रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

इंदिरा गांधी

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬              
संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                               
⚜️💥🙅🏻‍♀️🇮🇳👩🏻🇮🇳💵💣⚜️

        भारतरत्न इंदिरा गांधी


  (५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान)
     जन्म : १९ नोव्हेंबर १९१७
            (मुघलसराई)
   मृत्यू : ३१ ऑक्टोबर  १९८४
        ( नवी दिल्ली, भारत)

          कार्यकाळ
जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४

              राष्ट्रपती
नीलम संजीव रेड्डी
झैल सिंग
मागील : चौधरी चरण सिंग
पुढील : राजीव गांधी

               कार्यकाळ
जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७

                राष्ट्रपती
सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद
मागील : गुलजारी लाल नंदा
पुढील : मोरारजी देसाई

भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ
मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४
मागील : पी.व्ही. नरसिंहराव
पुढील : राजीव गांधी

            कार्यकाळ
ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९
मागील : एम.सी. छगला
पुढील : दिनेश सिंह

भारतीय अर्थमंत्री कार्यकाळ
जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१
मागील : मोरारजी देसाई
पुढील : यशवंतराव चव्हाण

राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय 
                      कांग्रेस
पती : फिरोज गांधी
अपत्ये : राजीव गांधी आणि 
             संजय गांधी
निवास : १, सफदरजंग रोड, 
              नवी दिल्ली
धर्म : हिंदू
चिरविश्रांती : शक्तीस्थळ

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.

लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.

इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.

१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.

💁🏻‍♀️ बालपण
           जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरीपंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.

इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.
 
👫 फिरोज गांधींसोबत विवाह
             इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.

💠 राजकारणातला प्रवास

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद
           १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

📺 माहिती व नभोवाणी मंत्री
                 जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

👩‍🦰 पंतप्रधान ⚜️
                               इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.

जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

💣 १९७१ चे भारत पाक युद्घ
                   १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.

📝 इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक
इंदर मल्होत्रा
उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)
कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
डॉम मोराईस (मिसेस गांधी)
पी.सी. ॲलेक्झांडर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)
पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)
प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)
 
📕 इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके
               अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)
इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)
दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)

🔲 टपालाचे तिकीट
                        इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.
                      
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~ WikipediA        ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट📡📲

यशोगाथा थोरांची - सरदार वल्लभ भाई पटेल

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                             
➿➿➿➿➿➿➿➿➿
⚜️🤝🎓🇮🇳👴🇮🇳🎓🤝⚜️

                   लौहपुरुष 
      सरदार वल्लभ भाई पटेल
(भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी)


   जन्म : 31 अक्टोबर 1875
(नडियाद, बंबई प्रेसीडेंसी, ब्रिटिश भारत)
     मृत्यु :15 डिसेंबर 1950
                   (वय 75)
वडिल : झावेरभाई पटेल
आई : लाडबाई
पत्नी : झावेरबा
मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल 
शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड
पुस्तक : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल  के संग्रहित कार्य, 15 खंड
स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी     भारताचे उप-प्रधानमंत्री
                पद बहाल
15 अॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950
प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु
पूर्वा धिकारी : पद सृजन
उत्तरा धिकारी : मोरारजी देसाई
            गृह मंत्रालय
             पद बहाल
15 अॕॉगष्ट 1947 – 15 डिसेंबर 1950
प्रधानमंत्री : जवाहरलाल नेहरु
पूर्वा धिकारी : पद सृजन
उत्तरा धिकारी : चक्रवर्ती  
                       राजगोपालाचारी
🔸वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन
वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विðलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.

👫🏻 वल्लभभाई पटेल यांचा विवाह
            त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.

♦️पत्नीच्या मृत्युची बातमी ऐकुन देखील कोर्टात करत राहीले कामकाज
        वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.
                  ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.

💁🏻‍♂️वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात
       आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.
               घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणा-या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.
            1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.
        त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.

🔆 वल्लभभाई गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले
          पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.
🔸 वल्लभभाई पटेलांची राजकिय कारकिर्द
⚜️ स्वातंत्र्य संग्रामात सरदार वल्लभभाई पटेलांची भुमिका
                  भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.
                    सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

🔮 शेतकरी संघर्षात वल्लभभाईंची महत्वाची भुमिका
                    महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.
                  परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.
                   या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.                               
♦️ महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनासमवेत सर्व आंदोलनांना सरदार वल्लभ भाई पटेलांनी दिले समर्थन 
वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली.
                  याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.

♦️अशी मिळाली सरदार ही पदवी
                     आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणा-या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.
               या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.

🌀 काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास
                     दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.
             1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.
           या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.

♨️ स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका
                स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.
              त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.
          वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.

🔰 सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन
                   फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.
               सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.
                  या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.

🪔 निधन
                    1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.

📜 सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान
       1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.

या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की

सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ
सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत
सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात
सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली
सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद
स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद
सरदार सरोवर बांध, गुजरात
सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद
🎯 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप
▪️1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले
▪️1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.           
▪️ 1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले.
▪️1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.
▪️ 1919 साली रौलेट अॅक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला
▪️ 1920 ला गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात वल्लभभाईंनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पीत केले. प्रत्येक महिन्याला हजारो कमवुन देणारी वकिली देखील त्यांनी देशाकरता सोडुन दिली.
▪️ 1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.
▪️1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.
▪️1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.
▪️1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.
▪️1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.
▪️1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.
▪️15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली.                 ▪️वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.                                                      🎞️📽️ सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट
                    1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.

🗽 स्टैच्यू ऑफ यूनिटी
       लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.
                    अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.

          🇮🇳 जयहिंद🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
           ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA 


➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट📡📲

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

यशोगाथा थोरांची - स्वामी दयानंद सरस्वती

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                                                        संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                              
➿➿➿➿➿➿➿➿➿        
🚩📚🛕🇮🇳👨‍🦲🇮🇳🛕📚🚩

    स्वामी दयानंद सरस्वती
(समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक)


    जन्म : १२ फेब्रुवारी १८२४
   मृत्यू : ३० ऑक्टोम्बर १९५६
पूर्ण नाव : मूलशंकर अंबाशंकर तिवारी
वडील :अंबाशंकर
आई : अमृतबाई
विवाह :  अविवाहित
जन्मस्थान : टंकारा (मोरवी संस्थान, गुजरात)
शिक्षण : शालेय शिक्षणापासून वंचित
                स्वामी दयानंद सरस्वती हे एका युगपुरूषाचे नाव आहे. एकोणीसाव्या शतकातली ती एक महान व्यक्ती नव्हे, शक्ती होती. ते एक महान धर्मसुधारक व समाजसुधारक होते. अंधारात सापडलेल्या व दिशा हरवून बसलेल्या समाजाला व देशाला आधार असतो तो केवळ समोरच्या क्षीतिजावर चमकणाऱ्या ध्रुवताऱ्याचा.

महर्षी दयानंदांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी १८२४ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. त्यांचे आई-वडील औदिच्य ब्राह्मण होते. समाजात त्यांना सन्मानाचे स्थान होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. घराण्यात ज्ञानाची परंपरा होती. मूळशंकर हा कुशाग्र बुद्धीचा संवेदनशील मुलगा होता. वयाच्या चौदाव्या वर्षी यजुर्वेद त्यांना पूर्ण कंठस्थ होता. तीन प्रसंग असे घडले की त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. पहिला प्रसंग शिवरात्रीच्या दिवशी घडला. शिवमंदिरात व्रत, उपवास करत असता रात्रीच्या सामसूम झालेल्या क्षणी शिवपिंडीवर उंदीर चढला. त्याचा कुठलाच प्रतिकार पिंडीकडून होत नव्हता. वडिलांकडून भगवान शिवाबद्दल बरेच ऐकले होते, तसे होताना दिसले नाही. दुसरे, बहिणीचा मृत्यू व तिसरा प्रसंग चुत्याचा मृत्यू. या प्रसंगांनी खूप दु:ख झाले. मलाही असेच मरण येईल. मृत्यू काय आहे तेही जाणणे आवश्यक वाटून मूलशंकरनी एकेदिवशी गृहत्याग केला व तो पुन्हा कधी घरी परतला नाही. लग्नाच्या बेडीतही अडकला नाही.

🌟 जीवनाला कलाटणी देणान्या घटना
एकदा शिवरात्री होती. वडील म्हणाले, “मूलशंकर, आज सर्वांनी उपवास करायचा. रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची.”

हे ऐकून मूलशंकरने उपवास केला. दिवस संपला, रात्र झाली. मूलशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले. त्यांनी पूजा केली, पिंडीवर फुले वाहिला. तादळाच्या अक्षता वाहिल्या. रात्रीच बारा वाजल. वाडलाना झाप येऊ लागली पण मूलशंकर जागा राहिला. आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही. देवळातल्या बिळांतून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडीभोवती फिरू लागले. ते पिंडीवरच्या अक्षता खाऊ लागले. हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही ती भक्तांचे संकटापासून रक्षण कशी काय करू शकेल, मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते ; तेव्हा मूर्तिपूजेलाही काही अर्थ नाही, अशा त-हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे शाश्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली.

एकदा टंकारा नगरामध्ये कॉलन्याची साथ आली. त्या साधीमध्ये मूलशंकरची चौदा वर्षांची बहीण मरण पावली. या घटनेनंतर तीन वर्षांनी मूलशंकरच्या आवडत्या काकांचाही कॉलन्यामुळे मृत्यू झाला. मूलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला. जणू काही त्याचे जीवनसर्वस्वच हरवले.

🏃🏻‍♂️ गृहत्याग
कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा. अशी मूलशंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली. जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्म्याकडून समजवून घ्यावीत, असे त्यांना वाटत होते. या ध्येय प्राप्तीकरिता वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले. त्यांच्या घरातील वडीलधान्या मंडळीनी त्यांच्या लग्नाचा चालविलेला विचार हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते. भौतिक सुखाचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

🎯 गुरूचा शोध
गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बड़ौदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूंच्या शोधार्थ जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले परंतु त्यांना योग्य गुरू मिळाला नाही. याच सुमारास त्या काळचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकरशी भेट झाली. त्यांचे शिष्यत्व पत्करतो मूळशंकर संन्यास धर्माचा स्वीकार केला। संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र प्रमती केल्यावर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मधुरेस येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्मग्रंथाचे ज्ञान घेतले.

📜 वैदिक ज्ञानाचा प्रसार
स्वामी दयानंदाना येद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. मुख्य म्हणजे वेदांमध्ये मूर्तिपूजा नव्हती किया उच्च-ि हा भाव नव्हता. वेदातील ज्ञान है खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे. पवित्र ज्ञान आहे आणि समाजाकरिता अत्यंत उपयुक्त आहे. अशी दयानंदांची अदा होती म्हणूनच त्यानी “वेदाकडे परत जा’ अशी भारतीयांना शिकवण दिली.

आपल्या अम्मलित प्रवचनाद्वारे ते मूर्तिपूजा, जन्मजात उच्च-निचता जातिभेद, यातक रूडी, यज्ञांमध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.

इ.स. १८६९ मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पडिताशी शास्यार्थावर वादविवाद केला त्यामुळे त्याचे नाव सर्वत्र गाजले.

🇮🇳 स्वातंत्र्यप्रेम
इ.स १८५७ च्या असफलतेपासून तर कॉंग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयाध्य हृदयामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले त्यात दयानंद हे एक होते. भारतात ब्रिटिशांना हाकलण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे. अशी स्वामी दयानंदाची पक्की खात्री होती. आर्यसमाज आणि गुरुकुल यामध्ये राष्ट्रभक्तांना सशस्त्र क्रांतीकरिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे. स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय आणि लाला हरदयाल इत्यादी. ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याकरिता उपडपणे लढणारे नेते आर्यसमाजीच होते.

🔘 शुद्धीकरण
स्वामी दयानदानी खिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले.

आर्य समाजाची स्थापना:
समाजाच्या सर्व घटकाना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे. अशी त्यांची धारणा होती हिन्दी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

स्वामी दयानंद सरस्वतोनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा बायो समाजाकडून घेतली होती. प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकायनिच धर्मप्रचाराधे धर्मनुधारणेचे कार्य करीत. तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली.

आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांबरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या वेदांचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय, तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा के होईल से स्वानी दयानंदाना वाटत होते .उत्तर भारतात त्यांनी चालविलेले चोक्षण प्रसाद कार्य अतिशय महत्वपूर्ण ठरले.

🔮 विचार
सर्व मानव एक, सर्वाचे देव एक, सर्वांचा धर्म एक, पृथ्वी माता एक हीच जीवनाची चतुःसूत्री आहे.

स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही, त्यांना अज्ञानात ठेवले जाते, हे भारताच्या अध:पतनाचे एक कारण आहे. ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे. सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या ते त्याच्या सद्गुणांमुळे. त्यांच्या पडद्यामुळे नाही.

स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्याने तिला तिचे अधिकार मिळाले पाहिजेत.

📚 ग्रंथसंपदा
‘सत्यार्थ प्रकाश’ हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंदांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय. या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे. म्हणून या ग्रंथाला ‘सत्यार्थ प्रकाश’ म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे.

वेद भाष्य, संस्कार निधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिले.
               
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
     स्त्रोत~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

दिवाळी सुट्टी जाहीर

     🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

💥 राज्यातील शाळांना दिवाळी सुट्टी जाहीर

दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी..........



मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

दीपोत्सव तेजोमय करण्यासाठी दिवे बनविण्याची कार्यशाळा

दिवाळी तेजोमय करण्यासाठी विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून स्वतः तयार केलेले दिवे वापरण्याचा केला संकल्प...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी व तेजोमय करण्यासाठी 'टाकाऊ पासून टिकाऊ' या उपक्रमांतर्गत दिवे बनविण्याची कार्यशाळेत उत्साहात सहभाग घेतला. दिवाळीत दिवे व  पणत्या यांना खुप महत्व असते. आपल्या संस्कृतीनुसार दिवाळी या सणाच्यावेळी दिवे हे प्रकाशमय वातावरण तयार करीत असतात. ज्याप्रमाणे दिव्यांच्या सहाय्याने दिवाळी तेजोमय होते. तसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण प्रकाश यावा जणू हाच संदेश दिवे देतात. म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः दिवे बनवले. विद्यार्थ्यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी तयार करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत स्वतः दिवे करतांना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता. 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून, संस्थेच्या सचिव सौ. स्मिताजी विसपूते यांच्या संकल्पनेतून व श्री पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, तुषार कुलकर्णी, श्री विलास भामरे व महेश पवार यांचे सहकार्य लाभले.

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार साधला ऑनलाईन संवाद

डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार जाऊन साधला मुक्तसंवाद....
रोमानियाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया यांनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद...

धुळे, येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज ऑनलाईन विदेशवारी केली. जगामध्ये अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, शिक्षण पद्धती वेगवेगळी आहे. या कुतूहलातून श्री अविनाश पाटील यांनी व्हर्चुअल ट्रीप च्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नुकतीच रोमानिया या देशाची व्हर्चुअली विदेशवारी केली. यासाठी रोमानिया देशाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या देशाची माहिती दिली. तेथील संस्कृती व शिक्षण पद्धती याबद्दल सविस्तर सांगीतले. चित्रफीतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रोमानियाची सफर केली. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न विचारले. कोरीना सुजेदिया यांनी अतीशय मुक्तसंवाद साधत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा केल्या. त्यांनी देखील भारताबद्दल जाणून घेतले व अशा ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाची सीमारेषा ओलांडून दोन देशांचे संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र विसपूते यांनी सांगीतले.
ऑनलाईन ग्रेट भेट या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्र विसपुते, सचिव स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, पालक व सर्व स्टाप चे सहकार्य लाभले.

✍सुविचार🙏

✍ आजचे सुविचार 👍


1️⃣ "पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते."

2️⃣ तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.

3️⃣ लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.

4️⃣ कोणतेही काम मन लावून करावे.

5️⃣ जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.

6️⃣ इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.

7️⃣ शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.

8️⃣ शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते. म्हणून पद कोणतही असो. त्याचा मनापासून स्विकार करा व त्यात स्वत:ला झोकून द्या.

9️⃣ आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात. त्या गोष्टींच चिंतन, मनन करा. त्याविषयी चिकित्सक बना.

1️⃣0️⃣ आज-काल मुलांना कार्टूनची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहा सुद्धा सांगता येणार नाहीत. शेवटी काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या.

1️⃣1️⃣ माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. म्हणून विचाराने प्रगल्भ व कर्तुत्त्वाने मोठे व्हा.

1️⃣2️⃣ मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.

1️⃣3️⃣ पाण्याचे वाया जाणारे थेंब हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व जाणा.

1️⃣4️⃣ जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. म्हणून चांगले गुणी बना कारण ज्यांच्याकडे चांगले गुण असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात.

1️⃣5️⃣ आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही. त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळा नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही दहा झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही.

1️⃣6️⃣ परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात, पण गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्वाचे असे व्यवसाय आहेत.

1️⃣7️⃣ काहीतरी भव्यदिव्य करता आले पाहिजे.

1️⃣8️⃣ मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे. उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाने वाखाणणी केली पाहिजे. कालांतराने लोक तुमचे काम बघतात. तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाहीत.

1️⃣9️⃣ ठरावीक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाईलाजाने काहीतरी स्वीकारले जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने त्या त्या पदाला आपलं मानून, समजून प्रामाणिक कार्य केल पाहिजे.

2️⃣0️⃣ प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर काम चांगले होते. काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो. शिवाय, त्या कामाला आणि काम करणार्‍यालाही प्रतिष्ठा मिळते.

    अशा  प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही.

संकलन लेखन~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

लोकप्रिय लेखक मा. श्री.अरविंद जगताप यांच्या 'आप्पांचे पञ' या पाठातून काही निवडक वाक्ये.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

✍आजचा सुविचार✍

🌺 जीवन विचार🌺 
➖➖➖➖➖➖➖
शुभ रविवार.......

तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन  जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.
'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.
    
📚स्वामी विवेकानंद🙏🏻
माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.
पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)
अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या  व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.
कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे?????? 
〰〰〰〰〰〰
 🙏🏼संकलन🙏
✍ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे
~~~~~~~~~~~~
〰〰〰〰〰〰

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

कोजागिरी पौर्णिमा - श्री अविनाश पाटील

कोजागरी पौर्णिमा

शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.

कोजागिरी पोर्णिमा !  कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवनीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!

चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!

माहिती संकलन: श्री अविनाश पाटील 

स्त्रोत: बालपण

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️


       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳

            ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                             ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡

                 भारतरत्न
अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
                       तथा  
            ए. पी. जे. अब्दुल कलाम
(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
                (रामेश्वर)
       मृत्यू : २७ जुलै २०१५
                (शिलाँग)
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 कार्य 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 शिक्षण :-
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ स्वभाव :-
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 गौरव :-
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 🎯 निधन :-
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  जयहिंद 🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
            ♾♾♾♾♾♾
           संदर्भ - Wikipedia                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील    📲 8796759702  
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                                
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🗣️📔🇮🇳👴🏼🇮🇳📔🗣️💥


        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   जन्म : ३० एप्रिल, १९०९
      (यावली, जि. अमरावती)
   निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 साहित्य संमेलने :-
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 पुस्तके :-
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 ग्रामगीता :- 
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-

         हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~  WikipediA                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
महाराष्ट्र करू स्मार्ट📡📲

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा - लेखक श्री वासुदेव पाटील (संग्राहक : श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा

          🔖 भाग::-- तिसरा

     ✒️  वा......पा.............
   गिरधन आबाची नात गेल्यानं श्रीराम पेंटरनं मंदीर रंगवण्याचं काम पाच दिवस बंद ठेवत दुसऱ्या गावाची कामं उरकली‌. गयभू, लिला, आबा  तर सुन्न होतेच पण सोबत दोन्ही मोरबीतलं वातावरणही सुन्न. जो तो आपापल्या लहान मुलांना जपू लागला. डोळ्यात तेल घालत मुलांच्या पाळतीवर राहू लागला. रात्री केव्हाही उठत मुलं जागेवर आहेत याची खात्री करु लागला. जरा कुठं  खुट्ट झालं की काळजात धस्स होऊ लागलं. आता पर्यंत जी तापी माय मायेच्या मायेनं पालनपोषण करत आली त्याच तापी मायकडं जो तो साशंकतेनं पाहू लागला. काठाकडं जायला घाबरू लागला. गावातली तरणीबांड पोरं रात्रीची गस्त सुरू करण्याची प्लॅनिंग करु लागले.

    पाचव्या दिवशी वायकरांनी श्रीराम पेंटरला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांना माहीत होतं की आपण जे करतोय त्याला कायद्याचा आधार नाही. तरी तूर्तास दुसरा मार्गच सापडत नव्हता.

" श्रीराम! आज रात्री पासून मंदीर रंगवायचं काम सुरू कर!"

" साहेब मंदीराचे अध्यक्ष - गिरधर आबाकडं दु:खाचा प्रसंग गुदरला म्हणून ते काम बंद ठेवलय!"

" आबांनी स्वत: काम बंद करायला सांगितलं का?"

" आबा तसं बोलले नाही पण ..."

" मग उद्याच कामाला सुरूवात कर! पण त्या आधी दिवसा आमच्या पोलीस स्टेशनची रंगरंगोटी कर नी रात्री मंदीराचं काम कर"

ततफफ करत श्रीरामनं होकार दिला व परतत कामास सुरुवात केली. त्यानं दिवसभर पोलीस स्टेशनात पेंटीग केली. कदमनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणं लक्ष घालत दिवसभर त्याला अजिबात विश्रांती घेऊ दिली नाही. रात्री जेवणानंतर लगेच कदमांनी त्याला मंदीराच्या कामावर पाठवलं. श्रीराम पेंटर वाल कंपाऊड ची मधली बाजू चितारू लागला. कुठं विठ्ठलाची, शंकराची आरती लिही, कुठं शिवमहिमा चितार,  कुठं  संताची चित्रे काढ, नामा, तुकोबाराय, माऊली चितार, असं करत करत रात्रीच्या दोन पावेतो तो मोरबीकडच्या गेटपर्यंत आला. वायकरांनी कदमांना मंदीरातच आजूबाजूला दूर थांबायला लावत  त्याला झोपू न द्यायला लावलं होतं. दोनच्या सुमारास पेट्रोलींग करत वायकर ही मंदीरात आले. श्रीराम पेंटरच्या डोळ्यात आता गुंगी येऊ लागली. त्यानं गेटजवळची मधली बाजूच चितारायला घेतली. बिलकुल विरुद्ध बाजूस बाहेर मधलं दृश्य चितारलं होतं. आता मधल्या बाजूस बाहेरचं दिसणारं दृश्य चितारण्याचं त्यानं ठरवलं. समोर लहान मोरबीकडून उतरणारी उतरण तो उतारू ( चितारू)  लागला. वायकर व कदम विठ्ठल मंदीराच्या सभामंडपातल्या खिडकीतून त्याकडं पाहत होते. चितारता चितारता पेंटर नं जांभई देत ब्रश खाली ठेवला. थोडं मागे सरकत ताणलेल्या व शिणलेल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. तरी डोळ्यात आता झोप उतरत झापडं जडावली. तो ब्रश घेत वरची दिसणारी घरं, दबलेली व मागंपुढं सरकलेली धाबी, मावठी, पक्क्या हवेलीच्या तिरकस भिंती, मनोरे चितारु लागला. आता झोप पूर्ण घेरू लागली. एक झपकी घ्यावी म्हणून तो ब्रश ठेवणार तोच खाडकन पुन्हा डोळे उघडत त्याचे हात आपोआप सरावानं सपासप चालू लागले. झोप, जाग, संवेदन, जाणिव की नेणीव... आपण झोपतोय.... आपण चितारतोय ! काय नेमकं काय? रंगात ब्रश की  मनाच्या नेणीवेत जाग? की जाणिवेत झोप? ब्रशचे फर्ऱ्हाटे सुरुच, डुलकी सुरुच. तो तसाच जागेवर कलला.

    वायकर मंदीरातून हळूच पुढे आले. त्यांनी लहान मोरबीच्या उताराच्या वाटेवर केव्हाची रोखून धरलेली नजर चित्रावर रोखली! त्यांचा अंदाज खरा ठरला होता. तरी ते अचंबीत झाले. चित्रात गेटमधून दिसणारं मोरबीचं दृश्य चपखल चितारलं असलं तरी उतारावरुन  पांगुळगाडा ढकलत उतरणारी गिरधर आबाची नात बाली  कशी? बालीला जाऊन सहा दिवस झालेले. श्रीराम चित्र काढत होता तेव्हा वायकरची नजर उतारावरच होती. तेव्हा त्यांना उतारावर ना पांगुळगाडा दिसला ना बाली! मग श्रीरामनं त्या दिवसा सारखाच आजही पांगुळगाडा का चितारला!वायकरनं कदमकडं पाहिलं. कदम तर विस्फारल्या डोळ्यांनी  पाहतच होता.
       वायकरनं श्रीरामला हलवत उठवलं.

" श्रीराम! सुंदर चित्र रेखाटलं तू! "

श्रीरामची नजर चित्रावर स्थिरावली. तो चमकला.

" साहेब! आजही तशीच चूक झाली झोपेत."

तो ब्रश रंगात बुडवत बाली व पांगुळगाड्यावर मारू लागला.

" थांब श्रीराम! आधी हा झोल नेमका काय? त्या दिवशी ही झोपेत तू पांगुळगाडाच चितारला अन आजही पांगुळगाडाच! सोबत आबांची पाच - सहा दिवसांपूर्वी मेलेली नात? जागतेपणी चितारता येणार नाही ते तू झोपेत कसं चितारु शकतो! श्रीराम सत्य काय ते सांग नाही तर पट्ट्या- लाथेनं बुकलत अंदर टाकतो! दोन निष्पाप मुलांचा जीव गेलाय!"

" साहेब! झोपेत चित्रे चितारले गेलेत हे आपणास खोटं वाटत असलं तरी ते‌च सत्य आहे! भले आपण मला तुडवलं, फासावर लटकवलं तरी तेच सत्य आहे!"

 " श्रीराम! यात काही तरी पाणी मुरतंय ! पटकन सांगून मोकळा हो!"

श्रीरामनं तोच नन्नाचा  पाढा लावला.

" कदम याला झोपूच नको देऊ! झोपला तरी चित्र काढणं सुरुच ठेवा!"

   सकाळी वायकर एकदम संभ्रमात पडले. पेंटर झोपल्यावर चित्र काढूच कसा शकतो? तेही तोच पांगुळगाडा, तीच मुलगी? पांगुळगाड्याचा काय संबंध!"

  श्रीराम पेंटर दिवसा पोलीस स्टेशन रंगवू लागला. दुपारी जेमतेम एक दोन तास त्याला झोपू दिलं.
    
    वायकरांना पांगुळगाडा डोळ्याभोवती गरगर फिरु लागला. त्यांनी शेवटी बारकू बोरसास स्टेशनात आणलंच. संशयीत म्हणून एकदा तपासायला काय हरकत आहे ? असा विचार करत त्यांनी बारकूस घेतलं. श्रीराम पेंटरनं पेंटींग करतांना  बारकू बोरसास आत येतांना पाहिलं. त्यांच्या अर्धवट झोपेनं बहिरट झालेल्या मेंदूत हे कुठं तरी कोरलं गेलं.

तिशी पस्तीशीतला बारकू बोरसे अंगानं भरलेला गोरापान व कामानं शरीर पिळदार बनवलेला गडी! तरी ठाण्यावर येताच आतून पुरता घाबरलेला.

   " बोरसे! गाव कोणतं तुझं?"

" पांघण! देवाचं पांघण साहेब! इथून चाळीस किमी अंतरावर तापीकाठावरच वसलंय!"

" गाव सोडून मोरबीत कसा आलास?"

" गावात धंदा म्हणावा तसा चालत नव्हता साहेब! मग नवीन गाव शोधता शोधता याच गावात आलो!"

"  धंदाच करतो की इतर धंदे ही करतो?"

" साहेब!.... म्हणजे...?"

" उलट सवाल नको! जे विचारलं ते सांग मुकाट्यानं!"

" नाही साहेब. फक्त लाकुडकाम!" बारकू खाली मान घालत बोलला.

" गावात काय घडतंय माहीत आहे का तुला!"

"........"

" बोरसे, मी काय विचारतोय?"

" हो साहेब! तात्यांचा नातू गायब झालाय तर आबांची नात....."

" दोघा मुलांच्या घटनेस्थळी पांगुळगाडा सापडलाय!  कदम! आणा ते दोन्ही पांगुळगाडे!"  वायकरनं जोरात कदमला आरोळी ठोकली.

 कदमनं दोन्ही पांगुळगाडे आणले. श्रीराम पेंटर ब्रश चालवत तिरकी नजर मध्ये टाकत होता. बोरसा समोर पांगुळगाडे पडलेत. ही जाणीव ही त्याच्या मेदूत कोरली.

" बोरसे! तूच बनवलेत ना हे?”

" हो साहेब!"

" किती पांगुळगाडे बनवलेत तू? कुणाकुणाकडे दिलेत तू?"

" साहेब! या गावात एवढे नाही. तीन बनवलेत!"

" तुझ्या गावाला ही बनवत आला असशील तू? तिथं ही काही घटना?"

" बनवलेत साहेब!"

" काही विचीत्र अनुभव, घटना?"

" नाही साहेब"

" इथं तिसरा पांगुळगाडा कुणाकडं दिलाय? केव्हा?"

" गयभू घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच नानजी पाटलाकडं"

वायकर चपापले.

" नानजी पाटील मोठ्या मोरबीतले का?”

" होय साहेब!"

नंतर वायकरने त्यास 'बोलवलं की सरळ ठाण्यात यायचं' सांगत  जाऊ दिलं.

" कदम ! आपला तपास हा वाऱ्यावरच्या लाथा तर नाहीत ना?
वायकरनं कदमालाच विचारलं. पण कदमच्या मनातही तेच विचार घोळत होते. हा  पेंटर भंगोड्या असावा. याच्या नादी लागून साहेब तपासाची दिशा भरकटत नेत आहेत व वेळ ही वाया घालवत आहेत.

     वायकरनं नानजी पाटलाकडं जात घरात लहान मूलं किती याबाबत‌ चौकशी करत मुलांच्या काळजी घेण्यांचा सुचक सल्लाही दिला.

 रात्री श्रीराम पेंटर ला पुन्हा मंदीराचं राहिलेलं काम करण्यासाठी पाठवलं. आता रात्री तो मंदीराची पुर्वेकडील भिंत आतून  चितारणार होता. मंदीराच्या समोरील या भागात पटांगण होतं. या भिंतीला तापीकाठाकडं जाण्यासाठी  महादेव मंदीराच्या समोर तिरकस गेट होतं. त्याच गेटमधून तात्यांचा नातू बाहेर पडला असावा. 
  पेंटरनं त्या भिंतीवर मधल्या बाजूस संत व त्यांचा जिवनपट चितारावयास सुरुवात केली. संतसेना, माती तुडवणारे गोरोबा, मळ्यात राबणारे सावता माळी ,संत नरहरी सोनार असे एक एक संत चितारता चितारत पहाटे तीन वाजायला तो काठाकडं जाणाऱ्या गेटजवळ आला. तेथे तो समोर दिसणारा तापीकाठ , संथ तापीमाय काढणार होता. पण विविध समाजाचे संत चितारता चितारता झोपेच्या गुंगीत समाज, समाजातील विविध व्यवसाय ही कल्पना त्याच्या सुप्त मनात साकारली जाऊ लागली. गोरोबा साकारतांना त्याला आपल्या मोरबीतला कुंभार आठवला, सावता माळी काढतांना गावातले भाजीपाला पिकवणारे माळी आठवू लागले. मग तंद्रीत गावातले सर्व व्यावसायिक आठवत राहिले. झोप दाटू लागली. गुंगी चढू लागली. गेटजवळ तापीकाठ, सौंदळची झाडं ...समोर दिसणारं  जे तो कायम पाहत आलेला होता ते चित्रात उतरु लागलं. पुन्हा झोप, जाग, जाणिवा- नेणिवा, मनाचे खेळ, मनातल्या प्रांतात चालणारे व्यवहार ....सारं सारं खुलं होऊ लागलं. तो चित्र चितारता चितारताच कलला. 

मंदिराच्या संभामंडपात बसून बसून डुलकी देणारे वायकर खडबडून उठले. ते चित्राजवळ आले. आता तर ते जागेवर हबकून अक्षरश: उडालेच.
गेटजवळचं मधल्या भागातून समोर दिसणारं दृश्य श्रीरामनं चितारलं होतं.
 मंदीरापासून पसरलेला तापीकाठ....खोरं...सौंदळची झाडं...एका सौंदळच्या झाडाजवळ पांगुळगाडा ठेवत काठाकडं हात वर करत- जणू कुणाचा तरी हात धरत दुडूदुडू चालत असल्यासारखा मुलगा! पण सोबत दोन्ही बाजूला कोण  चालतंय हे दिसत नव्हतं. मोरबीच्या गेटकडच्या दिशेनं असाच एक पांगुळगाडा मुलगी तापीपात्राकडं ढकलत नेत होती. तसाच तिसरा पांगुळगाडा मोठ्या मोरबीकडून येतांना दिसत होता पण त्याच्याजवळ मूल दिसत नव्हतं. आणि.....आणि....तापी पात्राजवळ बोरसाचं वासलं, किकरं, कुऱ्हाड, रंधा, करवत, लाकडं पडलेली. बोरसा खाली मान घालत किंचीत वर डोळे करत  मुलांकडं पाहत पांगुळगाडा बनवत होता. अप्रतिम, जिवंत चित्र साकारलेलं. वायकर पाहून थक्क झाले.

 " साहेब हा पेंटर भांग खाऊन काम करतो वाटतं. दिवसा जे पाहतो तेच नशेत चितारतो! याच्या नादी आपला तपास भरकटतोय! " कदम वायकर साहेबास सुचवत होता

 तोवर मोरबीतून पहाटे लोक यायला लागले. चार दोन लोकांनी चित्र पाहिलं.  वायकरनं श्रीरामला उठवलं.श्रीरामला खूण करताच श्रीरामनं ब्रश रंगात बुडवत सपासप चित्रावर फिरवत मिटवलं व तो पुन्हा तापीकाठ रंगवू लागला. पण आता समोर जे दिसायचं तेच साकारू लागलं.

   वायकरनं सकाळी नऊ वाजताच बारकू बोरसाच्या पेकाटात बुटासहीत लाथ घालत गाडीत बसवत ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच पुन्हा दोन तीन लाथा घातल्या. बोरकू बोरसाच्या ओठात दात घुसत रक्त वाहत होतं. ते पुसत तो गयावया करत होता.

"बारकू शेठ! जरा ही रंधा इकडं तिकडं न चालवता गुण्यात लाकुड तासत धारकोर तासतो तसंचं सरळ सरळ सारं खरं खरं ओक!" वायकर लालेलाल होत फुत्कारत होते.

" साहेब! सारं सारं सांगतो! पण विश्वास ठेवा मी मुलांना काहीही केलं नाही! "

.
.
.
 क्रमश:......

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...