शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

संत एकनाथ महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🚩🚩🚩🚩👳‍♀🚩🚩🚩🚩

                संतश्रेष्ठ
       श्री एकनाथ महाराज


          जन्म : १५३३
     (पैठण, औरंगाबाद    
        जिल्हा,महाराष्ट्र)

    *मृत्यू : इ.स. १५९९*

गुरु : जनार्दन स्वामी

भाषा : मराठी

वडील : सूर्यनारायण

आई : रुक्मिणी

पत्नी : गिरिजा

अपत्ये : गोदावरी, गंगा व हरी

संप्रदाय: वारकरी

समाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन

वाडःमय:
१. एकनाथी भागवत
२. भावार्थ रामायण
३. ज्ञानेश्वरी शुद्धीकर
४. रुख्मिणी स्वयंवर 

💁🏻‍♂ जन्म  व बालपण
संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

🕉 एकनाथ गुरुगृही

जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक बारा वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, “बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरू श्री दत्तात्रेय यांच्या दॄष्टान्ताकरवी समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो.” आपल्या गुरूचे शब्द ऎकताक्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दनस्वामींना लोटांगण घातले. नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले.

अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेविले ।
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ।
एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ।
त्यांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली.

त्यानंतर नाथ दौलताबादेच्या किल्ल्याशेजारीच असलेल्या शुलभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छ्त्राप्रमाणे धरला, तरी नाथांना त्याचा मागमूस लागला नाही. कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते. याच सुमारास कर्मधर्मसंयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृष्य दिसले. त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरीत निघून गेला. स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले, “एकनाथा, तुझ्या तपश्चर्येची आज जवळ-जवळ सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून आता तू घरी जावस ही माझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्कर. यातच तुझे कल्याण आहे. कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस. भोळ्याभाबडया लोकांच अज्ञान दूर करणार आहेस. त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथरचना निर्माण होईल.”

एकनाथांना झालेले दत्त दर्शन

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. 
समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।। 

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की, 
`श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.
दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे. 

( ॐ श्री सदगुरु देवाय नमः )

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त…. जन्म-मरणाचा पुरलासे अंत।।

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणातात, `ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्त्व आणि शिव म्हणजे तम. अशा तीन मुख्य देवांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्रीदत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे’. 
नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की, `श्रीदत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. 

परा-पश्यती-मध्यमा-वैखरी या चारही वाणी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहेत. त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत. परावाणीलासुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही. अशा या ब्रह्मांडव्यापी दत्तात्रेयांचे अवतार-रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्रीदत्तात्रेयांचे अवतार-रहस्य कळेल, ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल, त्या भाग्यवान भक्तांच्या जन्म-मरणाच्या फेर्या निश्चित संपुष्टात येतील.

दत्त येऊनिया उभा ठाकला… जन्ममरणाचा फेरा चुकविला।।

नाथ समाधी लावून बसले होते. मुखात `दिगंबरा दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा’।।
हा सिद्धमंत्र अक्षरशः घुमत होता. ध्यानावस्थेत असताना नाथांच्यासमोर भगवान श्रीदत्तात्रेय आपल्या अतिभव्य मूळ रूपात प्रकट झाले. नाथांना तर परमानंद झाला. सगुण साकार झालेल्या श्रीदत्तात्रेयांना नाथांन साष्टांग नमस्कार घातला. नाथांची ही अपूर्व भक्ती पाहूनच श्रीदत्तात्रेय नाथांवर प्रसन्न झाले होते. भगवान दत्तात्रेयांनी नाथांना अलगद उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. आशीर्वाद दिला. नाथांच्या लक्षात आले की, आपली उपासना पूर्ण झाली. आपला जन्म-मरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी चौर्याऐंशी लक्ष योनींचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला. नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले.

`दत्त दत्त’ ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन।
 `मी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान।।

नाथांच्या मुखात `दत्त दत्त’ असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हारपले. 
सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी-तूं पणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरु हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता.

गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा-आजीला भेटले. तेव्हा आजोबा-आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथाचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राम्हण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता.

अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.

हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥

नाथांचा भक्तांना उपदेश 
नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.

एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

नाथांनाच स्वप्नात दृष्टांत झाला होता की, आळंदी येथील समाधिस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजानवृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मूळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुध्द प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्रीखंडया म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच (भगवान कृष्णाचाच) अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथनिर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता.

श्रीमद्भागवतातील भक्तिप्रधान अशा अकराव्या स्कंधावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वरक्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रृत आहे. त्यासंबंधात ते म्हणाले होते, “सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे.”

पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती.

नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रूक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. त्याच बरोबर ते बहुजन समाजात वावरत होते. त्यामुळेच वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारूड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते. भारूडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते. त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत. ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहीत, ‘एका जनार्दनी’ म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत.

नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंडयाला म्हणाले होते “फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरूजींचा जन्मदिवस आणि निर्वाणदिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याचदिवशी होणार आहे कारण माझे कार्य आता संपलेले आहे” आणि खरोखरच इ.स.१५९९ मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ सहासष्ठ वर्षे जगले.

नाथांनी बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले. सर्वांभूती समभाव दाखविला मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले. अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वद्यषष्ठीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन, भजन-पूजन-प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात. 

नाथांचा शेवटचा उपदेश आहे :

एका जनार्दनी विनंती । येऊनी मनुष्य देह प्रती ॥
करोनिया भगवद्भक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥ 

गुरु परंपरा
आदी नारायण
   |
ब्रम्हदेव
   |
अत्री
   |
दत्तात्रेय 
   |
जनार्दन स्वामी
   |
एकनाथ महाराज


👀 संत साहित्यिकांच्या नजरेतून श्री एकनाथ महाराज
एखाद्या घराण्यात तेजस्वी व्यक्ती जन्माला यायची असेल तर त्या घराण्याची तेजस्वताही तशीच असावी लागते. सत्शील कुटुंबामध्येच सत्शील व्यक्ती जन्म घेतात. कारल्याच्या वेलाला काहीही केलं तरी द्राक्ष येऊ शकत नाहीत. तसं कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या इतिहासाचा अभ्यास केला तर त्या व्यक्तीचं घराणं हे असामान्यच होतं असं आढळतं. संत एकनाथ महाराजांचा जन्म ज्या कुलकर्णी घराण्यात झाल ते ही याला अपवाद नव्हतं. भास्करपंत कुलकर्णी हे या घराण्याचे मूळ पुरुष. सावित्रीबाई या त्यांच्या सात्विक स्वभावाच्या पत्नीनं ज्या भानुदास महाराजांना जन्म दिला. तेच संत एकनाथांचे पणजोबा. चक्रपाणि आणि सरस्वती या त्यांच्या मुलगा व सुनेला एकनाथ महाराजांचे आजोबा आणि आजी व्हायचं भाग्य लाभलं. सूर्यनारायण या चक्रपाणिंच्या मुलाला रुक्मिणी व गोदावरी अशा दोन बायका  होत्या. पैकी रुक्मिणी ही एकनाथांची आई.

एकनाथांचा जन्म आणि बालपण याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचा जन्म साधारणपणे शके १४५० ते १४५५ (म्हणजे इ. स. १५३३-३४) या दरम्यान झाला असावा असा अभ्यासकांचा आणि इतिहास संशोधकांचा कयास आहे. पैठण हे नाथांचं जन्मगाव. त्याकाळी पैठणला प्रतिष्ठान म्हणत. 

त्यांच्या बालपणीच आई वडिल परलोकी गेले. त्यावेळी बिचाऱ्या लहानग्या नाथाला आपले आई वडिल वारले म्हणजे काय, हे देखिल कळत नव्हतं. आई वडिलांना पारख्या झालेल्या एकनाथाचं संगोपन आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी तळहातावरच्या फोडासारखं जपून केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याची प्रचिती एकनाथानं अगदी लहानपणापासून आणून दिली. अगदीच लहान असतानाचा काळ सोडला तर एकनाथ इतर मुलांसारखा खेळण्यात कधीच रमला नाही. तो दगडाचा देव मांडून त्याला पानं फुलं वहात असे. इतकंच नाही तर फळी खांद्यावर वीणा म्हणून घेऊन देवापुढे भजन करण्यात तल्लीन होऊन जाई. आजोबा पूजा करू लागले की, पुजेचं साहित्य गोळा करून देई. बारीकसारीक गोष्टींमधून एकनाथाची चौकसबुद्धी, तीव्र स्मरणशक्ती आणि उत्कृष्ठ अशी पाठांतर क्षमता यांची प्रचिती येत असे. लहानवयापासून परमार्थाकडे ओढा असलेला एकनाथ पुराण कीर्तन एकाग्रतेनं आणि उत्सुकतेनं ऐकत असे. त्याची तैलबुद्धी पाहून पुराणिक बुवांना देखील आश्चर्य वाटत असे. आजोबांचा लाडका ‘ऐक्या’ वेळ मिळताच रामनामामध्ये दंग होऊन जाई. पण हे सारं करत असतांना सहाव्या वर्षी मौजीबंधन झालेला हा तेजस्वी मुलगा जेंव्हा आजुबाजुच्या घटनांचं निरिक्षण करी तेंव्हा त्याला खूप गोष्टींचं आश्चर्य वाटे आणि राग ही येत असे. त्या पैठणात भक्तांची सतत ये-जा चालू असे. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा हलकल्लोळ चालू असे. अनेक साधुसंत, बैरागी, योगी, तपस्वी तिथे वावरत असत. परंतु एकनाथाला या साऱ्यांमध्ये कोरडेपणा, ढोंगीपणा, अंधश्रद्धा यांचीच रेलचेल दिसत असे. 

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती.जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 

मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. 

एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे ! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले ! नाथाला धन्य धन्य वाटलं. साक्षात् दत्तदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथाला स्वतंत्रपणे काही साधना करायला लावली असा विचार केला. 

या देवगिरी पासून थोड्याच अंतरावर शूलभंजन नावाचा पर्वत आहे. मार्कंडेय ऋषींची ती तपोभूमी अतिशय रमणीय आणि पावन आहे. तिथे मौन धारण करुन एकाग्रतेनं आत्मसाधना कर आणि उद्धरेत आत्मना आत्मानम् या वचनाप्रमाणं स्वत:च कल्याण करून घे. लक्षात ठेव साक्षात्कारप्राप्ती करुन घेऊन मगचं परतायचं. जा बाळ, माझे आशिर्वाद आहेत. 

मोठ्या जड अंत:करणानं त्यांनी नाथाला निरोप दिला. आपल्या परमप्रिय गुरुचं रूप डोळ्यात साठवून घेऊन नाथांना शूलभंजन पर्वताकडे प्रयाण केलं. देवगिरीच्या वायव्येकडे असलेल्या या पर्वताचा परिसर पाहून नाथाला परमानंद झाला. नाथानं तिथे एक पर्णकुटी बांधली. रोज सकाळी लवकर उठून सूर्यकुंडात स्नान करावं आणि ध्यानस्थ व्हावं व त्यातच दिवसातला बहुतेक वेळ खर्च करावा असा दिनक्रम सुरू झाला. श्रीकृष्णाचं ध्यान करताच ध्यानात श्रीकृष्ण प्रगट होई आणि त्याची मानसपूजा करताना नाथाला बाह्य जगाचा पूर्ण विसर पडत असे. वेळ कसा आणि किती गेला याचं भानही उरत नसे. ध्यानातून बाहेर आल्यानंतर मिळतील ती कंदमुळं खायची आणि जगाच्या कल्याणाचं चिंतन करत बसायचं असा कार्यक्रम असे.

परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर गुरुंच्या शब्दाप्रमाणे आता माघारी देवगिरीला जायला हरकत नाही असा विचार करुन एकनाथांनी पुन्हा देवगिरी गाठली. जनार्दन स्वामींना नमस्कार करून नाथ समोर उभे राहिले. त्यांच्या मुखकमलाकडे पहाताच ज्ञानी जनार्दन स्वामींनी सर्व काही ओळखलं. त्यांना परमसंतोष झाला. “एकोबा, तुझी आत्मसाधना सफल झाली. आता आपण बरोबरच तीर्थयात्रेला जाऊ असे एकनाथांना प्रेमभरानं म्हणून शुभमुहुर्तावर ते उभयता तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. साक्षात्कार घडलेला परमात्मा सर्वसामान्य लोकांमध्ये पाहण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याला उजाळा देण्यासाठी खरं तर साक्षात्कारी महात्म्यांचा तीर्थयात्रा असतात.

तीर्थक्षेत्रा मागून तीर्थक्षेत्र करत ते गुरुशिष्य गोदावरी नदीच्या उत्तरेला असलेल्या चंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या चंद्रावती नामक नगरीत दाखल झाले. या नगरीत चंद्रभट नामाचे सत्वशील व तपस्वी असे सत्पुरुष रहात होते. ते चतु:श्लोकी भागवताचं नेहमी चिंतन करीत असत. त्यांच्याकडे हे गुरुशिष्य मुक्कामास थांबले असतांना स्वामींनी चंद्रभटांना चतु:श्लोकी भागवतावर निरुपण करण्यास सांगितलं. अभ्यासू चंद्रभटांनी केलेलं निरुपण स्वामींना आणि नाथांना खूप आवडलं. परंतु हे निरुपण संस्कृत भाषेत झालं असावं. कारण धर्मग्रंथामधल्या ज्ञानापासून उपेक्षित राहिलेल्या सर्वसामान्य जनतेचा कळवळा असलेल्या जनार्दन स्वामींनी त्यानंतर लगेचच एकनाथांना चतु:श्लोकी भागवतावर मराठीत ओवीबद्ध टीका लिहायला सांगितली. हे चतु:श्लोकी भागवत म्हणजे काय माहित आहे? तर मूळच्या ‘भागवत’ या संस्कृत ग्रंथांच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातल्या एकंदर ४३ श्लोकांपैकी क्र. ३२ ते ३५ या केवळ ४ श्लोकांमध्ये आदिनारायणांनी ब्रह्मदेवाला अध्यात्मरहस्य उलगडून सांगितलं आहे. या ४ श्लोकांनाच ‘चतु:श्लोकी भागवत’ असं म्हणतात. 

पुढे ब्रह्मदेवांनी हे अध्यात्मरहस्य नारदांना सांगितलं, नारदांनी ते व्यासांना सांगितलं, व्यासांनी या ४३ श्लोकांचा १२ स्कंधांमध्ये विस्तार केला. व्यासांकडून हा ग्रंथ शुकांनी श्रवण केला आणि शुकांकडून परिक्षीत राजाला ऐकायला मिळाला. व्यासांनी लिहिलेल्या १२ स्कंधाच्या भागवतामधील ११व्या स्कंधावर एकनाथांनी जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून टीका लिहीली.

या ग्रंथालाच ‘एकनाथी भागवत’ म्हणतात. ११व्या स्कंधात १३६७ श्लोक आहेत तर नाथांच्या त्यावर लिहिलेल्या भागवतात १८११० ओव्या आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्टच दिसते की, नाथांनी ग्रंथ खूपच विस्ताराने लिहिलेला आहे. पैकी चतु:श्लोकी भागवत असलेल्या अध्यायात १०३६ ओव्या आहेत. १००व्या स्कंधात श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. तरीदेखील एकनाथांनी टीका लिहायला ११वा स्कंधच निवडला. कारण या स्कंधात श्रीकृष्णानं सांगितलेलं वेदांताचं निरुपण आहे. ११व्या स्कंधात ३१ अध्याय आहेत. आपल्या गुरुंच्या आज्ञेवरून एकनाथांनी ही टीकारुपी ग्रंथराज निर्माण केला. या बाबतीत कितीतरी गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. एकतर हा ग्रंथ लिहितेवेळी एकनाथाचं वय केवळ १० वर्षांच्या जवळपास होतं. दुसरी गोष्ट, त्यांचा लिहीण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तिसरी गोष्ट, मूळ ग्रंथचा एकनाथांनी खूपच विस्तार करून हा ग्रंथ तयार केला. जनार्दनस्वामींबरोबर चंद्रभटांकडे राहिले असताना एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ लिहायला सुरुवात केली. 

गुर्वाज्ञा प्रमाण असल्यामुळे एकनाथ महाराज एकटेच मधुरा, वृदांवन, गोकुळ, गया, प्रयाग, अयोध्या, बद्रीनाथ इ. असंख्य तीर्थक्षेत्री जाऊन शेवटी पैठणला परत आले ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी. पण वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीचा कोवळा पोर “एकनाथ” घराबाहेर पडल्यानंतर आता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ‘एकनाथ महाराज’ म्हणून पैठणात परत येणं या संपूर्ण कालावधीमध्ये काय झालं ते काय सांगावं! पोरक्या एकनाथाच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेले आजोबा चक्रपाणि आणि आजी सरस्वती यांना एकनाथाच्या निघून जाण्यामुळे वेडच काय ते लागायचं बाकी राहिलं होतं. उरलेली तीर्थयात्रा आटोपून एकनाथ महाराज पैठणला परत आले. एक दिवस माध्यान्हीला माधुकरी मागायला आले असताना आजोबाआजी आणि नाथांची नजरानजर झाली. सात वर्षांचा असताना पाहिलेला बाळ आता पंचविशीत गेल्यानंतर पुन्हा डोळ्यांसमोर येत होता. पण डोळ्यामध्ये प्राण आणून ते आपल्या एकोबाची वाट पहात असल्यामुळे त्यांच्या अंतर्मनानं एकनाथ समोर येताच सूचना दिली. एकनाथांनीही आपल्या आजोबा - आजींना ओळखलं. त्यांचं अंत:करण भरून आलं. नाथांनी पुढं होऊन आजीला मिठी मारली. बिचारी आजी थरथर कापत होती, डोळ्यातून आनंदाश्रू ढाळत होती.

काय बोलावं ते सुचत नव्हतं. एकनाथावर न सांगता गेल्याबद्दल रागवावं का परत भेटल्याबद्दल आनंदाचा वर्षाव करावा हे त्या माऊलीला कळत नव्ह्तं. आजी जरा सावरल्यानंतर नाथांनी आजोबांच्या पायावर डोकं ठेवलं. तेवढ्यात आजोबांनी जनार्दनस्वामींचं सांभाळून ठेवलेलं पत्र एकनाथाच्या हातावर ठेवलं. नाथांनी पत्र उघडलं. आतमध्ये लिहिलं होतं, “पैठणातच राहून जगदुद्धार करावा.” नाथांनी आज्ञा शिरोधार्थ मानून पैठणातच रहायचं ठरवलं. 

पैठण ही कर्मभूमी म्हणून निश्चित झाल्यानंतर नाथांनी लोकजागृतीच्या कार्याचा श्रीगणेशा कीर्तनानं केला. एकादशीच्या निमित्तानं नाथांनी स्वत: होऊनच हे कीर्तन केलं. आजवर पैठणातल्या लोकांना एकनाथ कीर्तन करतात हे देखिल माहीत नव्हतं. पण केलेला अभ्यास आणि आजवरच्या गुरुसेवेची पुण्याई यांच्यामुळे नाथ कीर्तनाला उभे राहिले की, साक्षात सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलत असे. अशी प्रासादिक वाणी त्या पैठणात लोकांनी यापूर्वी कधी ऐकलीच नव्हती. मग काय, बघता बघता नाथांची किर्ती फुलांच्या सुगंधाप्रमाणे दाही दिशांना पसरली. कीर्तनाला ही गर्दी होऊ लागली ! हळुहळू रोज कीर्तन आणि रोज वाढती गर्दी असं समीकरण झालं. लोकांचा वाढता प्रतिसाद बघून नाथांना समाधान वाटत होतं. नाथ लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. परंतु अहंकाराचा मात्र लवलेशही नाथांना शिवला नव्हता. आपल्या अंगी असलेलं सर्व काही त्या परमेश्वराची किमया आहे, त्यानं आपल्याला हे सारं लोकांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी दिलेलं आहे अशा विनम्र भावानं नाथ लोकांच्या अंतरंगातला परमेश्वर जागृत करण्याचा घेतलेला वसा पाळत होते. आपण सारे त्या एका परमेश्वराचेच अंश आहोत त्यामुळे कोणत्याही जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. माणसाचा मोठेपणा तो इतरांशी किती प्रेमानं वागतो त्यावरुनच ठरतो. हा त्यांच्या उपदेशाचा गाभा होता. अतिशय साध्या, सोप्या पण काळजाला भिडणाऱ्या भाषेमुळे विद्वानांबरोबरच महार, मांग, सुतार, लोहार, कासार, डोंबारी, कैकाडी, गारुडी, वासुदेव, कोल्हाटी अशा असंख्य जाती-जमातींचे लोक कानांत प्राण आणून नाथांचं कीर्तन ऐकत. प्रत्येकाला परमेश्वर आपल्या जवळचा वाटावा म्हणून नाथांनी निरनिराळ्या जातींची रुपकं वापरुन असंख्य अभंग आणि भारुडं लिहिली. नाथांचं कवित्व इतकं शीघ्र होतं की, कीर्तन चालू असताना देखील त्यांना अभंग सूचत आणि ते लगेचच त्या कीर्तनात वापरतही असत. 

गोकुळअष्टमीचा उत्सव संपन्न झाल्यावर जनार्दनस्वामी काही दिवस पैठणला राहिले. आपल्या प्रियतम शिष्यानं परमार्थामध्ये जसा आदर्श निर्माण केला तसाच प्रपंचामध्येही आदर्श लोकांसमोर ठेवावा असं स्वामींना वाटलं. योगायोगाने त्याच वेळी नाथांचे आजोबा आणि आजीही स्वामींना तेच सांगण्यासाठी आले. मग स्वामींनी एकनाथांना गृहस्थाश्रमी व्हायची आज्ञा दिली. “जशी स्वामींची आज्ञा” म्हणत एकनाथांनी होकार दिला. आजी आजोबांना हायसं वाटलं. नंतर जनार्दनस्वामी देवगिरीकडे परतले. 

काही काळ असाच लोटला आणि एक दिवस सुन्न करणारी ती बातमी आली. देवगिरीवरती जनार्दनस्वामींचं महानिर्वाण झालं होतं. नाथांना हे कळल्यावर क्षणभरच त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि दुसऱ्या क्षणीच येत्या वर्षी स्वामींच्या महानिर्वाण दिनी म्हणजेच फाल्गुन वद्य षष्ठीला मोठा उत्सवर करण्याचा मनोदय व्यक्त केला. जन्म मरणाचं भय आपल्याला. ज्याला त्याचा खरा अर्थ कळला त्याला जन्म-मरणाचं सुखदु:ख कुठून असणार ? गुरुंच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थाश्रम स्विकारायला नाथांनी तयारी दाखवताच आजोबा-आजी या वयातही उत्साहानं कामाला लागले. चारचौघांमध्ये त्यांनी हा विषय काढताच ही बातमी गावोगाव पसरली. आपले आवडते नाथ विवाहबद्ध होणार म्हटल्यावर प्रत्येकालाच आनंद झाला. पैठणच्या वायव्येला वैजापूर नावाचं गाव आहे. तेथे रहाणाऱ्या एका सुखवस्तू सद्गृहस्थाचा मित्र पैठणला राहणारा. त्यानं त्या गृहस्थांना त्यांची मुलगी नाथांसाठी दाखवण्याचा सल्ला दिला. नाथांची किर्ती अगोदरच कानावर असलेल्या त्या गृहस्थांनी तातडीनं नाथांच्या आजोबांची चक्रपाणींची भेट घेतली. नक्षत्रासारखी असणारी त्यांची गुणवंती मुलगी आजोबांनी लगेचच आपली नातसून म्हणून पसंत केली. झालं.लग्न ठरलं. पाहुणे मंडळी गोळा झाली, आणि ठरल्या मुहूर्तावर एकनाथ आणि गिरिजा यांचा विवाह मोठ्या थाटानं पार पडला. विवेक आणि शांती यांचा जणू संगमच तो. 

या विवाहाचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो नाथांच्या आजीआजोबांना. त्यांना आता इति कर्तव्य वाटू लागलं होतं. नाथांच्या लग्नाच्या निमित्तानं वैजापूरला राहणारा त्यांचा एक लांबचा नातलग लग्नाच्या काही दिवस अगोदर नाथांकडे आला, तो एकनाथांपायी आपलं उर्वरित आयुष्य वाहण्याच्या निर्धारानंच. उद्धव त्याचं नाव. श्री गोपाळकृष्णांनी निजधामी जाताना आपला परमप्रिय भक्त बद्रीनारायणाला लोकसंग्रहासाठी ठेवला होता. तोच हा उद्धव ! उद्धव आयुष्यभर नाथांबरोबर सावलीसारखा राहिला. एकनाथांनी जनार्दनस्वामींची सेवा केली त्याचीच पुनरावृत्ती उद्धवाच्या रुपानं पहायला मिळाली. त्याला नाथांशिवाय इतर कोणताच ध्यास नव्हता. 

नाथांच्या समत्व दृष्टीचं दर्शन घडवणाऱ्या घटना लोक पहात होते. एकदा नाथ स्नानासाठी गंगेवर गेले असताना दुपारच्या त्या रणरण उन्हात पाय भाजत असल्यामुळे जिवाच्या आकांतानं रडणारं महाराचं पोर नाथांनी पाहिलं. झपाझपा जाऊन नाथांनी त्याला कडेवर घेऊन शांत केलं. इतकच नाही तर महार वाड्यात जाऊन त्याच्या घरी पोहोचतं केलं. महाराच्या पोराला नाथांनी उचललं ही गोष्ट साऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला. पण महार वाड्यातल्या लोकांना त्यांचे आवडते नाथ महार वाड्यात आले म्हणून खूप आनंद झाला.

एकनाथ महाराज म्हणजे मूर्तिमंत दया, क्षमा, शांती आणि प्रेम. काम, क्रोध, लोभ, मोह, मोद, मत्सर या षड्रिरुप वर विजय मिळवणं म्हणजे काय हे नाथांच्या चरित्रावरुन कुणालाही लख्ख दिसावं. दया नाथांच्या नसानसामध्ये भिनलेली होती. गंगा तहानलेल्या गाढवाला पाजण्याच्या गोष्टीमध्ये नाथांनी भूतदयेचा केवढा महान आदर्श जगापुढे ठेवला ना !

जगाचा संसार करणाऱ्या नाथांना अर्धांगी गिरिजाबाईंची बरोबरीची साथ होती आणि कष्टांमध्ये कधीही कमी न पडणारे श्रीखंड्या आणि उद्धव हे तर घरचे आधारस्तंभच होते. नाथांना गोदावरी आणि गंगा या दोन कन्या तर हरी हा पुत्र झाला. हरी वेदशास्त्रांत पारंगत होऊन मोठेपणी हरिपंडित म्हणून लोकमान्य झाला.

नाथांच्या थोरल्या मुलीचा गोदावरी (लीला) चा विवाह पैठणातच राहणाऱ्या विश्वंभर (चिंतोंपंत मुद्गल) यांच्याशी झाला. त्यांचा मुक्तेश्वर नावाचा मुलगा सुरुवातीला बोलतच नसे. परंतु नाथांच्या कृपेनं तो बोलायलाच नाही तर काव्य ही करायला लागला. रामायण, महाभारत आणि भागवतावरही अजरामर अशा काव्यरचना करून तो महाकवी म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे पंचगंगेच्या तीरावर तेरवाड या गावी त्यानं समाधी घेतली. 

नाथांच्या धाकट्या मुलीचं, गंगाचं सासर कर्नाटकातलं. तिचा मुलगा पुंडाजी हा देखील परमभक्त होता. अशा रितीनं अमृतवृक्षाला अमृताच्याच फळांचे घोस लागले होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचं परम श्रद्धास्थान. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता याचं प्रत्यंतर त्यांच्या लिखाणात जागोजाग पहायला मिळतं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन “आपल्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या अजानवृक्षाची मुळी आपल्या गळ्याला लागत आहे ती काढावी’ असं सांगितलं. हे कळताच गहिवरुन गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं. त्याकाळी हस्तलिखित पोत्थाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणार्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वत:च्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत.

पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखीत प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं, आणि शेवटी नितांत श्रद्धेनं, कष्टानं श्रीज्ञानेश्वरीची निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोलामोलाचं केलेलं दुसरं कार्य म्हणजे ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालदिल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामानं कशी खोड मोडली याचं सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणांच मोठ कार्य केलं. या दोन ग्रंथाशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारुड, गुरूस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला तर नाथांनी लिहीलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते.

स्वत: एवढ्या उच्चकोटीच्या अवस्थेला जाऊनही नाथांना इतरांच्या उपासना मार्गाबद्दल नितांत आदर असे. कोणत्याही मार्गानं गेलं तरी एकमेकांवर प्रेम करणं आणि डोळसपणे त्या परमेश्वराला शरण जाणं याचं गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं त्यांचं सांगणं होतं. समाजासाठी सर्व मार्गांनी उदंड कार्य करून कृतकृत्य झाल्यानंतर आता आपली जीवनयात्रा संपवावी असं नाथांना वाटू लागलं. उत्कृष्ठ ग्रंथरचना, आदर्श प्रपंच व उदंड ज्ञानदान अशा गुणालंकारांनी सुशोभित झालेलं नाथांचं जीवन कुणाचंही मस्तक विनम्रपणे झुकावं असंच होतं. देहाची आसक्ती माहितच नसलेल्या नाथांनी एकेदिवशी आपण देहत्याग करणार असल्याचं लोकांसमोर सांगितल्यावर क्षणभर लोकांचा आपल्या कानांवर विश्वास बसेना, आणि नंतर मात्र पुराच्या पाण्यासारखी सैरभर पसरत ही बातमी गावोगाव पोहोचली. आपण अनाथ होणार या कल्पनेनं सारे दु:खात बुडाले. 

एके दिवशी नाथांनी उद्धवाला बोलावून सांगितलं, “उद्धवा, मागे मी तुला फाल्गुन वद्य षष्ठीचं महत्त्व सांगितलं होतं ते आठवतंय का ?

एकनाथ महाराज पादुका, पैठण
एकनाथ महाराज पादुका, पैठण
“होय नाथ, त्याच दिवशी तुमच्या गुरूंचा जनार्दन स्वामींचा जन्म झाला, त्याच दिवशी त्यांना दत्तात्रयाचं दर्शन झालं, त्याच तिथीला स्वामींचं महानिर्वाणही झालं, आणि त्याच तिथीला स्वामींचा तुमच्यावर अनुग्रह ही झाला. होय नां ?”

उद्धवानं सारं बरोबर सांगितलं. “ त्याच वेळी मी तुला सांगितलं होतं की अजून पाचवी घटनाही त्याच तिथीला घडणार आहे म्हणून” नाथ म्हणाले. “ ती कोणती नाथ ”? उद्धवानं उत्सुकतेनं विचारलं. ‘‘येत्या फाल्गुन वद्य षष्ठीला आम्हीही जाणार ”! नाथ निर्विकारपणे बोलले. पण उद्धव मात्र  ओक्साबोक्शी रडू लागला. 

षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत करत मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी वाळवंटात येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचं कीर्तन म्हणजे लोकांचं देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचं कीर्तनही रंगलं. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश करून देहत्याग केला. लौकिकार्थानं बहुजनांचा त्राता गेला, पण तो विशाल भुमिकेतून सर्वांचा अदृश्य रूपानं वावरणारा पिता म्हणून वावरण्यासाठी. शके १५२१ मधल्या फाल्गुन वद्य षष्ठीच्या त्या रविवारी हा ज्ञानरवी अस्त पावला.

एकनाथ नावाचा कल्पवृक्ष भागवत, गाथा, भावार्थ रामायण, शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी यासारख्या फांद्यांनी विस्तारून समस्त जनांना सुखाच्या सावलीची व्यवस्था करून पुन्हा अकर्ता म्हणून उरला होता. अग्निसंस्कार होऊन दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करायला आलेल्या हरिपंडिताला अस्थींच्या ठिकाणी एक तुळशीच रोप आणि पिंपळ पाहिल्यावर; आपलं निर्गमन म्हणजे मरण नव्हे, याची साक्ष देणाऱ्या त्या विभूतीला आमचे कोटीकोटी प्रणाम !

पिडा हारुनी दाविला दिव्य मार्ग ।
जनांसाठी भूमीवरी आणी स्वर्ग ।
सदा सर्व लोकां गमे एक नाथ ।
सुरां पूज्य जो धन्य तो एकनाथ । 

⚜ एकनाथ महाराजांचे सामर्थ्य

पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने 'दंडवतस्वामी' म्हणत असत.

एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ''काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?'' ''त्याच्यातही परमेश्वर आहे'', असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.

गाढव जिवंत झाले, ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, ''स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील, ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या.'' ''जशी गुरूंची आज्ञा !'' असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देह त्याग केला.

एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ''आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.'' ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. '''हे देवा, तू आता हा गवताचा घास घे'', असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ''देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.'' तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.

🌀 एकनाथ महाराजांचा गुरू शोध व गुरुनिष्ठा

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती. जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 
मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले!

⚜🚩 दत्त तिर्थक्षेत्रे

श्री क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र कुरवपूर
श्री क्षेत्र पीठापूर
श्री क्षेत्र कडगंची
श्री क्षेत्र करंजी
श्री क्षेत्र मुरगोड
श्री क्षेत्र कुमशी
श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
श्री क्षेत्र बसवकल्याण
श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
श्री क्षेत्र गुरुशिखर अबु
श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
श्री क्षेत्र नारायणपूर
श्री क्षेत्र कर्दळीवन
श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)
श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
श्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे
नासिक रोड दत्तमंदिर
श्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ
श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा
श्री तारकेश्र्वर स्थान
श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा
श्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा
माधवनगर फडके दत्तमंदिर
श्री क्षेत्र राक्षसभुवन
श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
श्री क्षेत्र अमरापूर
श्री क्षेत्र कारंजा
श्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा
श्री क्षेत्र माणगांव
श्री क्षेत्र माणिकनगर
श्री क्षेत्र माहूर
श्री क्षेत्र सटाणे
श्री क्षेत्र साकुरी
श्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे
श्री क्षेत्र डभोई बडोदा
श्री दत्तमंदिर डिग्रज
श्री जंगली महाराज मंदिर पुणे
श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
श्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर
श्री क्षेत्र अंतापूर
श्री क्षेत्र अंबेजोगाई
श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री क्षेत्र अमरकंटक
श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
श्री क्षेत्र कोळंबी
श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
श्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ
श्री क्षेत्र गाणगापूर
श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर
श्री क्षेत्र गुंज
श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा
श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर
श्री क्षेत्र चौल दत्तमंदीर
श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार
श्री क्षेत्र दत्ताश्रम जालना
श्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा
श्री क्षेत्र देवगड नेवासे
श्री क्षेत्र नरसी
श्री क्षेत्र नारेश्र्वर
श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
श्री क्षेत्र पाथरी, परभणी
श्री क्षेत्र पैजारवाडी
श्री क्षेत्र पैठण
श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र भालोद
श्री क्षेत्र मंथनगड
श्री क्षेत्र माचणूर
श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
श्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)
श्री क्षेत्र शिर्डी
श्री क्षेत्र शेगाव
श्री क्षेत्र सुलीभंजन
श्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे
श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री दत्तपादुका मंदिर देवास
श्री दत्तमंदिर वाकोला
श्री भणगे दत्त मंदिर फलटण
श्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)
श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे
श्री साई मंदिर कुडाळ गोवा
श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
श्री स्वामी समर्थ मठ दादर
श्री हरिबाबा मंदिर, पणदरे
श्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण
श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
दत्तसंप्रदाय सत्पुरुष
श्रीपाद श्रीवल्लभ
श्री अनंतसुत कावडीबोवा
डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)
श्री आनंदनाथ महाराज
श्री आनंदभारती स्वामी महाराज
श्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज
श्री आत्माराम शास्त्री जेरें
ओम श्री चिले महाराज
श्री उपासनी बाबा साकोरी
श्री एकनाथ महाराज
श्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)
श्री किनाराम अघोरी
श्री किसनगिरी महाराज, देवगड
श्री कृष्णनाथ महाराज
श्री कृष्णेन्द्रगुरु
श्री गंगाधर तीर्थ स्वामी
श्री गगनगिरी महाराज
श्री गजानन महाराज अक्कलकोट
श्री गजानन महाराज शेगाव
श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)
गुरु ताई सुगंधेश्र्वर
श्री गुरुनाथ महाराज दंडवते
श्री गुळवणी महाराज
श्री गोपाळ स्वामी
श्री गोपाळबुवा केळकर
श्री गोरक्षनाथ
श्री गोविंद स्वामी महाराज
श्री चिदंबर दिक्षीत
श्री चोळप्पा
श्री जंगलीमहाराज
श्री जनार्दनस्वामी
ताई दामले
श्री दत्तगिरी महाराज
श्री दत्तनाथ उज्जयिनीकर
श्री दत्तमहाराज अष्टेकर
श्री दत्तमहाराज कवीश्र्वर
श्री दत्तावतार दत्तस्वामी
श्री दादा महाराज जोशी
श्री दासगणु महाराज
श्री दासोपंत
श्री दिंडोरीचे मोरेदादा
श्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)
श्री दिगंबरबाबा वहाळकर
श्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)
श्री देवमामालेदार
श्री देवेंद्रनाथ महाराज
श्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)
श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी
श्री गोपालदास महंत, नाशिक
श्री गोविंद महाराज उपळेकर
कोल्हापूरच्या विठामाई
श्री नानामहाराज तराणेकर
श्री नारायण गुरुदत्त महाराज
श्री नारायण महाराज केडगावकर
श्री नारायण महाराज जालवणकर
श्री नारायणकाका ढेकणे महाराज
श्री नारायणतीर्थ देव
श्री नारायणस्वामी
श्री नारायणानंद सरस्वती औदुंबर
श्री निपटनिरंजन
श्री निरंजन रघुनाथ
श्री नृसिंह सरस्वती
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर
श्री पंडित काका धनागरे
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज
श्री परमात्मराज महाराज
श्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)
श्री पिठले महाराज
श्री बाबामहाराज आर्वीकर
श्री बालमुकुंद
श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज
श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर
श्री बाळाप्पा महाराज
श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज
श्री भैरवअवधूत ज्ञानसागर
श्री मछिंद्रनाथ
श्री माणिकप्रभु
श्री महिपतिदास योगी
श्री मामा देशपांडे
श्री मुक्तेश्वर
श्री मोतीबाबा योगी जामदार
श्री मौनी स्वामी महाराज
श्री यती महाराज
श्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)
श्री रंगावधूत स्वामीमहाराज
श्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)
श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज
श्री रामचंद्र योगी
श्री रामानंद बिडकर महाराज
श्री लोकनाथतीर्थ स्वामी
श्री वामनराव वैद्य वामोरीकर
श्री वासुदेव बळवंत फडके
श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी
श्री विद्यानंद बेलापूरकर
श्री विरुपाक्षबुवा नागनाथ
श्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा
श्री विष्णुदास महाराज, माहुर
श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी
श्री शंकर पुरूषोत्तमतीर्थ
श्री शंकर महाराज
श्री शंकर दगडे महाराज
श्री शंकर स्वामी
श्री शरद जोशी महाराज
श्री शांतानंद स्वामी
श्री श्रीधरस्वामी महाराज
श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती
श्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे
श्री साईबाबा शिर्डी
श्री साधु महाराज कंधारकर
श्री साटम महाराज
श्री सायंदेव
श्री सिद्धेश्वर महाराज
श्री सीताराम महाराज
श्री स्वामीसुत
श्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
श्री हरिबाबा महाराज
श्री हरिभाऊ निठुरकर महाराज
श्री हरिश्चंद्र जोशी
सौ. ताईमहाराज चाटुपळे
ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज
उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष
मानसपूजा
श्री गुरुचरित्र
श्री दत्त महात्म्य
श्री गजानन विजय ग्रंथ
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
श्री दत्तपुराण
श्री गुरुगीता
श्री स्वामी चरित्र सारामृत
श्री अनघाष्टमी व्रत
श्रीचंद्रलापरमेश्वरी
श्री सत्यदत्तव्रत पूजा
श्री अनंत व्रत
चांद्रायण व्रत
इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र
श्री दत्तभावसुधारस स्तोत्र
श्री दत्त मालामंत्र
अपराधक्षमापनस्तोत्रं
करुणात्रिपदी
श्री दत्तात्रेय स्तोत्र
श्रीगुरुसहस्रनामस्तोत्रम्
सिद्धमंगलस्तोत्र
जयलाभ यश स्तोत्र
नर्मदा परिक्रमा
दत्त परिक्रमा
तीर्थयात्रा 
देवपूजा
गुरुपौर्णिमा
औदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३
कन्यागत महापर्वकाल
कुंडलिनी शक्ती जागृती  (शक्तिपात दीक्षा) 
रुद्राक्ष
श्री दत्तलीलामृताब्धिसार अष्टमलहरी
श्री नवनाथ पारायण पुजा विधी 
श्री रूद्र अभिषेक महत्त्व 
अश्वत्थ वृक्ष
गुरुद्वादशी
घोरकष्टोद्धरण स्तोत्र
चार वाणी
दत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती
भस्म महात्म्य
श्री गुरुप्रतिपदा
श्री दत्त जयंती
श्री दत्त बावनी
श्री दत्तस्तवस्तोत्र
श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र
श्री नृसिहसरस्वती जयंती
श्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

              ॥ अभंग

▪अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 
▪आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु 
▪काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल 
▪कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय
▪ गुरु परमात्मा परेशु देवासी तो पुरे एक प्रेमभाव 
▪माझे माहेर पंढरी 
▪माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद 
▪येथोनी आनंदू रे आनंदू 
▪वारियाने कुंडल हाले 
▪विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान 
▪सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर 
▪सत्वर पाव ग मला भवानी आई 
▪राम नाम ज्याचें मुखी 
▪रूपे सुंदर सावळा गे माये ▪ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था 
▪आवडीनें भावें हरिनाम घेसी ▪कशि जांवू मी वृंदावना 
▪कसा मला टाकुनी गेला 
▪राम कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल 
▪या पंढरीचे सुख पाहतां डोळां 
▪असा कसा देवाचा देव बाई ठकडा

            🚩🚩🚩🚩🚩

    🙏 विनम्र अभिवादन🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾
स्त्रोत ~ dattamaharaj.com

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती राजाराम भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️                     
➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                       
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
  🚩🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺🚩

       छत्रपती राजाराम भोसले
( मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती )


     जन्म : २४ फेब्रुवारी १६७०
              (राजगड)

       मृत्यू : ३ मार्च १७००
                 (सिंहगड)
           अधिकारकाळ
          १६८९ - १७००
        अधिकारारोहण
       १२ फेब्रुवारी १६८९
पुर्ण नाव : छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
राज्याभिषेक : १६८९

राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत उत्तर नर्मदेपर्यंत

राजधानी : जिंजी, राजगड

संभाजी २रे
उत्तराधिकारी : ताराराणी भोसले
वडील : शिवाजीराजे भोसल
आई : सोयराबाई
पत्नी : जानकीबाई, ताराबाई
राजघराणे : भोसले
चलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

पहिले राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. इ.स. १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.

🏇 छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !

१. मराठेशाहीही खालसा करण्याची जिद्द बाळगत महाराष्ट्रात छावणी करून बसलेला औरंगजेब !

‘छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर आणि दारुण वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फीकार खान याचा वेढा पडला होता आणि सर्व मराठा राजकुटुंबांसह मराठ्यांची राजधानी हस्तगत करून दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या पाठोपाठ मराठेशाहीही खालसा करण्याचा दुराग्रह (जिद्द) बाळगत औरंगजेब महाराष्ट्रात छावणी करून बसला होता.

२. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवणे आणि त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेणे

अशा भयंकर संकटात रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून त्यांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले आणि ‘मराठ्यांचे राज्य बुडालेले नाही, एवढेच नव्हे, तर मराठ्यांचे शत्रूंशी निकराने युद्ध
चालूच राहील’, हे त्यांनी बादशहास दाखवून दिले. अशा प्रसंगी रायगडावर राजकुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकाच स्थानी अडकून रहाणे धोक्याचे होते; म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्‍यांसह गडाबाहेर पडावे, किल्लो-किल्ले फिरते राहून शत्रूशी प्रतिकार चालू ठेवावा आणि त्यातूनही बिकट
परिस्थिती उद्भवली, तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, अशी मसलत येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली. त्यानुसार राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवला. लवकरच पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला. स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली. तेव्हा पूर्वनियोजित मसलती प्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकार्‍यांनिशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला.

३. कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे, असा चंग औरंगजेबाने बांधला असणे आणि कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे, असा राजाचा कूटनिश्चय असणे

‘आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज चाणाक्ष औरंगजेबाने अगोदरच बांधला होता आणि त्या दृष्टीने दक्षिणेतील सर्व संभाव्य मार्गावरील किल्लेदार आणि ठाणेदार यांना त्याने सावधानतेचा आदेश पाठवला होता. राजा कदाचित समुद्रमार्गावरून पळून जाईल; म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजाचा कूटनिश्चय होता.

४. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरणे

पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्‍याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.

५. मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे, हे मोगलांना माहीत होणे आणि स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवणे

मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्‍या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.

६. चन्नम्मा राणीने हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे शिवछत्रपतींचे कार्य ज्ञात असल्यामुळे राजाराम महाराजांना तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करणे

ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे
शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच तिने त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिने महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्‍यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने तिला शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्याने घेऊन राणीचा बचाव केला.

७. राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्‍या एका बेटावर मुक्काम करत असतांना मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकणे

राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्‍या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली.

८. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसणे आणि नंतर तो नकली असल्याचे त्याच्या लक्षात येणे

या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद याने शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने
मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर !  त्याच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.

९. आता मोगलांनी सर्व संभाव्य मार्र्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवणे

शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.

१०. बंगळूरच्या मुक्कामी महाराजांकडे पाहून ‘हा कोणी मातब्बर माणूस दिसतो’ हे स्थानिक लोकांच्या लक्षात येणे आणि त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगणे

बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्‍या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्‍यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ प्रभृतींना वैâद करून ठाण्यात नेले.

११. छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसणारे खंडो बल्लाळ आणि इतर प्रभृती !

ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ प्रभृतींनी छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.

१२. पुढे राजाराम महाराज मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या अंबूर या ठिकाणी पोहोचणे

राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्‍या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हा मराठा सरदार छावणी करून होता. त्याला महाराज आल्याची वार्ता समजताच तो त्वरेने दर्शनास आला आणि त्याने महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्‍या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती.

१३. जिंजी किल्ला म्हणजे कर्नाटकातील मराठी राज्याचे प्रमुख केंद्र असणे

स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.

१४. राजाराम महाराजांच्या सावत्र बहिणीने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता करणे; पण सैन्यातील अधिकार्‍यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त करणे आणि महाराज आपल्या सहकार्‍यांनिशी जिंजी किल्ल्यात येणे*
संभाजीराजांच्या काळात हरजीराजे महाडीक हा कर्नाटकातील मराठ्यांचा मुख्य सुभेदार होता. त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्यांची बायको, म्हणजे राजाराम महाराजांची सावत्र बहीण. हरजीराजांच्या मागे तिचा स्वतंत्र होण्याचा उद्योग चालू होता. तिने जिंजीचा किल्ला साधनसंपत्तीसह बळकावला होता. आता तिने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता चालू केली. ‘किल्ला आपल्या स्वाधीन करावा’, हा महाराजांचा निरोप तिने धुडकावून लावला. एवढेच नव्हे, तर त्यांना लष्करी प्रतिकार करण्यासाठी ती आपले सैन्य घेऊन जिंजीबाहेर पडली; पण काही अंतर गेल्यावर तिच्याच सैन्यातील अधिकार्‍यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त केले. शेवटी आपली बाजू दुर्बळ झाल्याचे पाहून निरुपायाने ती किल्ल्यात परतली. जिंजीतील मराठ्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला. परिणामी अंबिकाबाईस आपल्या बंधूच्या स्वागतासाठी जिंजीचे द्वार उघडावे लागले. नोव्हेंबर १६८९ च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज आपल्या सहकार्‍यांनिशी जिंजी किल्ल्यात आले. जिंजीचा प्रवास असा सुखान्त झाला.

१५. जिंजीत मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ होणे

मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.

१६. संताजी, धनाजी अशा अनेक प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज देणे आणि नंतर महाराजांनी महाराष्ट्रात येऊन मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवणे
पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. खिस्ताब्द १६९० या वर्षी खानाने जिंजीस वेढा दिला तो ८ वर्षे चालू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मोगलांची हैराणगत केली. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. शेवटी खिस्ताब्द १६९७ या वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली खरी; पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असतांनाच त्यांचा प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन कृ. नवमी, शके १६२१ या दिवशी त्यांचे निधन झाले.

🚩  हर हर महादेव...!! 🚩
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

      🙏 विनम्र अभिवादन🙏
         ♾️♾️♾️ ♾️♾️♾️
   स्त्रोत ~ hindujagruti.org   l                                                                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रसंत गाडगेबाबा

      ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील   
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥

            स्वच्छतेचे पुजारी 
          संत गाडगे महाराज

     डेबूजी झिंगराजी जानोरकर
             (समाज सुधारक)

     जन्म : 23 फेब्रुवारी 1876
 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)

    निधन : 20 डिसेंबर 1956
                (वय 80)
  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )

मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    
                      नीतिशास्त्र
प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा
                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.
 
👬 गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट
                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
📚 गाडगे महाराजांची चरित्रे
  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
🎥 गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट
                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

📖 साहित्य संमेलन
               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

मृत्यू
                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 

🏵 सन्मान
                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.
🏵 सन्मान
            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.

 🙏🌹 गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला... 🌹🙏
        

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾♾♾  ♾♾♾
      स्त्रोत ~ WikipediA                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

राणी चेन्नम्मा

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                         
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🔫🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🏇🤺🔫

        🏇 राणी चेन्नम्मा 🤺


  जन्म :  23 आॕक्टोबर 1778
          (बेलगाम, कर्नाटक)

वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829
             (बैलहोंगल)

             कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच  ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करतना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.
             पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते. 
            राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे. 
           राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते. 
          राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.
             दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले. 
          एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना  बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.
             कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.
             राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव 
'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता. 
          आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य  करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते. 
          थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा." 
            राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे  राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले
की, "कित्तूर एक स्वतंत्र  राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."
     राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर  १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे, 
"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य  करायला लावले.'
           युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे,  हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण  उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .
देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व  इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.
             कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व  कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले, 
"कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला. 
            स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो  दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता.  गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की, 
"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे
युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.
             राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला. 
          शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व  बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला. 
          कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.
           रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,
 "आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही. 
            त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ आॕक्टोबरला कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
            त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

            ♾♾♾ ♾♾
स्त्रोत ~ महान भारतीय क्रांतिकारक 
               - श्री. स. ध. झांबरे                    
➖➖➖➖➖➖➖➖➖     
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवाजी महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                          
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🤺🚩🏇🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🚩🤺
          
      छत्रपती शिवाजी राजे भोसले

     जन्म : १९ फेब्रुवारी १६३०
     मृत्यू  : ३ एप्रिल १६८०
           राजधानी - रायगड

     🚩🏇🚩🤺🚩🏇🚩🤺

          *"प्रौढ प्रताप पुरंदर"*
      *"महापराक्रमी रणधुरंदर"*
        *"क्षत्रिय कुलावतंस्"*
          *"सिंहासनाधीश्वर"*
          *"महाराजाधिराज"*
              *"महाराज"*
               *"श्रीमंत"*
                 *"श्री"*
                 *"श्री"*
                 *"श्री"*
              *"छत्रपती"*
              *"शिवाजी"*
              *"महाराज"* 
                 *"की"*
                 *"जय"*
   *!! जय भवानी ~ जय शिवाजी !!*

    🚩🚩 🏇🤺🏇🚩🚩

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक , सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही  वंदिले जातात. शत्रुविरुध्द लढण्याकरीता  महाराष्ट्रातील डोंगरद-यांमध्ये  अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त  स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती.  ते सरदार/किल्लेदार  जनतेवर अन्याय-अत्याचार  करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
छत्रपतींच्या व्यक्तीमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास... शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन , कडक व नियोजनबध्द प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्चकोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात.

*छत्रपती शिवाजी महाराजांनी.....*

* बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले.

* पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला.

* साध्या-भोळ्या मावळयांचा संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला.

* स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या  कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले.

* महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले व नविन निर्माण केले.

* योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरुन अनेक शत्रुंना  नामोहरम केलेच, तसेच  फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.

 आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.

 सामान्य रयतेची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था ... अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.

 राजभाषा विकसित करण्याचा गांभिर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला.

 तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.

सतीप्रथेला विरोध केला.

स्त्रियांना मान- सन्मान-प्रतिष्ठा देऊन त्यांचा आदर केला.

या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात  !!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला  प्रेरणा देते.

🚩 राज्य व्हावे हीच श्रींची इच्छ 🚩

          🙏🚩🕉🚩🙏

शिवजयंतीच्या आपण सर्वांना हटवार परिवार ब्रम्हपुरी तर्फे हार्दिक शुभेच्छा !!

      🚩 हर हर... महादेव 🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌸 विनम्र अभिवादन 🌸🙏
                 
         ♾♾♾  ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬
   संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   ⚜️✍⛓🇮🇳👨‍🦰🇮🇳⛓✍️⚜️
           
      गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)


(महाराष्ट्रीय समाजसुधारक)

जन्म : १८ फेब्रुवारी १८२३            मृत्यू : ९ ऑक्टोबर १८९२                                                             
हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं.    सरदार गोपाळ हरी देशमुखांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.

इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.

✍️ लेखन
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले. इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.
📚 लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य
इतिहास : (एकूण १० पुस्तके)
भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
पाणिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
हिंदुस्थानचा इतिहास - पूर्वार्ध (१८७८)
गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
लंकेचा इतिहास (१८८८)
सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
टीप : पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
गीतातत्त्व (१८७८)
सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
स्वाध्याय
प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
आगमप्रकाश (गुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
समाजचिंतन : (एकूण ५ पुस्तके)
जातिभेद (१८८७)
भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
विद्यालहरी (?)
संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
होळीविषयी उपदेश (१८४७)
महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
शब्दालंकार (१८५१)
हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
आत्मचरित्र
एका दिवसात लिहिलेले पुस्तक
विचारलहरी
हिंदुस्थानातील बालविवाह
लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
निबंध : (एक)
लोकहितवादींची शतपत्रे : (डाॅ. अ.का. प्रयोळकर यांनी 'लोकहितवादीकृत निबंध संग्रह' या नावाने ह्या शतपत्रांचे पुनःसंपादन करून ती प्रसिद्ध केली आहेत -ललित प्रकाशन)
🔰 अन्य सामाजिक कार्य
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.

त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्‌बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते.

गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.

इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

♻️ समाजकार्य
अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
🔮 इतर
अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बॉंबे
अध्यक्ष, गुजराती बुद्धिवर्धक सभा
१८७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य झाले.
📜 पुरस्कार
ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.                                                                                                                                                
                                        
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾️ 
      स्त्रोत ~ WikipediA                                            
➖➖➖➖➖➖➖➖➖    
🇲 🇹 🇸   🇲 🇹 🇸  🇲 🇹 🇸
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...