सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील    📲 8796759702  
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                                
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🗣️📔🇮🇳👴🏼🇮🇳📔🗣️💥


        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   जन्म : ३० एप्रिल, १९०९
      (यावली, जि. अमरावती)
   निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने :-
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके :-
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 ग्रामगीता :- 
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-

         हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~  WikipediA                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
महाराष्ट्र करू स्मार्ट📡📲

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा - लेखक श्री वासुदेव पाटील (संग्राहक : श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा

          🔖 भाग::-- तिसरा

     ✒️  वा......पा.............
   गिरधन आबाची नात गेल्यानं श्रीराम पेंटरनं मंदीर रंगवण्याचं काम पाच दिवस बंद ठेवत दुसऱ्या गावाची कामं उरकली‌. गयभू, लिला, आबा  तर सुन्न होतेच पण सोबत दोन्ही मोरबीतलं वातावरणही सुन्न. जो तो आपापल्या लहान मुलांना जपू लागला. डोळ्यात तेल घालत मुलांच्या पाळतीवर राहू लागला. रात्री केव्हाही उठत मुलं जागेवर आहेत याची खात्री करु लागला. जरा कुठं  खुट्ट झालं की काळजात धस्स होऊ लागलं. आता पर्यंत जी तापी माय मायेच्या मायेनं पालनपोषण करत आली त्याच तापी मायकडं जो तो साशंकतेनं पाहू लागला. काठाकडं जायला घाबरू लागला. गावातली तरणीबांड पोरं रात्रीची गस्त सुरू करण्याची प्लॅनिंग करु लागले.

    पाचव्या दिवशी वायकरांनी श्रीराम पेंटरला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांना माहीत होतं की आपण जे करतोय त्याला कायद्याचा आधार नाही. तरी तूर्तास दुसरा मार्गच सापडत नव्हता.

" श्रीराम! आज रात्री पासून मंदीर रंगवायचं काम सुरू कर!"

" साहेब मंदीराचे अध्यक्ष - गिरधर आबाकडं दु:खाचा प्रसंग गुदरला म्हणून ते काम बंद ठेवलय!"

" आबांनी स्वत: काम बंद करायला सांगितलं का?"

" आबा तसं बोलले नाही पण ..."

" मग उद्याच कामाला सुरूवात कर! पण त्या आधी दिवसा आमच्या पोलीस स्टेशनची रंगरंगोटी कर नी रात्री मंदीराचं काम कर"

ततफफ करत श्रीरामनं होकार दिला व परतत कामास सुरुवात केली. त्यानं दिवसभर पोलीस स्टेशनात पेंटीग केली. कदमनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणं लक्ष घालत दिवसभर त्याला अजिबात विश्रांती घेऊ दिली नाही. रात्री जेवणानंतर लगेच कदमांनी त्याला मंदीराच्या कामावर पाठवलं. श्रीराम पेंटर वाल कंपाऊड ची मधली बाजू चितारू लागला. कुठं विठ्ठलाची, शंकराची आरती लिही, कुठं शिवमहिमा चितार,  कुठं  संताची चित्रे काढ, नामा, तुकोबाराय, माऊली चितार, असं करत करत रात्रीच्या दोन पावेतो तो मोरबीकडच्या गेटपर्यंत आला. वायकरांनी कदमांना मंदीरातच आजूबाजूला दूर थांबायला लावत  त्याला झोपू न द्यायला लावलं होतं. दोनच्या सुमारास पेट्रोलींग करत वायकर ही मंदीरात आले. श्रीराम पेंटरच्या डोळ्यात आता गुंगी येऊ लागली. त्यानं गेटजवळची मधली बाजूच चितारायला घेतली. बिलकुल विरुद्ध बाजूस बाहेर मधलं दृश्य चितारलं होतं. आता मधल्या बाजूस बाहेरचं दिसणारं दृश्य चितारण्याचं त्यानं ठरवलं. समोर लहान मोरबीकडून उतरणारी उतरण तो उतारू ( चितारू)  लागला. वायकर व कदम विठ्ठल मंदीराच्या सभामंडपातल्या खिडकीतून त्याकडं पाहत होते. चितारता चितारता पेंटर नं जांभई देत ब्रश खाली ठेवला. थोडं मागे सरकत ताणलेल्या व शिणलेल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. तरी डोळ्यात आता झोप उतरत झापडं जडावली. तो ब्रश घेत वरची दिसणारी घरं, दबलेली व मागंपुढं सरकलेली धाबी, मावठी, पक्क्या हवेलीच्या तिरकस भिंती, मनोरे चितारु लागला. आता झोप पूर्ण घेरू लागली. एक झपकी घ्यावी म्हणून तो ब्रश ठेवणार तोच खाडकन पुन्हा डोळे उघडत त्याचे हात आपोआप सरावानं सपासप चालू लागले. झोप, जाग, संवेदन, जाणिव की नेणीव... आपण झोपतोय.... आपण चितारतोय ! काय नेमकं काय? रंगात ब्रश की  मनाच्या नेणीवेत जाग? की जाणिवेत झोप? ब्रशचे फर्ऱ्हाटे सुरुच, डुलकी सुरुच. तो तसाच जागेवर कलला.

    वायकर मंदीरातून हळूच पुढे आले. त्यांनी लहान मोरबीच्या उताराच्या वाटेवर केव्हाची रोखून धरलेली नजर चित्रावर रोखली! त्यांचा अंदाज खरा ठरला होता. तरी ते अचंबीत झाले. चित्रात गेटमधून दिसणारं मोरबीचं दृश्य चपखल चितारलं असलं तरी उतारावरुन  पांगुळगाडा ढकलत उतरणारी गिरधर आबाची नात बाली  कशी? बालीला जाऊन सहा दिवस झालेले. श्रीराम चित्र काढत होता तेव्हा वायकरची नजर उतारावरच होती. तेव्हा त्यांना उतारावर ना पांगुळगाडा दिसला ना बाली! मग श्रीरामनं त्या दिवसा सारखाच आजही पांगुळगाडा का चितारला!वायकरनं कदमकडं पाहिलं. कदम तर विस्फारल्या डोळ्यांनी  पाहतच होता.
       वायकरनं श्रीरामला हलवत उठवलं.

" श्रीराम! सुंदर चित्र रेखाटलं तू! "

श्रीरामची नजर चित्रावर स्थिरावली. तो चमकला.

" साहेब! आजही तशीच चूक झाली झोपेत."

तो ब्रश रंगात बुडवत बाली व पांगुळगाड्यावर मारू लागला.

" थांब श्रीराम! आधी हा झोल नेमका काय? त्या दिवशी ही झोपेत तू पांगुळगाडाच चितारला अन आजही पांगुळगाडाच! सोबत आबांची पाच - सहा दिवसांपूर्वी मेलेली नात? जागतेपणी चितारता येणार नाही ते तू झोपेत कसं चितारु शकतो! श्रीराम सत्य काय ते सांग नाही तर पट्ट्या- लाथेनं बुकलत अंदर टाकतो! दोन निष्पाप मुलांचा जीव गेलाय!"

" साहेब! झोपेत चित्रे चितारले गेलेत हे आपणास खोटं वाटत असलं तरी ते‌च सत्य आहे! भले आपण मला तुडवलं, फासावर लटकवलं तरी तेच सत्य आहे!"

 " श्रीराम! यात काही तरी पाणी मुरतंय ! पटकन सांगून मोकळा हो!"

श्रीरामनं तोच नन्नाचा  पाढा लावला.

" कदम याला झोपूच नको देऊ! झोपला तरी चित्र काढणं सुरुच ठेवा!"

   सकाळी वायकर एकदम संभ्रमात पडले. पेंटर झोपल्यावर चित्र काढूच कसा शकतो? तेही तोच पांगुळगाडा, तीच मुलगी? पांगुळगाड्याचा काय संबंध!"

  श्रीराम पेंटर दिवसा पोलीस स्टेशन रंगवू लागला. दुपारी जेमतेम एक दोन तास त्याला झोपू दिलं.
    
    वायकरांना पांगुळगाडा डोळ्याभोवती गरगर फिरु लागला. त्यांनी शेवटी बारकू बोरसास स्टेशनात आणलंच. संशयीत म्हणून एकदा तपासायला काय हरकत आहे ? असा विचार करत त्यांनी बारकूस घेतलं. श्रीराम पेंटरनं पेंटींग करतांना  बारकू बोरसास आत येतांना पाहिलं. त्यांच्या अर्धवट झोपेनं बहिरट झालेल्या मेंदूत हे कुठं तरी कोरलं गेलं.

तिशी पस्तीशीतला बारकू बोरसे अंगानं भरलेला गोरापान व कामानं शरीर पिळदार बनवलेला गडी! तरी ठाण्यावर येताच आतून पुरता घाबरलेला.

   " बोरसे! गाव कोणतं तुझं?"

" पांघण! देवाचं पांघण साहेब! इथून चाळीस किमी अंतरावर तापीकाठावरच वसलंय!"

" गाव सोडून मोरबीत कसा आलास?"

" गावात धंदा म्हणावा तसा चालत नव्हता साहेब! मग नवीन गाव शोधता शोधता याच गावात आलो!"

"  धंदाच करतो की इतर धंदे ही करतो?"

" साहेब!.... म्हणजे...?"

" उलट सवाल नको! जे विचारलं ते सांग मुकाट्यानं!"

" नाही साहेब. फक्त लाकुडकाम!" बारकू खाली मान घालत बोलला.

" गावात काय घडतंय माहीत आहे का तुला!"

"........"

" बोरसे, मी काय विचारतोय?"

" हो साहेब! तात्यांचा नातू गायब झालाय तर आबांची नात....."

" दोघा मुलांच्या घटनेस्थळी पांगुळगाडा सापडलाय!  कदम! आणा ते दोन्ही पांगुळगाडे!"  वायकरनं जोरात कदमला आरोळी ठोकली.

 कदमनं दोन्ही पांगुळगाडे आणले. श्रीराम पेंटर ब्रश चालवत तिरकी नजर मध्ये टाकत होता. बोरसा समोर पांगुळगाडे पडलेत. ही जाणीव ही त्याच्या मेदूत कोरली.

" बोरसे! तूच बनवलेत ना हे?”

" हो साहेब!"

" किती पांगुळगाडे बनवलेत तू? कुणाकुणाकडे दिलेत तू?"

" साहेब! या गावात एवढे नाही. तीन बनवलेत!"

" तुझ्या गावाला ही बनवत आला असशील तू? तिथं ही काही घटना?"

" बनवलेत साहेब!"

" काही विचीत्र अनुभव, घटना?"

" नाही साहेब"

" इथं तिसरा पांगुळगाडा कुणाकडं दिलाय? केव्हा?"

" गयभू घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच नानजी पाटलाकडं"

वायकर चपापले.

" नानजी पाटील मोठ्या मोरबीतले का?”

" होय साहेब!"

नंतर वायकरने त्यास 'बोलवलं की सरळ ठाण्यात यायचं' सांगत  जाऊ दिलं.

" कदम ! आपला तपास हा वाऱ्यावरच्या लाथा तर नाहीत ना?
वायकरनं कदमालाच विचारलं. पण कदमच्या मनातही तेच विचार घोळत होते. हा  पेंटर भंगोड्या असावा. याच्या नादी लागून साहेब तपासाची दिशा भरकटत नेत आहेत व वेळ ही वाया घालवत आहेत.

     वायकरनं नानजी पाटलाकडं जात घरात लहान मूलं किती याबाबत‌ चौकशी करत मुलांच्या काळजी घेण्यांचा सुचक सल्लाही दिला.

 रात्री श्रीराम पेंटर ला पुन्हा मंदीराचं राहिलेलं काम करण्यासाठी पाठवलं. आता रात्री तो मंदीराची पुर्वेकडील भिंत आतून  चितारणार होता. मंदीराच्या समोरील या भागात पटांगण होतं. या भिंतीला तापीकाठाकडं जाण्यासाठी  महादेव मंदीराच्या समोर तिरकस गेट होतं. त्याच गेटमधून तात्यांचा नातू बाहेर पडला असावा. 
  पेंटरनं त्या भिंतीवर मधल्या बाजूस संत व त्यांचा जिवनपट चितारावयास सुरुवात केली. संतसेना, माती तुडवणारे गोरोबा, मळ्यात राबणारे सावता माळी ,संत नरहरी सोनार असे एक एक संत चितारता चितारत पहाटे तीन वाजायला तो काठाकडं जाणाऱ्या गेटजवळ आला. तेथे तो समोर दिसणारा तापीकाठ , संथ तापीमाय काढणार होता. पण विविध समाजाचे संत चितारता चितारता झोपेच्या गुंगीत समाज, समाजातील विविध व्यवसाय ही कल्पना त्याच्या सुप्त मनात साकारली जाऊ लागली. गोरोबा साकारतांना त्याला आपल्या मोरबीतला कुंभार आठवला, सावता माळी काढतांना गावातले भाजीपाला पिकवणारे माळी आठवू लागले. मग तंद्रीत गावातले सर्व व्यावसायिक आठवत राहिले. झोप दाटू लागली. गुंगी चढू लागली. गेटजवळ तापीकाठ, सौंदळची झाडं ...समोर दिसणारं  जे तो कायम पाहत आलेला होता ते चित्रात उतरु लागलं. पुन्हा झोप, जाग, जाणिवा- नेणिवा, मनाचे खेळ, मनातल्या प्रांतात चालणारे व्यवहार ....सारं सारं खुलं होऊ लागलं. तो चित्र चितारता चितारताच कलला. 

मंदिराच्या संभामंडपात बसून बसून डुलकी देणारे वायकर खडबडून उठले. ते चित्राजवळ आले. आता तर ते जागेवर हबकून अक्षरश: उडालेच.
गेटजवळचं मधल्या भागातून समोर दिसणारं दृश्य श्रीरामनं चितारलं होतं.
 मंदीरापासून पसरलेला तापीकाठ....खोरं...सौंदळची झाडं...एका सौंदळच्या झाडाजवळ पांगुळगाडा ठेवत काठाकडं हात वर करत- जणू कुणाचा तरी हात धरत दुडूदुडू चालत असल्यासारखा मुलगा! पण सोबत दोन्ही बाजूला कोण  चालतंय हे दिसत नव्हतं. मोरबीच्या गेटकडच्या दिशेनं असाच एक पांगुळगाडा मुलगी तापीपात्राकडं ढकलत नेत होती. तसाच तिसरा पांगुळगाडा मोठ्या मोरबीकडून येतांना दिसत होता पण त्याच्याजवळ मूल दिसत नव्हतं. आणि.....आणि....तापी पात्राजवळ बोरसाचं वासलं, किकरं, कुऱ्हाड, रंधा, करवत, लाकडं पडलेली. बोरसा खाली मान घालत किंचीत वर डोळे करत  मुलांकडं पाहत पांगुळगाडा बनवत होता. अप्रतिम, जिवंत चित्र साकारलेलं. वायकर पाहून थक्क झाले.

 " साहेब हा पेंटर भांग खाऊन काम करतो वाटतं. दिवसा जे पाहतो तेच नशेत चितारतो! याच्या नादी आपला तपास भरकटतोय! " कदम वायकर साहेबास सुचवत होता

 तोवर मोरबीतून पहाटे लोक यायला लागले. चार दोन लोकांनी चित्र पाहिलं.  वायकरनं श्रीरामला उठवलं.श्रीरामला खूण करताच श्रीरामनं ब्रश रंगात बुडवत सपासप चित्रावर फिरवत मिटवलं व तो पुन्हा तापीकाठ रंगवू लागला. पण आता समोर जे दिसायचं तेच साकारू लागलं.

   वायकरनं सकाळी नऊ वाजताच बारकू बोरसाच्या पेकाटात बुटासहीत लाथ घालत गाडीत बसवत ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच पुन्हा दोन तीन लाथा घातल्या. बोरकू बोरसाच्या ओठात दात घुसत रक्त वाहत होतं. ते पुसत तो गयावया करत होता.

"बारकू शेठ! जरा ही रंधा इकडं तिकडं न चालवता गुण्यात लाकुड तासत धारकोर तासतो तसंचं सरळ सरळ सारं खरं खरं ओक!" वायकर लालेलाल होत फुत्कारत होते.

" साहेब! सारं सारं सांगतो! पण विश्वास ठेवा मी मुलांना काहीही केलं नाही! "

.
.
.
 क्रमश:......

१] बरषहिं जलद (कक्षा दसवी)

✍️✍️🏆✍️✍️

E-Learning आयोजीत.... 
       
विषय : - हिंदी (कक्षा दसवी)
 
  १] बरषहिं जलद - गोस्वामी तुलसीदास 👇


या कवितेवर प्रश्नावली पाठवीत आहे. ती तुम्ही सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना शुभेच्छा !!!
Best wishes👍

E-mail काळजीपूर्वक टाका टेस्ट सोडवल्यावर लगेच सर्टीफिकेट मिळेल.


कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करा.
श्री अविनाश पाटील
📲8️⃣7️⃣9️⃣6️⃣7️⃣5️⃣9️⃣7️⃣0️⃣2️⃣
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

भारतरत्न जयप्रकाश नारायण

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                 
  संकलन : श्री अविनाश पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे
                                                                  
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥     ​       
     भारतरत्न जयप्रकाश नारायण

          जन्म : 11 ऑक्टोबर 1902
            (सीताबडिअरा , बंगाल   
          प्रेसीडेंसी , ब्रिटीश इंडिया)
         मृत्यू : 8 ऑक्टोबर 1979
                 (वय 76)
        (पटना , बिहार , भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय
इतर नावे : जेपी, लोक नायक
व्यवसाय : कार्यकर्ता, सिद्धांतवादी,  
                राजकारणी
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय    
                      कॉंग्रेस
                      जनता पार्टी
हालचाल : भारत छोडो , सर्वोदय , 
                 जेपी आंदोलन
जोडीदार : प्रभावती देवी
पुरस्कार : रॅमन मॅग्सेसे पुरस्कार  
                     (1965 )
               भारतरत्न (1999) 
                     (मरणोत्तर)
                  जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते. बिहारच्या सारन जिल्ह्यातील सिताबदियार येथे जन्म. तेथेच प्राथमिक व पुढे पाटणा येथे माध्यमिक शालेय शिक्षण. वयाच्या अठराव्या वर्षी प्रभावतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपासून त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले.विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.
           अमेरिकेतच जयप्रकाशांचा मार्क्सवादी विचारांशी परिचय झाला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा ‘आफ्टरमाथ ऑफ द नॉन-को-ऑपरेशन’ हा निबंध व मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की यांचे साहित्य वाचून ते कट्टर मार्क्सवादी बनले. गांधींची विचारप्रणाली व कार्यपद्धती यासंबंधी काही काळ ते असमाधानी होते. तथापि काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीसंबंधीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेशीही ते सहमत नव्हते. मार्क्सवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावे, त्यांनी चालविलेल्या वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या लेनिनच्याच मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९३० मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जयप्रकाशांना काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख नेमले. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसऱ्या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाशांनी चळचळीची सूत्रे सांभाळली. १९३३ मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
                   जयप्रकाश या पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमले गेले. आपल्या भूमिकेची सांगोपांग चर्चा त्यांनी व्हाय सोशॅलिझम (१९३६) या पुस्तकात केली आहे. भारतीय कम्युनिस्टांनी काँग्रेसला राष्ट्रीय आघाडी म्हणून मान्य केल्यामुळे जयप्रकाशांना समाजवादी कम्युनिस्ट संयुक्त दलाची शक्यता वाटू लागली; म्हणून प्रमुख सहकाऱ्यांचा विरोध असतानाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर त्यांनी समझोता केला. परंतु ही एकता फार काळ टिकली नाही. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा जयप्रकाशांनी युद्धविरोधाचे व स्वातंत्र्यलढा उग्र करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे १९३९ मध्ये त्यांना अटक होऊन नऊ महिन्यांची शिक्षा झाली. १९४१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करून राजस्थानमधील देवळी तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे राजबंद्यांवरील अन्यायाविरुद्ध ३१ दिवसांचे उपोषण करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास त्यांनी भाग पाडले.
        १९४२ च्या सुरुवातीस त्यांना बिहारमधील हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. यावेळी बाहेर ‘छोडो भारत’ आंदोलन सुरु झाले होते. त्यात भाग घेण्यासाठी ८ नोव्हेंबरला अत्यंत साहसपूर्ण रीतीने तुरुंगाच्या भिंतींवरून उडी मारून ते फरारी झाले व भूमिगत संघटनेचे नेतृत्व करू लागले. त्यांनी गनिमी तंत्राने लढणारे ‘आझाद दस्ते’ संघटित केले. त्यांच्या नेपाळमधील हालचालींचा सुगावा लागल्याने त्यांना नेपाळी पोलीस ब्रिटिश हद्दीत नेत असताना आझाद दस्त्याच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून नेपाळी पोलीसांच्या हातून त्यांची सुटका केली. यानंतर जयप्रकाश भारतात परत येऊन भूमिगत राहून कार्य करू लागले. त्यावेळी सरकारने त्यांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. १७ सप्टेंबर १९४३ रोजी अमृतसर रेल्वे स्थानकावर त्यांना पकडण्यात आले व तेथून १९४६ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी टूर्वड‌्‌झ स्ट्रगल (१९४६) हे पुस्तक प्रसिद्ध करून राष्ट्रीय चळवळीची कारणमीमांसा केली.
      ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटींना, ब्रिटिश सरकारने नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाशांचा विरोध होता. अखेर म. गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही; म्हणून त्यांनी १९४८ मध्ये अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. पक्षाने नैतिक मूल्यांना सर्वोच्च स्थान द्यावे, साधन शुचितेचे महत्त्व मानावे, सत्ता धारण करणाऱ्या पेक्षा सेवा करणाऱ्यांची प्रतिष्ठाअधिक मानावी, असे आपल्या कार्यकर्त्यांना जयप्रकाशांनी आवाहन केले. त्यांची भूमिका लोकशाही समाजवाद्यांची झाली होती. हिंसेपेक्षा गांधीप्रणीत सत्याग्रह तंत्राचा समाजवाद्यांनी अवलंब करावा, ही त्यांची विचारसरणी पक्षाने स्वीकारली. पक्षाचे पहिले सरचिटणीस म्हणून त्यांचीच निवड झाली.
            जयप्रकाश नारायण त्यांनी कामगार व किसान संघटनेकडे १९४८ ते १९५० च्या दरम्यान विशेष लक्ष दिले. हिंद मजदूर सभा, हिंद किसान पंचायत यासंघटना त्यांच्याच प्रयत्नाने स्थापन झाल्या. अखिल भारतीय रेल्वे कामगार संघ, अखिल भारतीय टपाल व तार खाते संघ, अखिल भारतीय संरक्षण कामगार संघ यांचेही ते अध्यक्ष होते. १९५२ मध्ये त्यांनी आचार्य कृपलानी यांचा कृषक मजदूर प्रजा पक्ष व समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण घडवून आणण्यात पुढाकार घेतला. या विलीनीकरणातून अस्तित्वात आलेल्या प्रजासमाजवादी पक्षाचे तेच पहिलेसरचिटणीस झाले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचा पराभव झाला. त्याच सुमारास टपाल व तार खात्यातील कामगार संपाच्या बाबतीत संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांवर भिस्त ठेवून त्यांनी संप मागे घेतला.आश्वासन मात्र पुरे करण्यात न आल्यामुळे अस्वस्थ होऊन जयप्रकाशांनी पुण्यात आत्मशुद्धीसाठी तीन आठवड्यांचे उपोषण केले. या वेळी केलेल्या विचारमंथनातून त्यांची नवी वैचारिक भूमिका तयार झाली. तत्त्वप्रणाली म्हणून त्यांनी आता जाहीर रीत्या मार्क्सवादाचा त्यागकेला.
                 मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादात माणसाने सदाचारी का असावे, याला उत्तर मिळत नाही, असे मत झाले. भौतिक गरजांची परिसीमा आणि समाजवाद, पक्षीय राजनीती, सत्तेचे विकेंद्रीकरण, मानव समाजामध्ये राज्यसत्तेचे स्थान, जनतेचा समाजवाद विरुद्ध शासकीय समाजवाद, भावी समाजवादाचे रूप इ. प्रश्नांबाबत त्यांनी बराच ऊहापोह केला. १९५३ मध्ये नेहरूंनी जयप्रकाशांना वाटाघाटीस बोलाविले; जयप्रकाशांनी आपला पक्ष बरखास्त न करता मंत्रिमंडळात येऊन सहकार्य करावे, अशी नेहरूंची सूचना होती;परंतु किमान कार्यक्रमावर एकमत झाल्याशिवाय अशा प्रकारचे सहकार्य अशक्य आहे, अशी जयप्रकाश यांनी भूमिका घेतली. ती नेहरूंनामान्य न झाल्यामुळे वाटाघाटी अयशस्वी झाल्या. त्या वर्षी रंगून येथे झालेल्या आशियाई समाजवादी परिषदेत भारतीय प्रतिनिधिमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले. आशियाई क्रांती ही किसान क्रांती असली पाहिजे; व ही लोकक्रांती अहिंसक मार्गाने करणे इष्ट आहे, असे विचारत्यांनी परिषदेपुढे मांडले.
                      त्यांनी १९५३ नंतर विनोबाजींच्या भूदान आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९ एप्रिल १९५४ मध्ये बोधगया येथील सर्वोदय संमेलनात भूदान कार्यासाठी पक्षीय राजकारणातून त्यांनी संपूर्णतया अंग काढून घेतले. त्यांनी ए प्ली फॉर द रिकंस्ट्रक्शन ऑफ इंडियन पॉलिटी व फ्रॉम सोशॅलिझम टू सर्वोदय (१९५९) ही पुस्तके लिहिली.१९६१ च्या सर्वोदय संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना आपल्या राजकारण-संन्यासाच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या होत्या; पक्षीय राजकारणाचा त्याग म्हणजे देशातील घडामोडींसंबंधी उदासीन राहणे नव्हे; उलट राष्ट्रीय जीवनात अधिक परिणामकारक व अधिक रचनात्मक भाग घेण्यासाठी पक्षीय व सत्तात्मक राजकारणातूनआपण दूर झालो आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. १९५४ ते १९७२ पर्यंत जयप्रकाश भूदान आंदेलनातच मग्न होते. परंतु या काळातही त्यांनी काही महत्त्वाची राजकीय कामे केली. १९६० मध्ये नवी दिल्ली येथे त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली; १९६२ मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘पाकिस्तान रिकन्सिलिएशन ग्रुप’ स्थापन केला; नागालँडमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते.
              जयप्रकाशांच्या प्रयत्नाने १९६४ मध्ये भारत सरकार व नागा बंडखोर पुढारी यांत युद्धविराम तहावर सह्या झाल्या. १९६५ मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मागसाय हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. १९७१ मध्ये त्यांनी बांगलादेशामधील परिस्थिती जगापुढे मांडण्यासाठी जागतिक दौरा केला आणि त्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविली; मे १९७२ मध्ये मध्यप्रदेशातील २६७ अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार यांच्या पुढे शरणागती पत्करली.
         जयप्रकाशांनी संशोधन कार्य करणाऱ्या संस्थाही या काळात स्थापन केल्या. ‘असोशिएशन ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज फॉर रूरल डेव्हलपमेंट’, ‘गांधीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज’आणि‘अखिल भारतीय पंचायत परिषद’ या संस्थांचे ते अध्यक्ष किंवा मानसेवी संचालक होते. तसेच ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या वैचारिक व सांस्कृतिकस्वातंत्र्यास वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते एक संस्थापक व अनेक वर्षे मानसेवी अध्यक्ष होते.  ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे सुरुवातीपासून ते सदस्य आहेत.
               प्रभावतीदेवी १५ एप्रिल १९७३ मध्ये निधन पावल्यानंतर जयप्रकाश यांची प्रकृती अधिकच खालावत गेली; त्यांना मधुमेहाचा व रक्तदाबाचा विकार जडला.
                    १९७० पासून भूदान आंदोलनाबद्दल त्यांना असमाधान वाटू लागले. भूदान आंदोलनात केवळ अनुनयावर भर आहे, पण त्यांतून फलनिष्पत्ती होत नाही, असे अनुभवासआल्यामुळे अनुनय अयशस्वी ठरला, तर गांधीप्रणीत अहिंसात्मक असहकार अथवा प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी भूमिका ते घेऊ लागले. या प्रश्नावर आचार्यविनोबांशी त्यांचे मतभेद झाले. देशातील सर्वंकष भ्रष्टाचार, दुबळ्या घटकांच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष इ. प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्यांनी देशाला सर्वंकष क्रांतीची गरजआहे ही भूमिका घेतली व त्यानुरूप गुजरात राज्यातील राजकीय सत्तांतर व बिहारमधील आंदोलन यांचा पुरस्कार केला. २५ जून १९७५ पासून देशात आणीबाणी जाहीरझाली व त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. जयप्रकाश मार्क्सवाद, लोकशाही, समाजवाद या मार्गांनीसर्वोदयाकडे वळले होते. परंतु या सर्व विचारपरिवर्तनात त्यांचा क्रांतीवरील विश्वास ढळलेला नाही.
                          
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

         ♾♾♾  ♾♾♾
          स्त्रोत - Wikipedia                          ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

1.1 A Teenager's Prayer (10th English)

✍️✍️🏆✍️✍️

E-Learning आयोजीत....

📘📚 इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी📘📚   
     
 विषय : -इंग्रजी
 
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
 मी आज तुम्हाला 

1.1 A Teenager's Prayer


या घटकावर प्रश्नावली पाठवीत आहे. ती तुम्ही सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना शुभेच्छा !!!


कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करा.

🙏आपलाच🙏
श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

सुविचार- घटस्थापना विशेष

सुविचार 

दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात आपोआप पडतात.

सप्ताह में सात वार होते है, और आठवा वार है परिवार, जब तक आठवा वार ठीक नही होगा, तब तक ये सातो वार बेकार है ।

लोकांचे सल्ले जरूर घ्यावेत कारण ते फुकट असतात परंतु निर्णय मात्र स्वतःचेच घ्यावेत कारण ते अमूल्य असतात.

आप चाहकर भी अपने प्रति लोगोंकी धारणाको कभी नही बदल सकते, इसिलिये सुकुनसे अपनी जिंदगी जिये और खुश रहे ।

जन्म हा एका थेंबासारखा असतो तर आयुष्य हे एका ओळीसारखे असते, पण मैत्री मात्र वर्तुळासारखी असते, त्याला कधीच शेवट नसतो.

सबको इकठ्ठा रखनेकी ताकत प्रेम में है और सबको अलग करनेकी ताकत भ्रम में है, इसिलीये कभी भी मन में भ्रम मत पालिये ।

Every morning is beautiful celebration of new opportunities, that life has to offer and take the first step towards making all your dreams come true.

💐💐💐💐💐💐

आज घटस्थापना !! घटस्थापनेच्या तसेच आजपासून सुरू होत असलेल्या पवित्र शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! माता जगदंबा तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो, आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच जगदंबे चरणी प्रार्थना !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐

संग्राहक - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

1 जुलै ते 30 नोव्हेंबर कालावधीतील महागाई भत्ता रोखीने देनेबाबत..

राज्य कर्मचारी यांना १ जुलै  ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ५ % महागाई भत्ता वाढीची थकबाकी रोखीने देनेबाबत.....

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...