बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

दिवाळी सुट्टी जाहीर

     🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

💥 राज्यातील शाळांना दिवाळी सुट्टी जाहीर

दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी..........



मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

दीपोत्सव तेजोमय करण्यासाठी दिवे बनविण्याची कार्यशाळा

दिवाळी तेजोमय करण्यासाठी विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून स्वतः तयार केलेले दिवे वापरण्याचा केला संकल्प...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी व तेजोमय करण्यासाठी 'टाकाऊ पासून टिकाऊ' या उपक्रमांतर्गत दिवे बनविण्याची कार्यशाळेत उत्साहात सहभाग घेतला. दिवाळीत दिवे व  पणत्या यांना खुप महत्व असते. आपल्या संस्कृतीनुसार दिवाळी या सणाच्यावेळी दिवे हे प्रकाशमय वातावरण तयार करीत असतात. ज्याप्रमाणे दिव्यांच्या सहाय्याने दिवाळी तेजोमय होते. तसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण प्रकाश यावा जणू हाच संदेश दिवे देतात. म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः दिवे बनवले. विद्यार्थ्यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी तयार करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत स्वतः दिवे करतांना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता. 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून, संस्थेच्या सचिव सौ. स्मिताजी विसपूते यांच्या संकल्पनेतून व श्री पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, तुषार कुलकर्णी, श्री विलास भामरे व महेश पवार यांचे सहकार्य लाभले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार साधला ऑनलाईन संवाद

डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार जाऊन साधला मुक्तसंवाद....
रोमानियाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया यांनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद...

धुळे, येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज ऑनलाईन विदेशवारी केली. जगामध्ये अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, शिक्षण पद्धती वेगवेगळी आहे. या कुतूहलातून श्री अविनाश पाटील यांनी व्हर्चुअल ट्रीप च्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नुकतीच रोमानिया या देशाची व्हर्चुअली विदेशवारी केली. यासाठी रोमानिया देशाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या देशाची माहिती दिली. तेथील संस्कृती व शिक्षण पद्धती याबद्दल सविस्तर सांगीतले. चित्रफीतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रोमानियाची सफर केली. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न विचारले. कोरीना सुजेदिया यांनी अतीशय मुक्तसंवाद साधत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा केल्या. त्यांनी देखील भारताबद्दल जाणून घेतले व अशा ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाची सीमारेषा ओलांडून दोन देशांचे संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र विसपूते यांनी सांगीतले.
ऑनलाईन ग्रेट भेट या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्र विसपुते, सचिव स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, पालक व सर्व स्टाप चे सहकार्य लाभले.

✍सुविचार🙏

✍ आजचे सुविचार 👍


1️⃣ "पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते."

2️⃣ तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.

3️⃣ लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.

4️⃣ कोणतेही काम मन लावून करावे.

5️⃣ जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.

6️⃣ इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.

7️⃣ शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.

8️⃣ शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते. म्हणून पद कोणतही असो. त्याचा मनापासून स्विकार करा व त्यात स्वत:ला झोकून द्या.

9️⃣ आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात. त्या गोष्टींच चिंतन, मनन करा. त्याविषयी चिकित्सक बना.

1️⃣0️⃣ आज-काल मुलांना कार्टूनची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहा सुद्धा सांगता येणार नाहीत. शेवटी काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या.

1️⃣1️⃣ माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. म्हणून विचाराने प्रगल्भ व कर्तुत्त्वाने मोठे व्हा.

1️⃣2️⃣ मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.

1️⃣3️⃣ पाण्याचे वाया जाणारे थेंब हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व जाणा.

1️⃣4️⃣ जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. म्हणून चांगले गुणी बना कारण ज्यांच्याकडे चांगले गुण असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात.

1️⃣5️⃣ आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही. त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळा नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही दहा झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही.

1️⃣6️⃣ परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात, पण गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्वाचे असे व्यवसाय आहेत.

1️⃣7️⃣ काहीतरी भव्यदिव्य करता आले पाहिजे.

1️⃣8️⃣ मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे. उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाने वाखाणणी केली पाहिजे. कालांतराने लोक तुमचे काम बघतात. तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाहीत.

1️⃣9️⃣ ठरावीक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाईलाजाने काहीतरी स्वीकारले जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने त्या त्या पदाला आपलं मानून, समजून प्रामाणिक कार्य केल पाहिजे.

2️⃣0️⃣ प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर काम चांगले होते. काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो. शिवाय, त्या कामाला आणि काम करणार्‍यालाही प्रतिष्ठा मिळते.

    अशा  प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही.

संकलन लेखन~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

लोकप्रिय लेखक मा. श्री.अरविंद जगताप यांच्या 'आप्पांचे पञ' या पाठातून काही निवडक वाक्ये.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

✍आजचा सुविचार✍

🌺 जीवन विचार🌺 
➖➖➖➖➖➖➖
शुभ रविवार.......

तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन  जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.
'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.
    
📚स्वामी विवेकानंद🙏🏻
माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.
पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)
अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या  व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.
कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे?????? 
〰〰〰〰〰〰
 🙏🏼संकलन🙏
✍ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे
~~~~~~~~~~~~
〰〰〰〰〰〰

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

कोजागिरी पौर्णिमा - श्री अविनाश पाटील

कोजागरी पौर्णिमा

शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.

कोजागिरी पोर्णिमा !  कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवनीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!

चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!

माहिती संकलन: श्री अविनाश पाटील 

स्त्रोत: बालपण

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...