गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

1 जुलै ते 30 नोव्हेंबर कालावधीतील महागाई भत्ता रोखीने देनेबाबत..

राज्य कर्मचारी यांना १ जुलै  ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ५ % महागाई भत्ता वाढीची थकबाकी रोखीने देनेबाबत.....

1.1 Walk a little Slower

✍️✍️🏆✍️✍️

E-Learning आयोजीत.... 

📘📚 इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी📘📚   
     
 विषय : -इंग्रजी
 
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
 मी आज तुम्हाला 

1.1 Walk a little slower (9th English)


या घटकावर प्रश्नावली पाठवीत आहे. ती तुम्ही सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना शुभेच्छा !!!


कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करा.

🙏आपलाच🙏
श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

14 सितंबर हिंदी दिवस

आज हमारे बापूसाहेब डी. डी. विसपूते स्कूल मे 14 सितंबर हिंदी दिवस मनाया गया. इस वक्त स्कूल के प्रधानाचार्य श्रीमान पी. बी. पाटील, श्रीमान सी.एच. मासूळे, डी. डी. पवार, एस. आर. पाटील, एस. बी. भदाणे उपस्थित थे | 
इस वक्त गीतगायन स्पर्धा का आयोजन किया गया था | दिनभर छात्रोंने हिंदी में वार्तालाप किया | कार्यक्रम का आयोजन हिंदी के अध्यापक श्रीमान ए. के. पाटील ने किया | 

पांगुळगाडा (भाग - 2) लेखक - श्री वासुदेव पाटील

#पांगुळगाडा

         🔖 भाग ::-- दुसरा

      ✒️ वा......पा.............

   वायकराची घारी करडी नजर दोन्ही मोरबी, तापी काठ व पंचक्रोशीत भिरभिरत होती. पण त्यांना काहीच सुगावा लागेना. पांगुळगाडा ज्या सौंदळच्या झाडाखाली पडला होता तेथून पात्राचं जे अंतर होतं ते एक सव्वा वर्षाचं पोर सहसा पार करु शकत नाही. म्हणजे पोरास तेथून कुणीतरी पात्रात घेऊन गेलं असावं! पण कोण? सजन तात्याचे गावात संबंध एकदम सलोख्याचे! माणूस अजातशत्रू! मग घेऊन जाणारा कोण? बरं पात्रात टाकलं तर प्रेत एव्हाना वर आलं असतं. दूर दूर काठावरील गावात प्रेत सापडल्याची बातमी नाही! मग पळवून कुठं नेलं असावं? का? वायकर  सिगारचा कस घेत वलय सोडत मेंदुचा किस पाडू लागले. समोर जमा केलेला पांगुळगाडा पडलेला. पांगुळगाडा अतिशय दणगट व सुबक बनवलेला! एक लहान मूल हा गाडा घेऊन मागच्या गेटजवळच्या पायऱ्या उतरुच शकत नाही. एकतर तो कोलमडून पडला असावा. पडल्या बरोबर भोकांड पसरल्यावर सात आठला मंदिरात गर्दी असतेच. कुणी तरी नक्कीच ऐकलं असतं. पण असं काहीच न होता तो सौंदळपर्यंत पोहोचतोच कसा? नाही! कोणीतरी सराईतपणे घेऊन गेलाय! पण मग घेऊन जाणारा कुणाच्या नजरेस का पडला नाही.
    आठ दहा दिवस सजन पाटलाकडे नुसता आक्रोश व जीव तोडून बाळाची वाट पाहणं सुरु होतं. हळूहळू आशा मावळायला लागली.

     गिरधन आबाच्या गयभूनं बारकू बोरसाकडं दरवाजा बनवण्यासाठी लाकडं टाकली होती. दरवाजा बनवून बरीच लाकडं उरली होती. 

" गयभू दा! या उरलेल्या लाकडाचं काय करायचं? घरी नेतोय का?" बोरसानं विचारलं.

" घरी नेऊन पसारा पेक्षा पांगुळगाडाच बनवा! आमच्या सोनूस कामाला येईल!" गयभू बोलला नी बोरसाचे हात पुन्हा थरथरले. त्यानं भितभितच रुकार भरला.
 पडलेली लाकडं परत ठेवण्यापेक्षा तो लागलीच कामास लागला.  सायंकाळी तप्ती काठावरुन टिटव्यांचा आक्रोश वर चढत चढत बारकू बोरसाच्या पत्री शेडवर कर्कशता आणू लागला. शेडच्या मागच्या शेतात आंब्याचं भलं मोठं झाड होतं. त्याच्या ढोलीत सायंकाळी घुबडाची जोडी दिसली. तशी ही जोडी दहा बारा दिवसापूर्वीच आली होती. पण आज बारकूस सायंकाळी ती नजरेस पडली. घुबडांची तीक्ष्ण नजर जणू आपणावरच रोखली असा भास त्याला जाणवला. तयार झालेला पांगुळगाडा  त्यानं आपल्या म्हाताऱ्यास गिरधन आबाकडं द्यायला पाठवलं. म्हाताऱ्यानं पांगुळगाडा उचलला व तो लहान मोरबीत चढू लागला. त्याच्या डोक्यावरच्या आभायात टिटव्या नुसत्या गचबुच गिल्ला करत होत्या.

     मंदीराचं वाल कंपाऊंड तयार होऊन दोन तीन महिने झाले होते. मंदीराच्या ट्रस्टचे अध्यक्ष असणारे गिरधन आबा गावातल्या श्रीराम पेंटरला आपल्या घरी बोलवून तासत होते. बोरसाच्या बापानं पांगुळगाडा दिला व ते माघारी फिरले.

" श्रीराम अख्ख्या तालुक्यातील कामं करतो नी गावचं मंदीराचं काम तुला जमत नाही रे? ज्या गावात राहतो त्या गावाचे असे पांग फेडतो?"

" आबा, माझं ऐका दुसरा पेंटर पहा! कारण माझ्याकडे वर्षापासूनची कामं पेंडींग पडलीत. मी रात्रंदिवस कामं करतो तरी सरकत नाहीत".

" श्रीराम! दुसरा पेंटर पाहिला असता तर एवढ्यात पुरं वालकंपाऊंड रंगवून झालं असत! मला ते काही माहीत नाही. हवं तर फुकट नको आम्हाला मजुरी घे पण गावचं काम तूच कर!"

" आबा, गावचं सार्वजनिक काम मी कधी मजुरीनं केलंय का, की याची मजूरी घेईन! काम मी असंच करीन! पण मला सवडच नाही म्हणून मी नकार देतोय!"

" मग असं कर हवंतर रोज रात्री थोडंथोडं कर! दिवसा तुझं आधीचं काम उरकव! "

श्रीराम पेंटरनं कसंनुसं तोंड करत रुकार भरला व तो उठला. गिरधन आबांनी प्रायमर व रंगाचे डब्बे त्याकडं लगोलग दिले. श्रीराम पेंटरनं सोबत आणलेल्या मुलाच्या मदतीनं ते सामान मंदीरात पोहोचतं केलं. लगेच गावातली दोन तीन माणसं पकडली व वालकंपाऊंडला प्रायमर मारावयास सुरुवात केली. रात्रभर स्वत: उभं राहत त्यानं प्रायमर मारला. श्रीराम पेंटर हाडाचा चित्रकार होता. कोणतीही पेंटीग तो लिलया साकारी. म्हणून वर्षभर आगाऊ त्याच्याकडे काम पडलेली असत. सार्वजनिक कामाची तो गावातून कधीच मजूरी घेईना.
रात्रभर प्रायमर मारल्यावर त्यानं हाताखालच्या माणसांना दिवसा रंग मारावयास ठेवलं व तो दुसऱ्या कामावर निघून गेला.

   गिरधन आबाच्या घरी गयभूचा एक वर्षाचा मुलगा सोनू व तीन वर्षाची मुलगी बाली दिवसभर पांगुळगाडा फिरवत धूम करत होती. बाली सोनूकडून पांगुळगाडा हिसकावत जोरात गरागरा घरभर फिरवी नी सोनू पाय पसरत जमिनीवर फतकल मांडत दात ओठ ताणत बोंबले.

" बाली ! तो लहान आहे त्याला दे नाहीतर तुला मी  झाडणीच्या बुडक्यानं बुकलेल!" लिला संतापू लागली. सायंकाळ पावेतो गिरधन आबाकडं हाच खेळ रंगला होता. सायंकाळ होताच आंब्यावरील घुबडाची जोडी गिरधन आबांच्या माडीच्या वरच्या वळचणीला आली.

        रात्री गावात येताच श्रीराम पेंटरनं कसंबसं जेवण उरकलं व तो मंदीरात आला. त्यानं गयभूस बोलवत आणखी लाईट आणावयास लावले. आज रात्री तो मजुरांनी रंगवलेल्या वालकंपाऊंडवर चित्रे काढणार होता. पण कालच्या रात्रीचं जागरण व दिवसाही झोप नाही म्हणून त्याचे डोळे मटमट करत बंद होत होते. त्याला झपकीवर झपकी येत होती. तसं तो रात्रंदिवस काम करी पण दिवसा वा रात्री दोन तीन तास तरी झोप काढी. पण आज झोपच झाली नव्हती.
   त्यानं मंदीराच्या लहान मोरबीकडं असणारं गेटजवळचं वालकंपाऊंड चितारावयास सुरुवात केली. मजूर आज थांबली नाहीत. कारण प्रायमर व रंगवणं संपलं होतं. आता चितारणं पेंटरचच काम होतं.

  श्रीराम पेंटरला लहान मोरबीकडून येतांना बाहेरुन मंदीराची आतली बाजू जी दिसायची तीच त्या गेटजवळच्या वाल कंपाऊंडवर चितारायची होती. त्यानं ब्रश व रंग घेत फर्ऱ्हाटे मारावयास सुरुवात केली. गेटमधून मंदीराचा जितका भाग दिसे तो त्यानं चितारावयास सुरुवात केली. विठ्ठल मंदीराची समोरची बाजू, त्यामागं दडलं असलं तरी डोकावणारं महादेव मंदीर, त्याजवळचा वड, पिंपळ , लिंब ,पटांगण तो चितारू लागला. पण हे चितारता चितारताच त्याच्या डोळ्यात झोप तरारली. तो चितारतोय की झोपतो हेच त्याला कळेना. घडीत आपण ब्रश ठेवून कंपाऊंडला टेकून झोपलोय ही जाणीव मेंदूत धडका देऊ लागली तर घडीत लगेच आपण ब्रश घेत जोमानं चितायतोय असली जाणीव नेणीवात नेऊ लागली. 

      वायकरनं आमले पोलीसास सोबत घेत पेट्रोलिंग सुरू केलं. मोठी मोरबी केल्यावर मंदीराजवळून ते लहान मोरबीत चढणार होते. तोच वालकंपाऊंड जवळ त्यांना कोणी तरी दिसलं म्हणून त्यांनी आमलेस गाडी तिकडं वळवावयास लावली.
 गाडीतून उतरत ते गेटजवळ जाताच वालकंपाऊंडला टेकून झोपलेला पेंटर दिसला. पण त्यापेक्षा  त्यांचं लक्ष चित्रावर गेलं. टांगलेल्या लाईटच्या उजेडात ते चित्राकडं एकटक पाहू लागले. गेटमधून घुसतांना दिसणारा समोरचा भाग जसाचा तसा दिसत होता. पेंटरची  अद्भुत कारीगरी पाहून ते स्तंभित होत बारकाईनं निरखू लागले. मदीर ,मधली झाडं, पटांगण समोरचं कोपऱ्यातलं तापीकाठाकडं उतरणारं गेट...अरे पण त्या गेटमध्ये काय दिसतंय? पांगुळगाडा? ते चित्राच्या अगदी जवळ सरकले. गेटमधून बाहेर निघणारा पांगुळगाडा! त्यांनी गेटमधून मध्ये पाहिलं तर समोर कोपऱ्यात गेट दिसत होतं पण पांगुळगाडा दिसत नव्हता. मग चित्रात यानं का चितारला? तो ही सजन पाटलांच्या नातूच्या घटनेत जमा केलेला पांगुळगाड्यासारखाच! वायकर एकदम धक्क्यात! त्यांनी भिंतीला टेकून झोपलेल्या पेंटरला दरडावत उठवलं. श्रीराम खडबडून गाढ झोपेतून जागा झाला.

" काय रे श्रीराम हे चित्र तू काढलं ना?"

" हो साहेब. चितारता चितारताच झोप लागली".

" चित्रात गेटमध्ये काय दिसतंय रे बघ?"

" बापरे! पांगुळगाडा? गेटजवळ हा कसा चितारला गेला? साहेब कदाचित झोपेच्या गुंगीत फर्ऱ्हाटे उलटसुलट मारले गेले असावेत"

पण उलट सुलट फर्ऱ्हाट्यानं चित्र बिघडलं असतं, इतकं साफ सुथरं चित्र आलंच नसतं हे वायकरांनी  ओळखलं.

" श्रीराम ! चित्र काढतांना तु मध्ये पाहून काढत असेल ना? आठवून पहा ! गेट चितारतांना पांगुळगाडा तिथं असावा?"

" साहेब! झोपेच्या धुंदीत मी काय चितारलं तेच आठवत नाही नी झोपच लागली" म्हणत श्रीरामनं भराभरा रंग मारत पांगुळगाड्याचं चित्र मिटवलं.

   वायकरला मात्र नवल वाटलं. वायकर तेथून पुढं  लहान मोरबीकडं सरकले. मोरबीत जाताच गिरधर आबांच्या माडीजवळ जोराचा गलका त्यांना ऐकू आला. त्यांनी गाडी माडीसमोर थांबवली. गयभू, गिरधर आबा, लिला सारे खाटेवर नसलेल्या आपल्या तीन वर्षाच्या बालीस शोधत होते.
खाटेवर झोपलेली बाली एक वाजता उठलेल्या गयभूस दिसली नाही म्हणून त्यानं  आपली पत्नी लिलास उठवलं. तिच्याजवळ सोनू झोपलेला. मग त्यांनी आबा, आई सर्वांच्या जवळ बालीस शोधलं पण बाली घरात कुठंच दिसेना. म्हणून घरात एकच गहजब उडाला. वायकर जाताच आजुबाजूंचे शेजारी ही उठले. शोधाशोध सुरू झाली. त्यातच गयभूस कालच बनवून आणलेला पांगुळगाडा ही खुंटीस दिसेना. मग तर संशय दाटावला. तात्याचा नातू साऱ्यांना आठवला. मग तर सारी मोरबीच जागे होत तपास करु लागली. शोधाशोध, रडारड, भिती, दहशत! दहा दिवसांत दुसरी घटना. 
   सकाळी तापीपात्रात पांगुळगाडा तरंगतांना दिसला. वायकरला कळताच ते धावतच काठावर आले.  बारकू बोरसानं बनवलेला हा दुसरा पांगुळ गाडा. पुन्हा पात्रात उड्या घेतल्या गेल्या. तळाचा ठाव घेतला गेला. पण भरलेली तापीमाय आपल्या उरात काय काय गुपीत दडवून‌ वाहत होती हे का सहजासहजी कुणास कळणार होतं! दुसऱ्या दिवशी बालीचं शव पात्रावर तरंगताना दिसताच शोध संपला व रडारड, आक्रोश सुरू झाला. पण वायकरचा शोध सुरू झाला.

दोन मुलांचं गायब होणं! पांगुळगाडा  घेऊन गायब होणं! समोर नसलेला पांगुळगाडा चित्रात दिसणं!  वायकर......वायकर......उठा, लागा कामाला......! काल तरंगणारा पांगुळगाडा काढतांना, आज बालीचं शव काढतांना टिटव्या आरडतच होत्या. पिंपळावरची लटकलेली वटवाघळं दिवसाच बिथरत होती. दिवसांध घुत्कारत होती! रात्रीचे वडा- पिंपळावर बसलेले बगळे वेळी अवेळी फडफडत कलकलत मोरबीच्या आभायात घिरट्या घालत होती. वायकर.....उठा...लागा ..कामाला! बारकू बोरसा मात्र पत्र्याच्या शेडमध्ये आपलं लाकूड तासत होता, रंधत होता कुस कोरतच होता!

क्रमश:......

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

लघुकथा - पांगुळगाडा ✍ लेखक - श्री वासुदेव पाटील (संग्राहक - श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा .......

       🔖 भाग ::-- पहिला.

   सायंकाळी नारायणानं मावळतीला पथारी टाकली अन तापीकाठावरील मोरबीच्या वातावरणात आरतीचे स्वर घुमू लागले. हारपक सरत आलेला. शेतातून बैलगाडी, ट्रॅक्टरनं कापूस, मूग, उडीद ,चारा आणत जो तो घराकडं धाव घेत होता. डंगर ढोरांची डोभाण धुराळा उडवत गावात घुसू लागली.  गाडीच्या बैलाच्या गळ्यातील घुंगराच्या आवाजात  मंदिरातील 
"ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।|" 
आरतीचे गोड सूर  मिसळत निनादू लागले.

पश्चिमेकडील शिवारातून येणारा रस्ता मंदिराजवळ काटकोनात येत डाव्या बाजूला लहान मोरबीत व उजव्या बाजूस मोठ्या मोरबीत वळत होता. दोन्ही मोरबीच्या मधोमध उतारावर तापी काठावर विठ्ठलाचं मंदीर. विठ्ठलाच्या मंदीरालगतच महादेवाचं जुनाट व काहीसं भग्न देऊळ. देवळाच्या पूर्वेस जवळच तापीचं भरलेलं खोल पात्र. तेथूनच आठ - दहा  किमीवर बांधलेल्या बॅरेजचं पाणी  दोन्ही काठ सांधत सबडब करत लाटाटत होतं. 

    दोन्ही मंदीरास विस्तीर्ण व दोन्ही मोरबीस जोडणारं वाल कंपाऊंड चालूच बांधलेलं.  वालकंपाऊंडच्या पश्चिमेस शिवारातून येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस तीन चार महिन्यापूर्वीच बारकू बोरसेचं खटलं नवीन आलेलं. गावठाण जमिनीवर पत्र्याचं शेड ठोकत त्यानं आपला धंदा सुरू केलेला. सोफा, दिवाण, बंगळी, दरवाजा, टेबल असं फर्नीचर बनवत मोरबीत जोरदार धंदा सुरू. मोठ्या कामातून उरलेल्या लाकडात तो थरथरत्या हातानं आताशी पांगुळगाडा ही बनवू लागला. एका वर्षापासून त्यानं पांगुळगाडा बनवणं सोडलंच होतं.
आरती होताच सजन पाटील आपल्या सव्वा वर्षाच्या नातवास घेत मंदिरासमोरील पटांगणात आले. नातू बारकू बोरसा कडून कालच आणलेला पांगुळगाडा मजेत फिरवत होता. सजन पाटील नातवाचे वाकडे तिकडे पडणारे पाऊल, जाणारा तोल, बोबडे बोल हारीखानं पाहत नातवामागं फिरत होते. पांगुळगाडा कुठं अडला की हळूच धक्का देत चालता  करत होते. नातू किलकारत पटांगणात फिरत होता. 
    झापड पडताच गावातून मुलं, बाया पणती दिवाटणी घेऊन येत होते. महादेवाजवळ दिवाटणी लावत दर्शन घेत परत फिरत होते. काही विठ्ठलाला फेऱ्या घालत होते. मंदीराजवळील पिंपळ, वडाच्या झाडावरील दिवसभर उलटी लटकलेली वटवाघळं आता उडत रानात तापीपल्याड जाण्याच्या तयारीत असतांनाच तापीपल्याडहून बगळे येत वडा- पिंपळावर स्थिरावत होते. 
   सजन पाटलाची सून गौरी आली. देवदर्शन घेत परततांना पांगुळगाड्यासोबत तोल सांभाळत चालणाऱ्या मुलाकडं  भरल्या काळजानं पाहिलं. मुलाचं लक्ष आईकडं जाताच तो गाडा तिकडं वळवत धाव घेऊ लागला.

  " गौरी! अंधार पडलाय. आता त्याला घरी ने. मला मोठ्या गावात बंका बापूस भेटायला जायचं असल्यानं घरी यायला उशीर होईल" सजन पाटील सुनेस म्हणाले.

गौरीनं बाळास उचललं. 

" पांगुळगाडा राहू दे. मी कुणाकडं तरी पाठवतो!"

 गौरी बाळास घेत बाहेर आली पण गाडा घेतला नाही म्हणून मुलगा भोकांड पसरू लागला व परत पटांगणाकडं जाण्यासाठी धडपडू लागला. गौरीला घरी स्वयंपाकही करायचा असल्यानं पुढच्या फाटकातून‌ तिनं मुलास सोडलं. 

" तात्या! हा ऐकत नाही .याला इथंच खेळू द्या तुमच्यासोबत! म्हणत ती निघाली. पण त्याच वेळी बंका बापू येतांना दिसल्यानं व मंदीरातली मोठी घंटा कुणीतरी जोरानं बडवल्यानं पितळी घंटेच्या नादात गौरी काय म्हणाली हे तात्यांना समजलंच नाही. त्यांना वाटलं गाडा घेण्यासाठी नातू आला असावा. तात्या बापूंशी बोलण्यात गुंतले.
   मुलानं गाडा घेतला व  फाटकाकडं निघाला. पण......
 तात्या आपल्या पुतण्याच्या सोयरिकीबाबत बंका बापूशी बोलत बसले व नंतर बोलता बोलता त्यांच्यासोबतच मोठ्या मोरबीत निघाले. तात्या नऊ - साडे नऊ वाजेपर्यंत बंका बापूच्या घरीच थांबत घराकडे परतले. तात्यासोबत मुलगा न दिसताच गौरीनं धास्तीनं
 "तात्या!  बाळा?" चौकशी केली. 

" बाळाला तर तू आणलं होतं ना?"

" नाही हो! तो रडत असल्यानं मी परत पाठवलं तुमच्याकडं नी तुम्हास तसं सांगितलं ही! मग?"

बस्स! साऱ्या घरात कावकाव व धावपळ उडाली. तात्या, रखमा, इसन, गौरी सारे बाळास शोधायला धावले. आधी सरळ मंदीर गाठलं. आता मंदीरातली गर्दी केव्हाच पांगली होती. पटांगणातील खांब्यावरील लाईट दुधी  प्रकाश लिंबाच्या, वडाच्या झाडावर फेकत होते. वडा पिंपळावर बगळ्यांनी आपापली जागा पकडत समाधी घेतली होती. एक दोन चुकार बगळे उडत होते. पण वडाच्या ढोलीतलं दिवसांध भोऱ्यागत कोकलत होतं . तापीकाठावर टिटव्या आकांत मांडत होत्या. तात्या, इसन यांनी सारा मंदिराचा परिसर धुंडाळला.  परत ते  दोन्ही मोरबीत भेटेल त्याला विचारू लागले. पण 'बाळाला पांगुळगाड्यासोबत खेळतांना पाहिलं' एवढं एकच उत्तर. तात्या व इसन गारठले. भितीनं ते गाव, गल्ली, घर धुंडू लागले. गौरी तर छातीच पिटू लागली. तात्या इसन मागं गर्दी जमली. खेळतं पोरगं अचानक गायब कसं होऊ शकतं हाच ज्याच्या त्याच्या तोंडी सवाल. सारी गर्दी विजेऱ्या घेत पुन्हा मंदीरात आली. विठ्ठल मंदीर, महादेवाचं देऊळ झाडं फुलझाडं एकेक कोपरा तपासला जाऊ लागला. वाल कंपाऊंडमधला सारा परीसर पिंजून झाला. वडावर घुबड घुत्कारच होतं. टिटव्या नदीपात्राकडून टिटिव टिव..! टिटिव टिव..! टिव टिव टिटिव... गिल्ला करत गावाकडं सरकत होत्या. काठाकडून कुत्री रडत होती. आता सारी गर्दी वालकंपाऊंडच्या नदीकडं जाणाऱ्या फाटकातून नदीकडं निघाली. नदीकाठावर सारीकडं झावर पांघरुण बसल्यागत सौंदळीची झाडं गुपीत दडवून बसल्यागत भासत होती. काठावरील नदीची खोरी धुंडाळली जाऊ लागली. काही खोऱ्यात पात्रातलं पाणी कचऱ्यासह तुठलेल्या चपल्यासह लाटाळत होतं. तोच गिरधन आबाच्या गयभूस सौदळीच्या झाडाखाली पांगुळगाडा दिसला. त्यानं गाडा उचलत साऱ्यांना दाखवला. पांगुळगाडा सापडताच तात्या नातवाच्या नावानं हंबरडाच फोडू लागले. 

" देवा! मी पापी! मीच माझ्या नातवास सांभाळू शकलो!"

तर घरी ही हे कळताच गौरी झिंज्या तोडत छाती बडवत आकांतू लागली.

साऱ्या गावानं अंदाज बांधला की तात्याचा नातू नदीपात्रातच पडला असावा. शहाणी डोकी तात्यास उठवत घरी नेत समजावू लागली.

" तात्या! धीर धरा. बाळाचा पांगुळगाडा पाण्यापासून एवढ्या अंतरावर सापडलाय तर तो पात्रापर्यंत जाऊच शकत नाही. पांगुळगाडा तिथं टाकून कुणीतरी बाळास नेलंय! सकाळी बाळास आणतीलच!"

पण इसन, तात्या, गौरीची समजूत पटेना.

 पुन्हा गावातील ठोले तरणे गोळा झाले. इसनला घेत भोई लोकांना घेत काठावर आली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात धडाधड उड्या टाकल्या. पण अंधारात हाती काहीच गवसणार नाही हे त्यांनाही कळत होतं. पंधरा वीस फूट तळ. त्यात जागा नक्की नाही. तरी मंदीराजवळच्या पात्रात शोध घेतला जाऊ लागला. पात्रावरील आकाशात टिटव्या रान माजवत होत्या. कुत्री रिसडतच होती, रडतच होती. खोल पाण्यात दम कोंडत असतांनाही उड्यावर उड्या घेतल्या जात होत्या. पण हाती काहीच लागत नव्हतं. सारे नाउमेद‌ होत सकाळी उजेडात पुन्हा पाहण्याचं ठरवत परतली. किसन पाटलाचं घर रात्रभर झोपलंच नाही. हातातल्या हातात मूल नाहीसं झालंच कसं? नजर एकदम बांधली गेलीच कशी यानं ते ऊर तोडत होते.

 सकाळी पूर्ण पात्र शोधून झालं. हातास काहीच लागेना. गावातल्या ठाण्यात मिसींग केस नोंदवली. इन्स्पेक्टर वायकर अतीशय कर्तव्यदक्ष व हुशार माणूस.
  भोई लोकांनी अंदाज बांधला की पोरगं पाण्यात पडलं असेल तर गाळात रुतलं असेल वा वाहत पुढे सरकलं असलं तरी फुगून वर येईलच. म्हणून प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. ते काठा काठानं तुंबलेल्या खोऱ्यात फिरू लागले.

   इन्स्पेक्टर वायकरांनी किसन पाटील व सुन गौरीचे जुजबी जबाब घेतले. इन्स्पेक्टर वायकरांनी मंदीराचा सारा परीसर आपल्या नजरेनं धुंडाळला. मंदीराच्या आवारातून पांगुळगाडा ढकलत वालकंपाऊडच्या बाहेर जाण सव्वा वर्षाच्या मुलास शक्य नाही. नी मग तेथून सौंदळच्या झाडाजवळ? शक्य नाही. कुणी तरी नक्कीच घेऊन गेलं असेल!
 
" तात्या, तसं तर शक्यता नाहीच पण तुम्हास कुणावर शंका?"

" साहेब आमचं पुरं खानदान पापभिरू! मी कुणाचं वाईट केलंय की त्यांनी माझ्या नातवास  न्यावं...?"

इन्स्पेक्टर नं पांगुळगाडा जमा केला व ते ठाण्यात परतले...


क्रमश:.......


✒️ वा.........पा..........

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

स्वामी रामानंद तीर्थ : स्त्रोत विकिपीडिया

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील       
धुळे  9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️💥⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️✍️⚜️

           स्वामी रामानंद तीर्थ
                      ऊर्फ
      व्यंकटेश भगवानराव खेडगीकर

           जन्म : ३ ऑक्टोबर १९०३
                (सिंदगी, विजापूर)
           मृत्यू : २२ जानेवारी १९७२
                       (हैद्राबाद)

चळवळ : हैदराबाद मुक्तिसंग्राम
पत्रकारिता/ लेखन: व्हिजन 
                              साप्ताहिक
धर्म : हिंदू
वडील : भगवानराव खेडगीकर
            स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. 

🔮 हैदराबाद मुक्तिसंग्राम
          हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.
           ‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.
            तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
           लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

🗽 स्मृती
                       एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
स्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथील विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले आहे.
व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे अंबाजोगाई येथे चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असे नाव दिले आहे.
उस्मानाबाद येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.
        
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

           ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~  WikipediA          ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

लाल बहादूर शास्त्री

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील          
            धुळे : 8796759702                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🙋🏻‍♂️📝🇮🇳👨‍🦰🇮🇳📚🙋🏻‍♂️⚜️
          
           लालबहादूर शास्त्री
        (भारताचे दुसरे पंतप्रधान)

जन्म : २ ऑक्टोबर १९०४
(मुगलसराई, भारत)
मृत्यू : ११ जानेवारी १९६६
(ताश्कंद)
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी : ललिता देवी
धर्म : हिंदू                                                           लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.
दुसरे भारतीय पंतप्रधान कार्यकाळ
जून ९, इ.स. १९६४ – जानेवारी १२ इ.स. १९६६
मागील : गुलजारी लाल नंदा
पुढील : गुलजारी लाल नंदा
तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ
जून ९, इ.स. १९६४ – जुलै १७, इ.स. १९६४
मागील : गुलजारी लाल नंदा
पुढील : सरदार स्वर्णसिंग
💁‍♂️ जीवन
       २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.
               वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
           नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
🪔 मृत्यूविषयी संशय
      शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणती दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.
📚 लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके
                गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
🏬 लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था
                      लालबहादुर शास्त्री झोपडपट्टी नं १, २, ३ : मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी
लालबहादुर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड -मुंबई) : जुने नाव - (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड
लालबहादुर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टाॅकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.
लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
         🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र आभिवादन 🌹🙏

        ♾♾♾  ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...