तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।

              {क्र.५०}
अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।। 
मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।। 
संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।।

》》》》भाग - 11《《《《
                  {क्र. ५१}
संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।। 
तुकाचे नावेँ फोडी खडे। विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।। 
संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट सर्वाँलागीँ ।।

                   {क्र. ५२}
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।। 
म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड । संसारात जोड करि कांही ।। 
संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड । करा कांही जोड देवाजाची ।।

              {क्र. ५३}
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।। 
देवाची करिना कधी जोड । हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।। 
संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।

                 {क्र. ५४}
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।। 
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।। 
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।

                 {क्र. ५५}
जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ । आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।। 
फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी । मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।। 
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस । सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।

》》》》भाग - 12《《《《
                  {क्र.५६}
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।। 
तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।। 
संतु म्हणे हा मोठा बोका। मस्तकी बाहुली ठोक ।।

               {क्र.५७}
मत्सर धरियला जगांमध्येँ कोणी । सत्यभामा रुक्मिणी ।। 
भांडण ते केलेँ कृष्ण या देवासी । फुल पारिजातक मिळवावयासी ।। 
संतु म्हणे हा मत्सर । जगामध्येँ महा चोर जगामध्येँ ।।

                {क्र.५८}
आणिक मत्सर धरियला कोणी । सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।। 
भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं । गादी भरताशी मिळावया ।। 
संतु म्हणे हा मत्सर । तुकोबाचे घरचा केर।।

                 {क्र.५९ }
आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।। 
हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।। 
संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।।

               {क्र.६०}
आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।। 
गौरोबानेँ हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।। 
संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।

》》》भाग - 13《《《
             {क्र.६१}
औट हाताचे बाहुले करुन । घाण्या भोँवती फिरे पाहुन ।। 
प्रपंच जोखड शिरीँ घेऊन । चाले मन पवन आनंदाचे ।। 
संतु म्हणे हेँ बाहुले । जन्मवरी करी हुल हुल ।।

                {क्र.६२}
अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।। 
केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच । आखेर बैमानी झालेच ते ।। 
संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।

              {क्र.६३}
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ।पुष्कळच ते धन मिळविलेँ ।। 
आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ।रांडा आणि पोरां आवघ्याशीँ।।
संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ । मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।

              {क्र.६४}
तुझिया सांगातीँ येते कांही कांही। कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
सोयरा न येतोँ बंधू ही येईना।। येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।। 
संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ। आठवा वनमाळी रात्रंदिन।।

               {क्र.६५}
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।। 
सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।। 
संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।

  》》》भाग - 14《《《
              {क्र.६६}
सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ।
आवघ्या जनानोँ सावध व्हारे।। काळाचिये उडी पडेल बा जेव्हां।
सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला। देहासहित गेला तुकावाणी।।

                {क्र.६७}
मन पवनाच्या करूनि नंदी।
पाहूनि संसारामधीँ संधीँ।। जोखड घेऊनियां खांदी।
भ्रमाची झांपडी बांधी।। संतु तेली म्हणे हा नंदी।
करितो सर्व जगाची चांदी।।

               {क्र.६८}
मन हेँ ओढाळ गुरु फार आहे।
परधन पर कामिनीकडे धांवेँ।। असेच हे मन राहिना हो स्थिर।
नेहमीँ हुरहुर लागली असे।।
संतु म्हणे मन करा तुम्हीँ स्थिर।
राऊळा आंगणीँ जाऊनियां।।

              {क्र.६९}
मनाला तो बोध रामदासांनेँ केला।
उपदेश दिला जगामाजीँ।। चंचल हेँ मन धांवेँ सैरावैरा।
यानाच मातेरा केला देहाचा ।। संतु म्हणे मन लावा देवावरी।
विठ्ठल विटेवरी उभा असे।।

                {क्र.७०}
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलोँ जाणा घरीँ जाता।। संतु म्हणे तुम्हा सांगतोँ मी वेळीँ।
आयत्या वेळीँ कांही होणेँ नाहीँ।।

     》》》भाग -15《《《
                    {क्र.७१}
पवन तो नंदी असे शंकराचा।आणीक बळीचा शेतकिचा ।।
नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार।कळेना तो पार कोणासही।। संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां।दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।

                 {क्र.७२}
घेऊनिया घाणा तेल काढियले।गि-हाइक संत मंडळीचे आले।। कसे देतां तेल सांगावे संताजी।तुम्ही काय घेता घेणार तो तुका।। संतु म्हणे तेल जो कोणी घेईल।कानीँ तेँ फुंकिल बाबाजी महाराज।।

                {क्र.७३}
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो।तुका वाणी येतो घ्यावयास।। घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत। गळ्यांत जो आहे त्यांतही घाला।। संतु म्हणे तेल घालुनि उरले।मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे।।

             {क्र.७४}
आणीक हे तेल घेतलेँ कोणी।निवृत्ती ज्ञानेबांनी आणि सोपानानी।। मुक्ताबाईनी आणि एकनाथजिनी।तेल हे घेतलेँ नामदेवाजिनी।। संतु म्हणे तेल कोणी जो घेईल।दुकाना येईल विठलाच्या।।

                   {क्र.७५}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी।गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ।। तसेच घेतले नरहारी सोनारानीँ।कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।। संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल। त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग।।

    》》》भाग - 16《《《
                 {क्र.७६}
आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी । सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
तसेच हे तेल घेते जनाबाई । मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।
संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ । पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।

               {क्र.७७}
संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा।आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही । मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।। 
संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही।पांडुरंग पायीँ धरियलेँ।।

               {क्र.७८}
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा।
कानाडी कानड्याचा,मुसलमान तो दिल्लीचा।।
मराठी महाराष्ट्राचा । कोँकणी कोकणचा ।।
संतु तुका या देशीचा ।
वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका ।
विठल चरनीँ वाहु बुका।।

                {क्र.७९}
देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार।
दोहीँचा विचार एकपणेँ।। भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे।
देव त्यांच्या संगे सुख भोगी।। देवेँ भक्तारूप दिलासे आकार।
भक्ती त्याचा परिवार वाणिला।। एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण ।
देव भक्तपण स्वामी सेवा।। संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव।
भक्त तोचि देव देव भक्त।।

              {क्र.८०}
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे।
एक उभा राऊळा आंगणीँ।। एक घाना बैसे जाऊनि।
एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।।
एका आंगा लाविले गंध।
एका अंगा येई सुगंध।। एक वाजवितो विणा ।
एक दाखवितो खुणा।।
एक म्हणतो अभंग ।
एक म्हणे पांडुरंग।। संतु म्हणे एक जीँव।
दोहोँ कुडी दिला ठाव।।

      》》》भाग -17《《《
                   {क्र.८१}
एक कुडी वोष्णवाची । एक कुडी ती स्नेहाची ।।
एका कुडी घातलेँ शिट। एक कुडी दिसे तेलकट ।। 
एके कुडी घातली माळा।एकीचा रंग दिसे सावळा ।। 
संतु म्हणे कुडी टोपन। हिचे करूं नका जोपन।।

                 {क्र.८२}
आमचीँ तीँ रूपेँ दिसतात दोन । परि पाहीँ मन सारखेच ।।
नावाच्या अक्षरांची करितां ताडातोडी । परि तेही जोडी होय पून्हां ।। 
संतु म्हणे ह्याचे कारण तेँ कांही। शोधुनियां पाहीँ ग्रंथांतरी।।

                  {क्र.८३}
आम्ही तोँ आहोँत या देशीचे वाणी।
आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्हीँ।। तुका विकी सौदा आणिक मिरची।
संतु विकी तेल लागुनि चुरशी।। तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे।
तुकयाशी खुण पटली असे।।

              {क्र.८४}
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण।
तुजलागी ज्ञान फार आहे।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक।
मजलागी देख कळो आलेँ।। ज्ञानाचा सागर होशील तूं योगी।
नेणती हेँ जगीँ मूढ जन।। तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान।
ऐकतां वचन गोड लागे।।

                 {क्र.८५}
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता।काय तुज आता सांगू वर्म।। किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय।। यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा।। संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।

         🚩 गुरुमाऊली 🚩

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत - Wikipedia                                                         ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक युगपुरूष - प्रा. डाॅ. विजय शिरसाठ

Preparing_For_Life

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे येथे आज #महापरिनिर्वाण_दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव, जि. जळगांव येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. विजय शिरसाठ (M.A., B.Ed., M. Phil., SET, NET, Ph. D.) यांनी डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_एक_युगपुरूष या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या व ओघवत्या भाषेत त्यांनी जवळजवळ एक तास मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार पटवून देण्यात त्यांना यश मिळाले. 
कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन श्री अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

डाॅ. राजेंद्र प्रसाद

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन :  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                             
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   ⚜️🎓⛓️🇮🇳👨‍🦰🇮🇳⛓️🎓⚜️
  
         डॉ. राजेंद्र प्रसाद सहाय

    (स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती)
               
                कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२
पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती - सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील - पदनिर्मिती
पुढील - सर्वपल्ली राधाकृष्णन
       जन्म : ३ डिसेंबर १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
      मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३
                    (पाटणा)
राजकीय पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी - राजवंशी देवी
व्यवसाय - वकिली
धर्म - हिंदू     
            डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.                                                                🔮 जन्म
           डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.

📙 शैक्षणिक काळ
          प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, १८९६ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.
             डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.

🔰 कारकीर्द - शिक्षक
             राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.

🎓 वकील
        १९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.

🇮🇳 स्वातंत्र्य चळवळीतील कार्य
             भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.
      गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.
             १९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.
           ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.
                 २ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

📚 राजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके
डॉ. राजेंद्र प्रसाद (संध्या शिरवाडकर)
राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचें ओझरते दर्शन (रा.प्र. कानिटकर)
    
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾  ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

विज्ञानाचा गुरूवार ऑनलाईन वेबीनार

विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा घेतला लाभ...


धुळे येथील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा लाभ घेतला. यावेळी शिकण्याकरिताचे विज्ञान - तर्क करण्याची क्षमता (Science of learning-the reasoning ability) या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले होते.  you tube च्या मदतीने हे लाईव्ह वेबीनार घेण्यात आले. यामध्ये पाणिनी तेलंग यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. विज्ञान शिक्षक श्री एस. आर. पाटील यांनी वेबीनार सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाविषयी प्राथमिक माहिती दिली. कार्यक्रमासाठी श्री अविनाश पाटील यांचे तंत्रसहाय्य लाभले. 
कार्यक्रमाच्या आयोजना बाबतीत संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी कौतूक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

महात्मा जोतिराव फुले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬        संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील  (उपशिक्षक) 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥✍️🏢🇮🇳👳‍♂️🇮🇳🏢✍️💥      
           
                महात्मा
     जोतीराव गोविंदराव फुले
      (भारतीय समाजसुधारक)


     जन्म : ११ एप्रिल १८२७
        (खानवडी, पुणे,महाराष्ट्र)
     मृत्यू : २८ नोव्हेंबर  १८९०
              (पुणे, महाराष्ट्र)

टोपणनाव : जोतीबा, महात्मा
संघटना : सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके : भिडे वाडा, 
                       गंज पेठ ,पुणे
धर्म : हिंदु
प्रभाव : शिवाजी महाराज,थॉमस पेन
प्रभावित : डॉ. बाबासाहेब आंबेडकर , नारायण मेघाजी लोखंडे , केशव सीताराम ठाकरे
वडील : गोविंदराव फुले
आई : चिमणाबाई फुले
पत्नी : सावित्रीबाई फुले
अपत्ये : यशवंत

प्रस्तावना:-
 आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला असून याला मुळचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांचे सर्वात मोठे योगदान आहे.या संपूर्ण देशात महाराष्ट्रातील सर्वात जास्त समाजसुधारक होऊन गेले व त्यांचा वारसा आजपर्यंत ग्रंथालयात पुस्तकं द्वारे ग्रंथांद्वारे काव्या द्वारे ते समाज सुधारक आज मानवी जीवनातअमर झाले आहेत.
               असेच एक थोर महात्मा म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. ही पदवी त्यांना ई. स. 1888 मध्ये मिळाले शेतकऱ्यांच्या हितासाठी "शेतकऱ्यांचे आसूड" हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.
सूर्या परी सत्यप्रकाश पिरिता|शांती सर्व देतो| चंद्र जैसा|तोच खरा महात्मा म्हणावा. अशा थोर महात्मा ला कोटी कोटी वंदन...!!

जोतीराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता .
                  
💁‍♂ बालपण आणि शिक्षण
                जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे.  जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नवलोंकीक होता.
                 त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून कडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व जोतिष कबीरांचे अनेक दोहे पाठ झाले. त्यातील एक

नाना वर्ण एक गाय एक रंग है दूध

तुम कैसे बम्मन हं कैसे सूद | |

🚸 शैक्षणिक कार्य
      महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

🔮 सामाजिक कार्य
        मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली.

संसाराविषयी फुले यांचा दृष्टीकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणा-या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो. 
स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .
आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे . जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही , अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन ' करणारा म्हणावे .
आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे . त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही , त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह , आपल्या भाऊबंदास , आपल्या सोयऱ्याधायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत , त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांंचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .
महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणायचा होता .त्यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म' , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||

न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||

धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||

सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||

दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||

विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||

स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ || स्वतः हितासाठी खर्च जे करती ||अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||


निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१||

सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||

होईना भूदेव जाती मारवाडी || मानवा न पीडी || सर्ववत ||३||

अशा सज्जनास मानव म्हणावे || त्यांचे गुण घ्यावे || जोती म्हणे ||४||


क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी | तो खरा बळी || मानवात ||१||

सर्वांभूती द्या हृदयी कोमल || घालितो अगळ || इंद्रियांस ||२||

जगात वर्ततो सद्गुणी मवाळ || वासनेस मूळ || डाग नाही ||३||

सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी || तोच सत्यवादी ||'जोती म्हणे ||४||


निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||

त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले || स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||

कोणास न पीडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३||

खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||


सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||

सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||

सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||

मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||


सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||''जेथे आहे ||१||

जेथे जागा धीर सदा हृदयात ||''सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||

पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||

धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||

जोतीराव शूद्रादिअतिशुद्र यांना आपल्या काव्यात यशस्वी जीवनाचा उपदेश हि करतात... ते म्हणतात,

क्षत्रियांनो तुम्ही कष्टकरी व्हावे | कुटुंब पोसावे आनंदाने || १ ||

नित्य मुली- मुलं शाळेत घालावे | अन्नदान द्यावे विध्यार्थ्यांस ||२ ||

सार्वभोम सत्य स्वतः आचरावे |सुखे वागवावे आर्यभट्टा || ३ ||

अश्या वर्तनाने सर्वां सुख द्याल | स्वतः सुखी व्हाल जोती म्हणे || ४ ||

   ==सत्यशोधक समाज==
               २४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

📝 लेखन साहित्य
              'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. 

📝 त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-
लेखनकाळ साहित्य प्रकार नाव
इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा
जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

🌀 फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम

अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना
१. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म [पुणे].
२. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३. इ.स. १८४० नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्री नावाच्या कन्येशी विवाह.
४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार .
६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
७. इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
९. इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१०. इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११. इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२. नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३. इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.(पुनरावृत्ती)
१४. इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.(पुनरावृत्ती)
१५. इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.(पुनावृत्ती)
१६. सप्टेंबर ७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.(पुनरावृत्ती)
१७. इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
१८. मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९. नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.(पुनारावृत्ती)
२०. इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
२१. इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२. इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.
२३. इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४. इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५. इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
२६. इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७. इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८. इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९. इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३०. २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३१. इ.स.१८७५ शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३२. इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३३. इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३४. इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
३५. इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
३६. इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा'समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
३७. इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
३८. इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
३९. ११ मे इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४०. नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.

पश्चात प्रभाव (लीगसी)
                     महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

तृतीय रत्‍न
               तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. "

या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.
      आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

🎭 नाटकाचे स्वरूप
          या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.

नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.

या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.

हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.
                  महात्मा फुले लिखित ऐतिहासिक 'तृतीय रत्न' हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली. यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते. तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या. या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले.

📚 महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके
 असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत
महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)
महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे
महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी
महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)

🎭🎞 नाटक, चित्रपट
महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव
महात्मा जोतीराव फुले (नजरियात और उनका अदब (उर्दू )लेखिका : डा नसरीन रमजान सैय्यद)
मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे.
सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे

💎 समारोप
 विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.

🏵 सन्मान
 महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" ...याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
                     जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
                 जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
‘सत्यशोधक' नावाचा एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढणार होते. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले यांची आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारणार होत्या. समता फिल्म्सचा हा चित्रपट २०१५ सालापासून रखडला.
महाराष्ट्रातले भाजप सरकार आणि केंद्र सरकार फुलेंच्या जीवनावर एक चित्रपट काढणार असल्याचे जाहीर झाले हॊते, पण फॆब्रुवारी २०१७ नंतर त्या चित्रपटासाठी काही झाल्याचे दिसलॆ नाही.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
   
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                       ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

प्लास्टिक प्रदुषण : धोके आणि उपाययोजना

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वसूंधरा मित्र श्री मिलिंद पगारे यांची घेतली  ऑनलाईन भेट. 
प्लास्टिक प्रदूषण : धोके व उपाययोजना या विषयावर केले मार्गदर्शन...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सध्या राबविला जात आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा अनुभवाचा ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला जातो आहे. Preparing for life हे व्हिजन डोळ्या समोर ठेवून जीवन जगण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून सुरू आहे. आजच्या ऑनलाईन भेट कार्यक्रमात सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर, वसुंधरा मित्र, किर्लोस्कर पुरस्कार विजेते मा. श्री मिलिंद पगारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
आज जगासमोर अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. विद्यार्थ्यांना या समस्यांची जाणीव करून देऊन यावरील उपाययोजना वेळीच पटवून दिली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक श्री अविनाश पाटील यांनी सांगीतले.
श्री मिलिंद पगारे हे सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर आहेत. परंतू प्रदुषण या विषयावर त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यातील शालेय विद्यार्थी व इतर कार्यालयात आठशे पेक्षा जास्त प्रबोधन पर कार्यक्रम घेतले आहेत. ते एक उत्तम तंत्रस्नेही वसुंधरा मित्र आहेत. म्हणूनच कोरोना काळापासून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनावर भर दिला. त्यांच्या ज्ञानाचा व  अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने व पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, संवादकौशल्य, प्रश्ननिर्मिती कौशल्य वाढण्यासाठी या कार्यक्रमाची खुप मदत झाली. विद्यार्थ्यांना जीवन जगतांना पुस्तकी ज्ञानासोबत शाश्वत शिक्षण सुद्धा किती महत्वाचे आहे हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवरून सांगता येईल. एक तासाच्या सत्रात सरांनी पीपीटी च्या सहाय्याने प्लास्टिक पासून कोणकोणते धोके निर्माण होतात, तसेच दैनंदिन जीवनात सर्रास वापरले जाणारे प्लास्टिक किती भयंकर परिणाम घडवू शकते हे पटवून दिले सोबत या प्लास्टिक चा जर सुयोग्य वापर केला तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागणार नाही हे सुद्धा त्यांनी आजच्या सेशन च्या माध्यमातून पटवून दिले. 
शेवटच्या सत्रात ग्लोबल वॉर्मिग व पर्यावरण या संबंधी विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न उद्भवले होते. त्याप्रश्नांचे निरसन केले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर सखोल माहिती मिळाली. आदरणीय पगारे सरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप यांनी धन्यवाद व्यक्त केले.

📲💻🖥️🎥💻📲
श्री अविनाश काशिनाथ पाटील
८७९६७५९७०२
akpatil979@gmail.com 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...