सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

श्री कृष्ण जन्माष्टमी


कृष्ण जन्माच्या निमित्ताने :-

कृष्णाला आपण देव म्हणून पुजतो. आपल्याला तो वंदनीय आहे. भगवद्गीतेचा रचैता, जी भगवद्गीता आपण आपला धर्मग्रंथ मानतो पण वाचत नाही, समजून घेत नाही, आचरणात आणण्याची तर गोष्टच लांब ! 

श्री कृष्ण काय होते आणि आपण त्यांना कसे गुरु करू शकतो हे लक्षात घेतले तर निव्वळ मज्जाच !  
कृष्ण हा मुत्सद्दी, तत्त्ववेता, शिष्टाई करणारा, व्ह्यूवरचनाकार, प्रेरक, मार्गदर्शक, मित्र, सखा, प्रियकर, पालक, बालक अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटतो.

 या कृष्णाच्या बाबतीत आपण त्याला निव्वळ देव म्हणून पुजण्यापेक्षा त्याच्या चरित्राचे अनुकरण करावे हीच त्याला खरी वंदना आहे.

 प्रत्येकाने कृष्ण व्हावे अथवा कृष्णासारखा सोबती सोबत ठेवावा म्हणजे जीवनात प्रत्येक क्षणी पावलोपावली जे कुरुक्षेत्र आपल्यासमोर येत असते त्यात सामोरे जाणाऱ्या लढायांना यशस्वीरित्या तोंड देता येईल. 

अर्जुनाला कुरुक्षेत्रावर त्याचे कर्तव्य बजावायला सर्व क्षमता सोबत असूनही अडचण आली होती. अर्जुन थांबला होता. अर्जुनाचे कर्तव्य हे धर्माचे कर्तव्य होते, अर्जुनाची लढाई ही धर्माची लढाई होती. तथापि अनेक विविध धारणा ज्या सत्यनसूनही सत्य असल्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे तो त्याच्या कर्तव्यापासून, त्याचे कौशल्य वापरण्यापासून परावृत्त झाला होता.

 त्याला तुझ्या भावभावना बाजूला ठेवून तुला आवश्यक ते कर्तव्य पार पाडणे कसे आवश्यक आहे आणि कसे सहज शक्य आहे आणि ते कसे धर्मानुरुप आहे हे समजून सांगणारा कृष्ण होता. कृष्णाच्या उपदेशंती अर्जुन लढाईस तयार झाला आणि त्यांनी ते अक्राळविक्राळ युद्ध जिंकले.

 वास्तविकता अर्जुनाला कृष्णाने उपदेश करण्यापूर्वी आणि कृष्णाने उपदेश केल्यानंतर त्याच्या युद्ध कौशल्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. वास्तविक पाहता युद्ध कौशल्य हा कृष्णाचा प्रांतच नव्हता.

 कृष्णाला जी अनेक नावे आहेत त्यापैकी एक नाव रणछोडदासजी आहे. रणछोडदास म्हणजे जो रणांगणातून पळून गेला तो !  पण या अशा रणछोडदासांनी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात तात्कालीन सर्वश्रेष्ठ योध्याला लढाया प्रवृत्त केले, प्रेरित केले आणि त्याची कौशल्य वापरून ते युद्ध जिंकेल आणि धर्माला विजय मिळवून देईल अशी योजना केली.

 आपल्या आयुष्यातही आपल्या आजूबाजूला असे अनेक अर्जुन आहेत जे सर्व कौशल्य धारण करतात. तथापि त्यांच्या काही धारणामुळे कौशल्य वापरण्यापासून परवृत्त्त होतात, त्यांच्या कुरुक्षेत्रावरील लढाया लढत नाहीत आणि जिंकण्याची क्षमता असतानाही पराभूत होत राहतात.

 अशा सर्व अर्जुनांसाठी आपण कृष्ण बनून त्यांना त्यांच्या लढाया जिंकण्यास प्रवृत्त करू शकतो.

 त्यासोबतच आपल्या सोबतही अनेक प्रश्न असतात. आपणही क्षमता असूनही आवश्यकता असूनही कौशल्य असूनही आपल्या जीवनात पावलोपावली आपल्यासमोर येणाऱ्या कुरुक्षेत्रांवर मर्दुमकी गाजवण्यापासून आपल्या धारणामुळे परावृत्त्त होत असतो. पण आपण त्या कृष्णाचे ऐकत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

 असे आपल्या आयुष्यातील कृष्ण ओळखून त्यांच्या प्रबोधनाचा लाभ घेऊन आपण आपल्या लढाया जिंकण्याचा निर्धार कृष्ण जन्माष्टमी निमित्त करूया !
🙏🌹🙏

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

9 ऑगस्ट क्रांतिदिन

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
           ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                               ➿➿➿➿➿➿➿➿➿                                               

       चले जाव चळवळ १९४२  
         भारत छोडो आंदोलन   
               ऑगस्ट क्रांती

                हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य  प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 
             सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये 
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
 
छोडो भारत चळवळीची 
अपयशाची कारणे
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद

इतर कारणे

 त्रिमंत्री योजना
                  दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

चलेजाव आंदोलन (१९४२)
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶  या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था
सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले
      क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

 नेताजी सुभाष चंद्र बोस
                      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

आझाद हिंद सेना
           ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
भारतीय नौदलाचा उठाव
           आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

माउंटबॅटन योजना
                       २४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
         🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 
                 
     
स्त्रोत ~ WikipediA    
            historympsc.com                                                                                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖

रविवार, २१ जुलै, २०२४

Writing Skill

`•.,¸¸,.•´¯   🎀  𝒜𝓋𝒾𝓃𝒶𝓈𝒽 𝒫𝒶𝓉𝒾𝓁 𝐸-𝓁𝑒𝒶𝓇𝓃𝒾𝓃𝑔  🎀   ¯´•.,¸¸,.•`
                              

*🌈सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त इंग्रजी ग्रामर...* 

*✍️ 1️⃣8️⃣ वा दिवस✍️*

*18) FUTURE CONTINUOUS TENSE* 
 👇👇👇👇👇

https://youtu.be/VsfzIazDokw?si=rbK5kzxw2NcpavAb

*****************
*या घटकावर  ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*
👇👇👇👇👇
 
https://forms.gle/gwESFMwARaMxDJ7R6

_ऑनलाईन टेस्ट नियमीत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गृप जाॅईन करा._

https://chat.whatsapp.com/E2iOzSWpaqY1GEvep8riql

*निर्मिती*
श्री अविनाश पाटील - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.जि. धुळे
✍️ ✍️🎖️✍️ ✍️

Future Perfect Continuous Tense

`•.,¸¸,.•´¯   🎀  𝒜𝓋𝒾𝓃𝒶𝓈𝒽 𝒫𝒶𝓉𝒾𝓁 𝐸-𝓁𝑒𝒶𝓇𝓃𝒾𝓃𝑔  🎀   ¯´•.,¸¸,.•`
                              

*🌈सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त इंग्रजी ग्रामर...* 

*✍️ 1️⃣8️⃣ वा दिवस✍️*

*18) FUTURE CONTINUOUS TENSE* 
 👇👇👇👇👇

https://youtu.be/VsfzIazDokw?si=rbK5kzxw2NcpavAb

*****************
*या घटकावर  ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*
👇👇👇👇👇
 
https://forms.gle/gwESFMwARaMxDJ7R6

_ऑनलाईन टेस्ट नियमीत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गृप जाॅईन करा._

https://chat.whatsapp.com/E2iOzSWpaqY1GEvep8riql

*निर्मिती*
श्री अविनाश पाटील - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.जि. धुळे
✍️ ✍️🎖️✍️ ✍️

Future Perfect Tense

`•.,¸¸,.•´¯   🎀  𝒜𝓋𝒾𝓃𝒶𝓈𝒽 𝒫𝒶𝓉𝒾𝓁 𝐸-𝓁𝑒𝒶𝓇𝓃𝒾𝓃𝑔  🎀   ¯´•.,¸¸,.•`
                              

*🌈सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त इंग्रजी ग्रामर...* 

*✍️ 1️⃣8️⃣ वा दिवस✍️*

*18) FUTURE CONTINUOUS TENSE* 
 👇👇👇👇👇

https://youtu.be/VsfzIazDokw?si=rbK5kzxw2NcpavAb

*****************
*या घटकावर  ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*
👇👇👇👇👇
 
https://forms.gle/gwESFMwARaMxDJ7R6

_ऑनलाईन टेस्ट नियमीत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गृप जाॅईन करा._

https://chat.whatsapp.com/E2iOzSWpaqY1GEvep8riql

*निर्मिती*
श्री अविनाश पाटील - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.जि. धुळे
✍️ ✍️🎖️✍️ ✍️

Future Continuous Tense

`•.,¸¸,.•´¯   🎀  𝒜𝓋𝒾𝓃𝒶𝓈𝒽 𝒫𝒶𝓉𝒾𝓁 𝐸-𝓁𝑒𝒶𝓇𝓃𝒾𝓃𝑔  🎀   ¯´•.,¸¸,.•`
                              

*🌈सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त इंग्रजी ग्रामर...* 

*✍️ 1️⃣8️⃣ वा दिवस✍️*

*18) FUTURE CONTINUOUS TENSE* 
 👇👇👇👇👇

https://youtu.be/VsfzIazDokw?si=rbK5kzxw2NcpavAb

*****************
*या घटकावर  ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*
👇👇👇👇👇
 
https://forms.gle/gwESFMwARaMxDJ7R6

_ऑनलाईन टेस्ट नियमीत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गृप जाॅईन करा._

https://chat.whatsapp.com/E2iOzSWpaqY1GEvep8riql

*निर्मिती*
श्री अविनाश पाटील - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.जि. धुळे
✍️ ✍️🎖️✍️ ✍️

Simple Future Tesnse

`•.,¸¸,.•´¯   🎀  𝒜𝓋𝒾𝓃𝒶𝓈𝒽 𝒫𝒶𝓉𝒾𝓁 𝐸-𝓁𝑒𝒶𝓇𝓃𝒾𝓃𝑔  🎀   ¯´•.,¸¸,.•`
                              

*🌈सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त इंग्रजी ग्रामर...* 

*✍️ 1️⃣2️⃣ वा दिवस✍️*

*12) PRESENT PERFECT CONTINUOUS TENSE* 
 👇👇👇👇👇

https://youtu.be/70j8NT9rLU8?si=KgG91EIMxrval_5o

*****************
*या घटकावर  ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*
👇👇👇👇👇

https://forms.gle/UHomGBaQK7Pu95Nu7

_ऑनलाईन टेस्ट नियमीत मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गृप जाॅईन करा._

https://chat.whatsapp.com/E2iOzSWpaqY1GEvep8riql

*निर्मिती*
श्री अविनाश पाटील - बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता.जि. धुळे
✍️ ✍️🎖️✍️ ✍️

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...